शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

सोलार गांधीने सौरऊर्जेसाठी त्यागलं घर व रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 11:01 IST

ही यात्रा एक-दोन वर्षाची नसून ११ वर्षांचे त्यांचे हे तप आहे. देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी भारतासह जगभरातील लोकांना जोडण्यासाठी एनर्जी फाउंडेशनची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देचेतन सोलंकी ११ वर्षांपासून करत आहेत जनजागृती

आशिष दुबे

नागपूर : आजचा युवकाची अपेक्षा असते की, चांगली नोकरी मिळावी, मोठे घर असावे, कुटुंबीयांसोबत एक सुखद जीवन जगता यावे, परंतु ४६ वर्षीय डॉ.चेतनसिंह सोलंकी यांचे विचार आजच्या युवा विचारांपेक्षा बरेच वेगळे आहे. देशात सोलर गांधीच्या नावाने प्रसिद्ध डॉ.सोलंकी यांच्याजवळ सर्वच काही होते. आपल्या कुटुंबीयांसोबत सुखद जीवन जगत असताना, ते देशासाठी सौरऊर्जेतून स्वराज्य आणण्यासाठी एनर्जी स्वराज्य यात्रेवर निघाले आहेत. ही यात्रा एक-दोन वर्षाची नसून ११ वर्षांचे त्यांचे हे तप आहे. देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी भारतासह जगभरातील लोकांना जोडण्यासाठी एनर्जी फाउंडेशनची स्थापना केली आहे.

डॉ.सोलंकी हे आयआयटी मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सौरऊर्जेतून स्वराज्य घडविण्याचे मिशन त्यांनी एकहाती घेतले असून, यासाठी त्यांनी कुणाकडून एक रुपयांचा निधीही घेतला नाही. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित एका स्पर्धेत १ लाख डॉलरचा पुरस्कार मिळाला होता. ही राशी व त्यांच्याजवळील जमापुंजीतून ते ही यात्रा करीत आहे. त्यांनी या यात्रेसाठी एका बसमध्ये घर, प्रयोगशाळा व प्रशिक्षण देण्याचे केंद्र बनविले आहे. डॉ.सोलंकी यांनी २०२० मध्ये ही यात्रा सुरू केली होती. गेल्या वर्षभरात त्यांनी देशातील काही राज्याचा १३ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. ८ डिसेंबर रोजी ते मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचले. महाराष्ट्रात एक महिना राहून ते आंध्र प्रदेशकडे रवाना होणार आहे.

डॉ. सोलंकी यांनी प्रण केला की, ११ वर्षे ते आपल्या जीवनाचा प्रवास बसमध्येच करणार आहे. भारतभर यात्रा करून लोकांना ऊर्जेचे महत्त्व पटवून देणार आहेत. या प्रवासात त्यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. ते म्हणाले की जलवायू परिवर्तनामुळे भारतच नाही, तर संपूर्ण जग चिंतेत आहे. जगातील सर्वच देश एका व्यासपीठावर येऊन उपाययोजना करीत आहेत. या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाचा साथ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. या यात्रेचा उद्देश लोकांमध्ये जनजागृती आणण्याचा आहे. यात्रेच्या दरम्यान ते शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. देशाला महाशक्ती बनविण्यासाठी युवक कसे योगदान देऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन करतात.

- भारत बनू शकते महाशक्ती

डॉ. सोलंकी म्हणाले की, भारत देश महाशक्ती बनू शकतो. भारताची आंतरिक व बाह्यशक्ती उत्तम आहे. तुलनेत जगातील अन्य देशाची ही शक्ती कमजोर आहे. भारताला जर सौरऊर्जेत आत्मनिर्भर बनविले, तर आपला देश जगात महाशक्ती बनू शकतो.

टॅग्स :Socialसामाजिक