शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

समाज कल्याण विभागाने दलित विद्यार्थिनीला राजर्षी शाहू महाराज पुरस्कारापासून ठेवले वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 23:37 IST

समाज कल्याण विभागाने अडीच लाख रुपयांच्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारापासून वंचित ठेवल्यामुळे दलित विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : राज्य सरकारला नोटीस

आॅनलाईन लोकमतनागपूर : समाज कल्याण विभागाने अडीच लाख रुपयांच्या राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारापासून वंचित ठेवल्यामुळे दलित विद्यार्थिनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.राजवी सुहास आंबुलकर असे विद्यार्थिनीचे नाव असून ती रामबाग कॉलनी येथील रहिवासी आहे. दहावीच्या परीक्षेत राज्यातून व विभागातून प्रथम आलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्याचा शासन निर्णय (११ जून २००३) आहे. २ लाख ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे राज्यस्तरीय तर, १ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे विभागस्तरीय पुरस्काराचे स्वरूप आहे. मार्च-२०१६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत राजवीने ५०० पैकी ४९५ गुण मिळवून अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. परंतु, समाज कल्याण विभागाने तिला अद्याप पुरस्कार दिलेला नाही. त्यामुळे तिने आजोबामार्फत न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात यावा, पुरस्काराच्या रकमेवर १२ टक्के व्याज देण्यात यावे व याचिकेच्या खर्चापोटी ५० हजार रुपये मिळावे अशी विनंती तिने न्यायालयाला केली आहे.याचिकेत सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नागपूर विभाग, समाज कल्याण आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष २३ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. राजवीतर्फे अ‍ॅड. अरुण पाटील कामकाज पहात आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSocial welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालय