शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

काळेंच्या लिखाणात समाजभावनेचा निचरा : विलास देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:59 IST

साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी केले.

ठळक मुद्देकाळे यांच्या तीन पुस्तकांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी केले.श्री नवयुवक स्नेह मंडळ वाचनालय , महाल यांच्यातर्फे ‘वेगळ्या वाटा आणि वळणे’ या कार्यक्रमांतर्गत नुकतेच लेखक डॉ. दिनेश काळे यांच्या पुस्तकांवर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. काळे यांच्या ‘साद-पडसाद’, ‘मनातले’ व ‘कळायला लागल्यापासून’ या तीन पुस्तकांवर पत्रकार शफी पठाण आणि आर. एस. मुंडले महाविद्याालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. सीमा पागे यांनी भाष्य केले. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद निर्बाण उपस्थित होते. डॉ. देशपांडे पुढे म्हणाले, काळे यांनी ललित लिखाणापासून तर परराष्ट्र धोरणापर्यंत विपुल लेखन केले आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्याला कोणतेही 'लेबल' लावता येत नाही. इतक्या कमी वयात ५० वर पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यातून त्यांचा लिखाणाचा व्यासंग स्पष्ट होतो. प्रा. सीमा पागे म्हणाल्या, डॉ. काळे या लेखकाच्या आत एक मनोचिकित्सक दडलेला आहे. यांच्या ‘साद-पडसाद’, ‘मनातले’, ‘कळायला लागल्यापासून’ या तिन्ही पुस्तकांमध्ये तो मनोचिकित्सक वेगवेगळया पातळीवर व्यक्त होत असतो. त्यांचे लिखाण हळूवार सोप्या भाषेत असल्याने ते वाचकांना लगेच आपलेसे करते. शफी पठाण यांनी पुस्तकांवर भाष्य करताना यात विशद करण्यात आलेली वर्तमान राजकीय परिस्थिती आज संक्रमणातून जात असल्याचे सांगितले. भारताच्या अर्थकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, समाजकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, धर्मकारणाचा संबंध राजकारणाशी आहे. त्यामुळे या देशातील कुणीही मनात असो वा नसो स्वत:ला राजकारणापासून वेगळे करू शकत नाही. परंतु नैतिकतेची सर्व बंधने मोडून आज राजकारण ज्या वळणावर पोहोचले आहे त्या वळणावर सामान्य नागरिकांनी काय करावे, याचे मार्गदर्शन काळेंच्या पुस्तकात वाचकांना मिळते, याकडेही पठाण यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक डॉ. दिशेन काळे तर संचालन अचिता देशमुख यांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर