शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"समाजसेवा ही ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही"; मेडिकलमधील दीनदयाल भरड अन्न थालीचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2023 21:24 IST

Nagpur News आपला देश म्हणून प्रत्येकाने समाजसेवा करायला हवी. ती एखादा ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही, असे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. दीनदयाल थालीच्या सायंकालीन भरड अन्न थालीच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान ते मंगळवारी बोलत होते.

नागपूर : १४० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात केवळ सरकारकडूनच समाजाच्या सेवेची अपेक्षा करणे अयोग्य आहे. मात्र समाजाच्या सेवेसाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपला देश म्हणून प्रत्येकाने समाजसेवा करायला हवी. ती एखादा ‘ठेका’ घेऊन करायची गोष्ट नाही, असे मत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. मेडिकल इस्पितळात श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टद्वारे संचालित दीनदयाल थालीच्या सायंकालीन भरड अन्न थालीच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान ते मंगळवारी बोलत होते.

मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला आ.मोहन मते, जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते. आजच्या काळात अन्न, वस्त्र व निवारा यांच्यासोबतच आरोग्य व शिक्षण यादेखील मुलभूत गरजा झाल्या आहेत. मात्र देशाची लोकसंख्या पाहता शासन व प्रशासनदेखील प्रत्येकाची गरज पूर्ण करू शकत नाही. अशा स्थितीत नागरिकांनी स्वत: पुढाकार घेत समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला पाहिजे. जोपर्यंत देशात सर्वच प्रकारची समानता येत नाही तोपर्यंत सेवेची आवश्यकता भासणारच आहे. सेवा करताना त्यात दयेचा नव्हे तर करुणेचा भाव असावा. सेवेच्या भावनेत स्वार्थ नकोत तर आपलेपणा असणे जास्त महत्त्वाचे आहे. करुणेचे महत्त्व जगालादेखील पटले असून नागपुरात झालेल्या ‘सी-२० समिट’मध्येदेखील त्यावर मंथन झाले. करुणेचे ‘ग्लोबलायझेशन’ होण्याची आवश्यकता आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

यावेळी दिव्यांग मुलांना ‘हेल्थ कार्ड’ देण्यात आले. श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी प्रास्ताविकादरम्यान दीनदयाल थाली आता दोन्ही वेळेला उपलब्ध राहील, असे सांगत नवीन प्रकल्पांविषयी माहिती दिली. रेणूका देशकर यांनी संचालन केले तर पराग सराफ यांनी आभार मानले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय