शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

...तर भविष्यातही होऊ शकते नाग‘पूर’; शहरातील पायाभूत सुविधा काळाच्या मागे

By योगेश पांडे | Updated: September 26, 2023 10:57 IST

संभाव्य धोक्यांचा अभ्यासच नव्हता, पाण्याच्या निचऱ्याचे प्रशासनाकडे व्हिजनच नाही

योगेश पांडे

नागपूर : नागपुरात शनिवारी झालेल्या पावसामुळे ‘न भूतो..’ परिस्थिती का उद्भवली? काही जण सिमेंट रस्त्यांना तर काही जण अतिक्रमणाला दोष देत आहेत. मात्र, तज्ज्ञांच्या मते केवळ विकासकामांमुळेच शहरात पाणी तुंबलेले नाही. शहरातील पायाभूत सुविधा या काही दशके अगोदरच्या स्थितीवर आधारित आहेत. या रचनेमध्ये बदल करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून काहीच प्रयत्न झाले नाहीत. परिणामी, शहराचे आपत्ती व्यवस्थापनदेखील कोलमडले. केवळ वरवर उपाययोजना करण्याच्या ऐवजी मनपा प्रशासनाने भविष्यातील समस्या लक्षात घेऊन पावले उचलायला हवीत. आता डोळे उघडले नाहीत, तर भविष्यात वारंवार शहरात जलभराव होण्याचे संकट असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

मुसळधार पावसामुळे तुंबलेल्या नागपूरचे चित्र जगाने पाहिले व त्यावरून राजकारणदेखील तापले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने शहरातील विविध नगररचना, पायाभूत व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांशी संवाद साधला. शहराच्या प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाला सर्वांत जास्त प्राधान्य द्यायला हवे. शहरात पूर आल्यानंतर व्यवस्थापन करण्यापेक्षा अगोदर अशी स्थिती होऊ नये यासाठी पुढाकार घेणे आवश्यक होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या भाषेत जेथे लोकसंख्येची घनता जास्त व नुकसान होण्याची शक्यता जास्त असते तिथे जास्त लक्ष देण्याची गरज होती. मनपाने पावसाळ्याअगोदर सखल भागासोबतच अशा भागांकडेदेखील लक्ष देणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्यामुळे दक्षिण पश्चिम नागपुरातील उच्चभ्रू वस्त्यांतदेखील पाणी भरलेले दिसून आले, अशी माहिती ‘टाऊन प्लॅनिंग’ क्षेत्रातील एका तज्ज्ञाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

‘स्ट्रेसर्स’कडे दुर्लक्ष झाल्याचा फटका

शहरात झालेल्या पूरपरिस्थितीला विविध बाबी जबाबदार होत्या. पाण्याचा निचरा होण्याच्या प्रणालीतच काही ‘स्ट्रेसर्स’ अगोदरपासूनच तयार झाले होते. पावसाचा वेग वाढला आणि पाण्याचा प्रवाह वेग घेऊ लागल्याने या ‘स्ट्रेसर्स पॉइंट’वर दबाव आला. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मोठा फटका बसला. नागनदीवर तसेच काठावर झालेले अतिक्रमण ही तर माहिती असलेली बाब होती. मात्र, आपत्कालीन स्थितीत पाण्याचा प्रवाह कोणकोणत्या दिशांनी जाऊ शकतो आणि त्याचा आजूबाजूच्या वस्त्यांवर नेमका किती प्रमाणात परिणाम होऊ शकतो या बाबींचा अभ्यासच नव्हता. त्यातच जलपर्णींमुळे पूरपरिस्थिती ट्रीगर झाली व त्यानंतर डॉमिनोज इफेक्टप्रमाणे एकानंतर एक संकटे येत गेली. ही एक ‘वॉर्निंग बेल’ असून, आता तरी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यावर भर दिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन व्हीएनआयटीच्या आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग विभागाचे सहयोगी प्राध्यापक तसेच डिझास्टर मॅनेजमेंट इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सेलन्सचे समन्वयक डॉ. समीर देशकर यांनी व्यक्त केले.

लोकसंख्या वाढली, मात्र व्यवस्था ‘अपडेट’ नाही

शहरातील पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था ही काही दशके जुनी आहे. त्यावेळी नागपूरची लोकसंख्या कमी होती, क्षेत्रफळदेखील कमी होते. आता लोकसंख्या तर वाढलीच आहे शिवाय विस्तारदेखील झाला आहे. मात्र, त्या तुलनेत ही व्यवस्था मात्र ‘अपडेट’ झालेली नाही. बेसा, हुडकेश्वर यासारख्या भागामध्ये तर कुठलाही सारासार विचार न करता वस्त्या उभारण्यात येत आहेत. केवळ महसूल मिळतो म्हणून नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येत आहे. मात्र, तेथे आपत्ती व्यवस्थापन, पाण्याचा निचरा यासारख्या व्यवस्थांचे कुठलेही नियोजन नाही. शहरात पायाभूत व्यवस्था अचानक बदलणे शक्य नाही. मात्र ‘व्हिजन’ ठेवून आराखडा तयार केला तर पर्यायी व्यवस्था उभारली जाऊ शकते. मनपा प्रशासनाने या बाबी आता गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहे, असाच तज्ज्ञांचा सूर आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसnagpurनागपूर