शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सोलार गांधीने सौरऊर्जेसाठी त्यागलं घर व रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 11:01 IST

ही यात्रा एक-दोन वर्षाची नसून ११ वर्षांचे त्यांचे हे तप आहे. देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी भारतासह जगभरातील लोकांना जोडण्यासाठी एनर्जी फाउंडेशनची स्थापना केली आहे.

ठळक मुद्देचेतन सोलंकी ११ वर्षांपासून करत आहेत जनजागृती

आशिष दुबे

नागपूर : आजचा युवकाची अपेक्षा असते की, चांगली नोकरी मिळावी, मोठे घर असावे, कुटुंबीयांसोबत एक सुखद जीवन जगता यावे, परंतु ४६ वर्षीय डॉ.चेतनसिंह सोलंकी यांचे विचार आजच्या युवा विचारांपेक्षा बरेच वेगळे आहे. देशात सोलर गांधीच्या नावाने प्रसिद्ध डॉ.सोलंकी यांच्याजवळ सर्वच काही होते. आपल्या कुटुंबीयांसोबत सुखद जीवन जगत असताना, ते देशासाठी सौरऊर्जेतून स्वराज्य आणण्यासाठी एनर्जी स्वराज्य यात्रेवर निघाले आहेत. ही यात्रा एक-दोन वर्षाची नसून ११ वर्षांचे त्यांचे हे तप आहे. देशाला ऊर्जेच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी भारतासह जगभरातील लोकांना जोडण्यासाठी एनर्जी फाउंडेशनची स्थापना केली आहे.

डॉ.सोलंकी हे आयआयटी मुंबई येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सौरऊर्जेतून स्वराज्य घडविण्याचे मिशन त्यांनी एकहाती घेतले असून, यासाठी त्यांनी कुणाकडून एक रुपयांचा निधीही घेतला नाही. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित एका स्पर्धेत १ लाख डॉलरचा पुरस्कार मिळाला होता. ही राशी व त्यांच्याजवळील जमापुंजीतून ते ही यात्रा करीत आहे. त्यांनी या यात्रेसाठी एका बसमध्ये घर, प्रयोगशाळा व प्रशिक्षण देण्याचे केंद्र बनविले आहे. डॉ.सोलंकी यांनी २०२० मध्ये ही यात्रा सुरू केली होती. गेल्या वर्षभरात त्यांनी देशातील काही राज्याचा १३ हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. ८ डिसेंबर रोजी ते मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात पोहोचले. महाराष्ट्रात एक महिना राहून ते आंध्र प्रदेशकडे रवाना होणार आहे.

डॉ. सोलंकी यांनी प्रण केला की, ११ वर्षे ते आपल्या जीवनाचा प्रवास बसमध्येच करणार आहे. भारतभर यात्रा करून लोकांना ऊर्जेचे महत्त्व पटवून देणार आहेत. या प्रवासात त्यांनी ‘लोकमत’शी बातचित केली. ते म्हणाले की जलवायू परिवर्तनामुळे भारतच नाही, तर संपूर्ण जग चिंतेत आहे. जगातील सर्वच देश एका व्यासपीठावर येऊन उपाययोजना करीत आहेत. या आव्हानाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाचा साथ मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. या यात्रेचा उद्देश लोकांमध्ये जनजागृती आणण्याचा आहे. यात्रेच्या दरम्यान ते शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. देशाला महाशक्ती बनविण्यासाठी युवक कसे योगदान देऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन करतात.

- भारत बनू शकते महाशक्ती

डॉ. सोलंकी म्हणाले की, भारत देश महाशक्ती बनू शकतो. भारताची आंतरिक व बाह्यशक्ती उत्तम आहे. तुलनेत जगातील अन्य देशाची ही शक्ती कमजोर आहे. भारताला जर सौरऊर्जेत आत्मनिर्भर बनविले, तर आपला देश जगात महाशक्ती बनू शकतो.

टॅग्स :Socialसामाजिक