शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

समाजसेवा ही ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही - सरसंघचालक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 14:35 IST

मेडिकलमधील दीनदयाल भरड अन्न थालीचे लोकार्पण

नागपूर : १४० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात केवळ सरकारकडूनच समाजाच्या सेवेची अपेक्षा करणे अयोग्य आहे. मात्र, समाजाच्या सेवेसाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपला देश म्हणून प्रत्येकाने समाजसेवा करायला हवी. ती एखादा ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही, असे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मेडिकल इस्पितळात श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे संचालित दीनदयाल थालीच्या सायंकालीन भरड अन्न थालीच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान ते मंगळवारी बोलत होते.

मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला आ.मोहन मते, जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या काळात अन्न, वस्त्र व निवारा यांच्यासोबतच आरोग्य व शिक्षण याही मूलभूत गरजा झाल्या आहेत. मात्र, देशाची लोकसंख्या पाहता, शासन व प्रशासनही प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकत नाही. अशा स्थितीत नागरिकांनी स्वत: पुढाकार घेत, समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे.

जोपर्यंत देशात सर्वच प्रकारची समानता येत नाही, तोपर्यंत सेवेची आवश्यकता भासणारच आहे. सेवा करताना त्यात दयेचा नव्हे, तर करुणेचा भाव असावा. सेवेच्या भावनेत स्वार्थ नकोत, तर आपलेपणा असणे जास्त महत्त्वाचे आहे. करुणेचे महत्त्व जगालाही पटले असून, नागपुरात झालेल्या ‘सी-२० समिट’मध्येही त्यावर मंथन झाले. करुणेचे ‘ग्लोबलायझेशन’ होण्याची आवश्यकता आहे, असे सरसंघ चालक म्हणाले. यावेळी दिव्यांग मुलांना ‘हेल्थ कार्ड’ देण्यात आले. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविकाच्या दरम्यान दीनदयाल थाली आता दोन्ही वेळेला उपलब्ध राहील, असे सांगत, नवीन प्रकल्पांविषयी माहिती दिली. रेणुका देशकर यांनी संचालन केले, तर पराग सराफ यांनी आभार मानले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर