शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

...म्हणून संघाने प्रणवदांना आमंत्रित केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:36 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोप कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केल्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. मुखर्जी यांना आमंत्रित करण्यामागची भूमिका संघाचे सहसरकार्यवाह डॉ.मनमोहन वैद्य यांनीच एका लेखाच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे.

ठळक मुद्देसहसरकार्यवाहांनी मांडली भूमिका : विरोध करणाऱ्यांवर टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोप कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित केल्यामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली. मुखर्जी यांना आमंत्रित करण्यामागची भूमिका संघाचे सहसरकार्यवाह डॉ.मनमोहन वैद्य यांनीच एका लेखाच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे. मुखर्जी हे अनुभवी व परिपक्व नेता असून त्यांच्या येण्यामुळे विचारांचे आदानप्रदान होणार असल्यामुळेच त्यांना बोलविल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुखर्जी यांच्या संघस्थानी येण्याला विरोध करणाऱ्यांच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत वैद्य यांनी ही वैचारिक असहिष्णुता असल्याची टीका केली आहे.प्रणव मुखर्जी यांचे अनेक सामाजिक आणि राष्ट्रीय विषयांवर निश्चित विचार आहेत. संघाने मुखर्जी यांचा अनुभव आणि परिपक्वता ध्यानात घेऊनच त्यांना आपले विचार स्वयंसेवकांसमक्ष ठेवण्यासाठी आमंत्रित केले आहे. तिथे ते देखील संघाचे विचार ऐकतील, शिक्षार्थ्यांशीदेखील त्यांचे प्रत्यक्ष भेटणे होणार आहे. यामुळे त्यांनाही संघाला थेट समजून घेण्याची संधी मिळणार आहे. विचारांचे असे आदानप्रदान ही भारताची प्राचीन परंपराच आहे, असे डॉ.वैद्य यांनी मनोगत मांडले आहे.प्रणव मुखर्जी यांनी संघाचे आमंत्रण स्वीकारल्याने जो वाद सुरू झाला आहे त्यामुळे अनेक तथाकथित उदार आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे बुरखे घातलेल्या लोकांचा खरा चेहरा उघड होत आहे. या साºया विरोधानंतरही मुखर्जी यांनी कार्यक्रमाला येण्याचे ठरविले. त्यांच्या या दृढतेचे स्वागतच केले पाहिजे, असेदेखील वैद्य यांनी मत मांडले.मुखर्जी यांच्या भेटीला विरोध का ?प्रणव मुखर्जी यांच्या संघस्थानावरील भेटीला होत असलेल्या विरोधाबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. डाव्या विचारसरणीच्या संघटना विचारांच्या आदानप्रदानावर विश्वासच ठेवत नाहीत. त्यामुळे त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. मात्र कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांकडे वैचारिक चिंतकांचा दुष्काळ असल्यामुळे मुखर्जी यांच्या कार्यक्रमाला विरोध करून त्यांनी वैचारिक असहिष्णुता दाखवून दिली आहे. मुखर्जी यांच्यासारख्या परिपक्व व अनुभवी नेत्याना सल्ले देणे आश्चर्यजनकच आहे.

टॅग्स :RSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयnagpurनागपूर