शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

उपराजधानीत न्यायालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंग अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 11:34 IST

न्यायाधीश, अधिकारी, कर्मचारी, वकील, पक्षकार यांच्यासह इतर प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिवार्य करण्यात आले आहे. जे प्रकरण सुनावणीसाठी येईल, केवळ त्याच प्रकरणातील वकिलांना न्यायाधीशांच्या कक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे.

ठळक मुद्देकोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना काम असेल त्यांनाच न्यायालयात प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासह जिल्हा व सत्र न्यायालय, अन्य कनिष्ठ दिवाणी व फौजदारी न्यायालये, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, कामगार न्यायालय इत्यादी सर्व न्यायालयांमध्ये विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन हा महत्त्वाचा उपाय आहे. न्यायाधीश, अधिकारी, कर्मचारी, वकील, पक्षकार यांच्यासह इतर प्रत्येकाला सोशल डिस्टन्सिंगचे पालन अनिवार्य करण्यात आले आहे. जे प्रकरण सुनावणीसाठी येईल, केवळ त्याच प्रकरणातील वकिलांना न्यायाधीशांच्या कक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. इतर प्रकरणांतील वकिलांना कक्षाच्या बाहेर नियमानुसार अंतर राखून उभे ठेवले जात आहे. नियमांचे पालन केले जाते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सुरक्षा कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.गर्दी टाळण्यासाठी सध्या सर्व न्यायालयांत केवळ तातडीची सुनावणी आवश्यक असलेली प्रकरणे ऐकली जात आहेत. न्यायालयांच्या कामकाजाची वेळ कमी करण्यात आली आहे. न्यायालयांतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच, काम असेल त्यांनाच न्यायालयात प्रवेश दिला जात आहे. पक्षकारांना न्यायालयात बोलावण्यास मनाई करण्यात आली आहे. न्यायालयाने आवश्यकतेनुसार आदेश दिला तरच, पक्षकारांना न्यायालयात प्रवेश दिला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वकिलांनी काम झाल्यानंतर न्यायालयातून निघून जावे. न्यायालयात विनाकारण बसून राहू नये असे निर्देश जारी करण्यात आले आहेत. परिणामी, न्यायालयात गर्दी होत नाही. कामकाजाच्या वेळेस केवळ बोटावर मोजण्याएवढे वकील व कर्मचारी हजर राहतात. त्यांनाही घोळका करू दिला जात नाही. सध्या केवळ तातडीची सुनावणी आवश्यक असलेली प्रकरणे ऐकण्याचीच मुभा असल्यामुळे उच्च न्यायालय व त्याखालील फौजदारी न्यायालये वगळता अन्य न्यायालयांतील न्यायिक कामकाज बंद आहे. अन्य न्यायालयांमध्ये तातडीची प्रकरणे आली तरच न्यायिक कामकाज होत आहे आणि अशी प्रकरणे त्या न्यायालयात अपवादात्मक असतात. याशिवाय उच्च न्यायालयाने सर्व प्रकरणांमधील अंतरिम आदेशांची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवून दिली आहे. परिणामी, वकिलांना अंतरिम आदेशाची मुदत वाढवून मागण्यासाठीही न्यायालयात जाण्याची आवश्यकता राहिली नाही.न्यायाधीश, वकील घेतात स्वत:ची काळजीस्वत:चे संरक्षण करण्यासाठी न्यायाधीश मास्क लावून व अन्य आवश्यक काळजी घेऊन कामकाज करीत आहेत. वकीलही मास्क लावून युक्तिवाद करीत आहेत. अ‍ॅड. अनुप गिल्डा हे सरकारी रुग्णालयाच्या विकासासंदर्भातील प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गेले होते. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व वकील कोरोनापासून स्वत:ला वाचविण्यासाठी आवश्यक काळजी घेत असल्याचे सांगितले. जिल्हा व सत्र न्यायालयातही अशीच काळजी घेतली जात आहे. तसेच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी दिली.हात निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझरहात निर्जंतुकीकरणासाठी उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयात सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. न्यायालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाने हाताला सॅनिटायझर लावणे बंधनकारक आहे. न्यायालय प्रशासन व वकिलांच्या संघटनांनी सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे. उच्च न्यायालयात तापही तपासला जात आहे. याशिवाय न्यायालय इमारती आणि परिसर निर्जंतुकीकरणाकरिता फवारणी करण्यात आली आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस