शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

...म्हणून संघाने प्रणवदांना आमंत्रित केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:36 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोप कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केल्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. मुखर्जी यांना आमंत्रित करण्यामागची भूमिका संघाचे सहसरकार्यवाह डॉ.मनमोहन वैद्य यांनीच एका लेखाच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे.

ठळक मुद्देसहसरकार्यवाहांनी मांडली भूमिका : विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोप कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केल्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. मुखर्जी यांना आमंत्रित करण्यामागची भूमिका संघाचे सहसरकार्यवाह डॉ.मनमोहन वैद्य यांनीच एका लेखाच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. मुखर्जी हे अनुभवी व परिपक्व नेता असून त्यांच्या येण्यामुळे विचारांचे आदानप्रदान होणार असल्यामुळेच त्यांना बोलविल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुखर्जी यांच्या संघस्थानी येण्याला विरोध करणाऱ्यांच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत वैद्य यांनी ही वैचारिक असहिष्णुता असल्याची टीका केली आहे.प्रणव मुखर्जी यांचे अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर निश्चित विचार आहेत. संघाने मुखर्जी यांचा अनुभव आणि परिपक्वता ध्यानात घेऊनच त्यांना आपले विचार स्वयंसेवकांसमक्ष ठेवण्यासाठी आमंत्रित केले आहे. तिथे ते देखील संघाचे विचार ऐकतील, शिक्षार्थ्यांशीदेखील त्यांचे प्रत्यक्ष भेटणे होणार आहे. यामुळे त्यांनाही संघाला थेट समजून घेण्याची संधी मिळणार आहे. विचारांचे असे आदानप्रदान ही भारताची प्राचीन परंपराच आहे, असे डॉ.वैद्य यांनी मनोगत मांडले आहे.प्रणव मुखर्जी यांनी संघाचे आमंत्रण स्वीकारल्याने जो वाद सुरू झाला आहे त्यामुळे अनेक तथाकथित उदार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे बुरखे घातलेल्या लोकांचा खरा चेहरा उघड होत आहे. या साºया विरोधानंतरही मुखर्जी यांनी कार्यक्रमाला येण्याचे ठरविले. त्यांच्या या दृढतेचे स्वागतच केले पाहिजे, असेदेखील वैद्य यांनी मत मांडले.मुखर्जी यांच्या भेटीला विरोध का ?प्रणव मुखर्जी यांच्या संघस्थानावरील भेटीला होत असलेल्या विरोधाबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. डाव्या विचारसरणीच्या संघटना विचारांच्या आदानप्रदानावर विश्वासच ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. मात्र कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांकडे वैचारिक चिंतकांचा दुष्काळ असल्यामुळे मुखर्जी यांच्या कार्यक्रमाला विरोध करून त्यांनी वैचारिक असहिष्णुता दाखवून दिली आहे. मुखर्जी यांच्यासारख्या परिपक्व व अनुभवी नेत्याना सल्ले देणे आश्चर्यजनकच आहे.

टॅग्स :RSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयnagpurनागपूर