शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी करणार ‌‘समतेचा जागर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:52 IST

Nagpur News सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचवण्यासाठी आता समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देसामाजिक न्याय विभागाचा पुढाकारशासनाच्या योजना, संविधान, व्यसनमुक्ती व एट्रॉसिटीबाबत जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचवण्यासाठी आता समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून, शासनाच्या योजनांसोबतच संविधानाबाबत जागृती, व्यसनमुक्ती आणि एट्रॉसिटीबाबतही लोकांना जागृत करण्यात येईल. एकप्रकारे हे विद्यार्थी गावागावांत जाऊन समतेचा जागर करतील.

सामाजिक न्यायासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांसोबतच संविधानाबाबत माहिती, व्यसनमुक्ती आणि एट्राॅसिटी याबाबतची माहिती दूरवरच्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेत समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात समाजकार्य महाविद्यालयातील प्राचार्यांची नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत प्राचार्यस्तरावर चार विषयांच्या चार समित्या तयार करण्यात आल्या. व्यसनमुक्तीसाठी प्रा. गोडघाटे यांच्या नेतृत्वात समिती तयार करण्यात आली. संविधानाच्या माहितीसाठी प्रा. महेंद्रकुमार मेश्राम, एट्रॉसिटीसाठी प्रा. पुरुषोत्तम थोटे आणि सामाजिक न्यायाच्या विविध योजनांसाठी निशांत माटे यांच्या नेतृत्वात समिती गठित करण्यात आली. तसेच या चारही समित्यांसोबत समन्वय ठेवण्यासाठी बाबा शंभरकर यांची मुख्य समिती राहील. या समितीद्वारे या कामासाठी प्राध्यापकांची निवड केली जाईल. त्या प्राध्यापकांना उपरोक्त विषयांबाबत तज्ज्ञमंडळींद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर हे प्रशिक्षणप्राप्त प्राध्यापक आपापल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. त्यानंतर विद्यार्थ्यांचे व्हिलेज कॅम्प आयोजित केले जातील. त्यावेळी गावागावांत जाऊन संविधानाच्या तरतुदी, लोकांचे अधिकार समजावून सांगतील. व्यसनमुक्तीबााबत मार्गदर्शन करतील. तसेच एट्रॉसिटी कायदा नेमका काय आहे, हे समाजावून सांगतील. एकप्रकारे या कॅम्पद्वारे गावागावांमध्ये समतेचा जागर होईल.

समित्या स्थापन, लवकरच प्रशिक्षणालाही सुरुवात

सामाजिक न्याय विभागामार्फत समाजोपयोगी महत्त्वाच्या योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘जागर समतेचा सामाजिक न्यायाचा’ हा कार्यक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. यात समाजकार्य महाविद्यालयांच्या मदतीने हा कार्यक्रम राबविला जाईल. समित्या स्थापन झाल्या आहेत. लवकरच प्रशिक्षणालाही सुरुवात होईल. येत्या १९ फेब्रुवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायभवन येथे या कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन होईल. त्यानंतर वर्षभर कार्यक्रम राबविले जातील.

- डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग

टॅग्स :Socialसामाजिक