शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

देशातील समाज वैचारिकदृष्ट्या जखमी : डॉ. सूरज येंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:22 IST

देशातील विविध समाज हा आपल्यापुरता मर्यादित झाला असल्याने तो वैचारिकदृष्ट्या जखमी झाला आहे. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या देश तुटत चालला आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा आहे.

ठळक मुद्देइंडिया फॉर डायव्हर्सिटी : विविध समाजात संवाद घडविण्याचा प्रयत्न

ऑनलाईन लोकमत नागपूर : देशातील विविध समाज हा आपल्यापुरता मर्यादित झाला असल्याने तो वैचारिकदृष्ट्या जखमी झाला आहे. त्यातून सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या देश तुटत चालला आहे. देशासाठी हा धोक्याचा इशारा आहे. त्यामुळे देशाला वाचवण्यासाठी विविध समाजांमध्ये संवाद घडवून आणण्याच्या उद्देशाने काही तरुणांनी एकत्र येऊन इंडिया फॉर डायव्हर्सिटी (आयएफडी) हे अभियान सुरू केले आहे.हॉर्वर्ड विद्यापीठाचे संशोधक व या अभियानाचे प्रमुख डॉ. सूरज येंगडे हे शनिवारी नागपुरात आले होते. नागपुरातही त्यांनी विविध सामाजिक संघटना व विद्यार्थ्यांशी यासंबंधात संवाद साधला. दरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना डॉ. येंगडे यांनी सांगितले, आपल्या देशात खूप विविधता आहे. जात, धर्म, लिंग, भाषा, वर्ग आदींबाबत विविधता आहे. या विविधतेतून भेदभाव निर्माण झाला आहे. तो अमूक धर्माचा. तो अमूक जातीचा अशी विभागणी झाली आहे. त्यांच्यातील संवादही बंद झालेले आहेत. त्यांच्या एकमेकांबद्दल ज्या भावना आहेत, त्या केवळ ऐकीव आहेत. त्यातून अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. या प्रत्येकाची राष्ट्राबद्दलची कल्पनाही वेगवेगळी आहे. प्रत्येक वर्ग, प्रत्येक धर्म राष्ट्राला आपल्या नजरेने पाहतो त्यामुळे देशभक्तीबद्दल प्रत्येकाचे स्वत:चे विचार आहेत. एका धर्माचे विचार दुसऱ्या  धर्मातील लोक वेगळ्या नजरेने पाहतात. हे केवळ एकमेकांशी संवाद नसल्याने होत आहे. त्यामुळे समाजात द्वेषाची भावना निर्माण झाली आहे. त्यात एकवाक्यता नाही. ही एकवाक्यता संविधानाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते. म्हणून इंडिया फॉर डायव्हर्सिटी हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. आपली विविधता कायम ठेवून एकमेकांशी संवाद व्हावा आणि एकमेकांबद्दल असलेला द्वेष प्रेमाने दूर करावा, हा याचा मुख्य उद्देश आहे.विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक जागृती आवश्यकआयआयटी मुंबई येथून या अभियानाची सुरुवात झालेली आहे. नांदेड व इतर काही शहरांमध्ये आम्ही पोहोचलो आहोत. सुरुवातीला देशातील ८ राज्यांमधील १६ शहरांमध्ये पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. या अभियानांतर्गत विविध सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यात येत असला तरी महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याशी संवादावर अधिक भर दिला जात आहे. कारण येणाऱ्या  समाजाचे व देशाचे नेतृत्व ते करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यात वैचारिक जागृती होणे आवश्यक आहे, असेही डॉ. येंगडे यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूर