शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

शासकीय पगारात समाधान

By admin | Updated: June 10, 2015 03:01 IST

बल्लमवार सरांना उन्हाळ्याच्या सुटीत किंवा एरव्हीही खासगी ट्युशन क्लासेस घेऊन आर्थिक गणित जुळविता आले असते.

विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे ‘गणित’ जुळविणारे सर ! नागपूर : बल्लमवार सरांना उन्हाळ्याच्या सुटीत किंवा एरव्हीही खासगी ट्युशन क्लासेस घेऊन आर्थिक गणित जुळविता आले असते. पण मिळणाऱ्या शासकीय पगारात ते समाधानी आहेत. उलट जेवढा पगार मिळतो त्यातुलनेत आम्ही शिकवीतही नाही, असे ते मोकळेपणाने सांगून त्यांनी पगारासाठी रडणाऱ्या व अध्यापनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना अप्रत्यक्षपणे चपराकही लगावली. सर्वच विद्यार्थ्यांची दर शनिवारी गणिताची टेस्ट घेतली जाते. यात आढळलेल्या चुका संबंधित विद्यार्थ्यांना सोडवून दिल्या जातात. शहरातील विविध खासगी ट्युशनमध्ये घेतले जाणारे टेस्ट पेपर, प्रश्नसंच ते मिळवितात. त्यासाठी धडपड करतात व ते प्रश्न आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतात. त्यांची पक्की तयारी करून घेतात. वारंवार गणित सोडवून घेऊन बल्लमवार सर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे गणित पक्के करण्याचा प्रयत्न करतात. सरांच्या या कर्तव्यनिष्ठेला सलाम...!इतर शिक्षकांनीही घ्यावा पुढाकार सर्वच शिक्षकांना पगार मिळतो. मात्र, बल्लमवार यांच्यासारखे काही शिक्षक मिळणाऱ्या पगारात समाधान मानून अतिरिक्त अध्यापनाचे काम करतात. प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कष्ट घेतात. महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांनीही असाच पुढाकार घेतला तर गरिबाघरच्या गुणवंतांनाही पुढे जाण्याचा मार्ग सुकर होईल. तुम्ही घडविलेला विद्यार्थी एखाद्या मोठ्या हुद्यावर जाऊन जेव्हा तुम्हाला वाकून नमन करेल तो क्षण तुमच्या आयुष्यात कुठल्याही अतिरिक्त मानधनापेक्षा निश्चितच मोठा असेल. (प्रतिनिधी)उपाशीपोटी कसा करणार अभ्यास?शिक्षक बल्लमवार यांनी या गरीब विद्यार्थ्यांची आणखी एक अडचण सांगितली. मुलांचे आई-वडील सकाळीच कामावर निघून जातात. ते घरी दुपारी १२ च्या सुमारास परत येतात. शाळा सकाळी ११.४५ ची असते. शाळेत जाण्याच्या वेळेपर्यंत घरात स्वयंपाक झालेला नसतो. त्यामुळे ही मुले उपाशीपोटीच शाळेत येतात. दोन पिरेड झाले की मधल्या सुटीत १० मिनिटात घरी जावून जेवण करून येतात. ते उपाशीपोटी कसे शिकणार? ही परिस्थिती माहिती असल्यामुळे ते अभ्यासात चुकले तरी शिक्षा केली जात नाही. अशावेळी आपण त्यांना भूमितीशी संबंधित काही आरेखन काढण्याचे काम सोपवून त्यांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो, असेही त्यांनी सांगितले. आहारासाठी संस्था, उद्योजकांनी पुढाकार घ्यावाशालेय पोषण आहाराअंतर्गत ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन दिले जाते. ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही. मात्र, महापालिकेच्या शाळेत शिकणारे बहुतांश विद्यार्थी गरीब असतात. त्यांना घरी भोजनही मिळत नाही. त्यामुळे येथील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील संस्था, संघटना, उद्योगपती किंवा महापालिकेने पुढाकार घेण्याची गरज आहे.