शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

समाजसेवा ही ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही - सरसंघचालक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 14:35 IST

मेडिकलमधील दीनदयाल भरड अन्न थालीचे लोकार्पण

नागपूर : १४० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात केवळ सरकारकडूनच समाजाच्या सेवेची अपेक्षा करणे अयोग्य आहे. मात्र, समाजाच्या सेवेसाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपला देश म्हणून प्रत्येकाने समाजसेवा करायला हवी. ती एखादा ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही, असे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मेडिकल इस्पितळात श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे संचालित दीनदयाल थालीच्या सायंकालीन भरड अन्न थालीच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान ते मंगळवारी बोलत होते.

मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला आ.मोहन मते, जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या काळात अन्न, वस्त्र व निवारा यांच्यासोबतच आरोग्य व शिक्षण याही मूलभूत गरजा झाल्या आहेत. मात्र, देशाची लोकसंख्या पाहता, शासन व प्रशासनही प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकत नाही. अशा स्थितीत नागरिकांनी स्वत: पुढाकार घेत, समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे.

जोपर्यंत देशात सर्वच प्रकारची समानता येत नाही, तोपर्यंत सेवेची आवश्यकता भासणारच आहे. सेवा करताना त्यात दयेचा नव्हे, तर करुणेचा भाव असावा. सेवेच्या भावनेत स्वार्थ नकोत, तर आपलेपणा असणे जास्त महत्त्वाचे आहे. करुणेचे महत्त्व जगालाही पटले असून, नागपुरात झालेल्या ‘सी-२० समिट’मध्येही त्यावर मंथन झाले. करुणेचे ‘ग्लोबलायझेशन’ होण्याची आवश्यकता आहे, असे सरसंघ चालक म्हणाले. यावेळी दिव्यांग मुलांना ‘हेल्थ कार्ड’ देण्यात आले. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविकाच्या दरम्यान दीनदयाल थाली आता दोन्ही वेळेला उपलब्ध राहील, असे सांगत, नवीन प्रकल्पांविषयी माहिती दिली. रेणुका देशकर यांनी संचालन केले, तर पराग सराफ यांनी आभार मानले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर