शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

देशातील समाज वैचारिकदृष्ट्या जखमी : डॉ. सूरज येंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:22 IST

देशातील विविध समाज हा आपल्यापुरता मर्यादित झाला असल्याने तो वैचारिकदृष्ट्या जखमी झाला आहे. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या देश तुटत चालला आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा आहे.

ठळक मुद्देइंडिया फॉर डायव्हर्सिटी : विविध समाजात संवाद घडविण्याचा प्रयत्न

ऑनलाईन लोकमत नागपूर : देशातील विविध समाज हा आपल्यापुरता मर्यादित झाला असल्याने तो वैचारिकदृष्ट्या जखमी झाला आहे. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या देश तुटत चालला आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी विविध समाजांमध्ये संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने काही तरुणांनी एकत्र येऊन इंडिया फॉर डायव्हर्सिटी (आयएफडी) हे अभियान सुरू केले आहे.हॉर्वर्ड विद्यापीठाचे संशोधक व या अभियानाचे प्रमुख डॉ. सूरज येंगडे हे शनिवारी नागपुरात आले होते. नागपुरातही त्यांनी विविध सामाजिक संघटना व विद्यार्थ्यांशी यासंबंधात संवाद साधला. दरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना डॉ. येंगडे यांनी सांगितले, आपल्या देशात खूप विविधता आहे. जात, धर्म, लिंग, भाषा, वर्ग आदींबाबत विविधता आहे. या विविधतेतून भेदभाव निर्माण झाला आहे. तो अमूक धर्माचा. तो अमूक जातीचा अशी विभागणी झाली आहे. त्यांच्यातील संवादही बंद झालेले आहेत. त्यांच्या एकमेकांबद्दल ज्या भावना आहेत, त्या केवळ ऐकीव आहेत. त्यातून अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. या प्रत्येकाची राष्ट्राबद्दलची कल्पनाही वेगवेगळी आहे. प्रत्येक वर्ग, प्रत्येक धर्म राष्ट्राला आपल्या नजरेने पाहतो त्यामुळे देशभक्तीबद्दल प्रत्येकाचे स्वत:चे विचार आहेत. एका धर्माचे विचार दुसऱ्या  धर्मातील लोक वेगळ्या नजरेने पाहतात. हे केवळ एकमेकांशी संवाद नसल्याने होत आहे. त्यामुळे समाजात द्वेषाची भावना निर्माण झाली आहे. त्यात एकवाक्यता नाही. ही एकवाक्यता संविधानाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते. म्हणून इंडिया फॉर डायव्हर्सिटी हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. आपली विविधता कायम ठेवून एकमेकांशी संवाद व्हावा आणि एकमेकांबद्दल असलेला द्वेष प्रेमाने दूर करावा, हा याचा मुख्य उद्देश आहे.विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागृती आवश्यकआयआयटी मुंबई येथून या अभियानाची सुरुवात झालेली आहे. नांदेड व इतर काही शहरांमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. सुरुवातीला देशातील ८ राज्यांमधील १६ शहरांमध्ये पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. या अभियानांतर्गत विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यात येत असला तरी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याशी संवादावर अधिक भर दिला जात आहे. कारण येणाऱ्या  समाजाचे व देशाचे नेतृत्व ते करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक जागृती होणे आवश्यक आहे, असेही डॉ. येंगडे यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर