शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काळेंच्या लिखाणात समाजभावनेचा निचरा : विलास देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:59 IST

साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी केले.

ठळक मुद्देकाळे यांच्या तीन पुस्तकांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साहित्य हे संवेदनशील व्यक्तीच्या भावनांचा निचरा करणारे, समाजाचे कलापूर्ण प्रतिबिंब व विवेकवादी विवेचन असते. डॉ. दिनेश काळे यांच्या लिखाणात समाजाचे असेच प्रतिबिंब उमटले आहे, असे प्रतिपादन अ. भा. म. साहित्य महामंडळाचे माजी कोषाध्यक्ष डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांनी केले.श्री नवयुवक स्नेह मंडळ वाचनालय , महाल यांच्यातर्फे ‘वेगळ्या वाटा आणि वळणे’ या कार्यक्रमांतर्गत नुकतेच लेखक डॉ. दिनेश काळे यांच्या पुस्तकांवर चर्चा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. काळे यांच्या ‘साद-पडसाद’, ‘मनातले’ व ‘कळायला लागल्यापासून’ या तीन पुस्तकांवर पत्रकार शफी पठाण आणि आर. एस. मुंडले महाविद्याालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. सीमा पागे यांनी भाष्य केले. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार आनंद निर्बाण उपस्थित होते. डॉ. देशपांडे पुढे म्हणाले, काळे यांनी ललित लिखाणापासून तर परराष्ट्र धोरणापर्यंत विपुल लेखन केले आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्याला कोणतेही 'लेबल' लावता येत नाही. इतक्या कमी वयात ५० वर पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यातून त्यांचा लिखाणाचा व्यासंग स्पष्ट होतो. प्रा. सीमा पागे म्हणाल्या, डॉ. काळे या लेखकाच्या आत एक मनोचिकित्सक दडलेला आहे. यांच्या ‘साद-पडसाद’, ‘मनातले’, ‘कळायला लागल्यापासून’ या तिन्ही पुस्तकांमध्ये तो मनोचिकित्सक वेगवेगळया पातळीवर व्यक्त होत असतो. त्यांचे लिखाण हळूवार सोप्या भाषेत असल्याने ते वाचकांना लगेच आपलेसे करते. शफी पठाण यांनी पुस्तकांवर भाष्य करताना यात विशद करण्यात आलेली वर्तमान राजकीय परिस्थिती आज संक्रमणातून जात असल्याचे सांगितले. भारताच्या अर्थकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, समाजकारणाचा संबंध राजकारणाशी आहे, धर्मकारणाचा संबंध राजकारणाशी आहे. त्यामुळे या देशातील कुणीही मनात असो वा नसो स्वत:ला राजकारणापासून वेगळे करू शकत नाही. परंतु नैतिकतेची सर्व बंधने मोडून आज राजकारण ज्या वळणावर पोहोचले आहे त्या वळणावर सामान्य नागरिकांनी काय करावे, याचे मार्गदर्शन काळेंच्या पुस्तकात वाचकांना मिळते, याकडेही पठाण यांनी लक्ष वेधले. प्रास्ताविक डॉ. दिशेन काळे तर संचालन अचिता देशमुख यांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यnagpurनागपूर