शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

.... तर, राज्यातील २२ जिल्ह्यांना जाणवू शकतो क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 07:30 IST

Nagpur News २२ जिल्ह्यांना औषधीचा पुरवठा करणाऱ्या नागपुरातील राज्य औषधी भांडाराची इमारतच मोडकळीस आल्याने व तातडीने जागा उपलब्ध न झाल्यास, पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआरोग्यसेवा राज्य औषधी भांडाराची इमारत पाडणार

सुमेध वाघमारेनागपूर : राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूरच्या राज्य औषधी भांडाराची इमारत मोडकळीस आल्याने, बांधकाम विभागाने इमारत पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यापूर्वी भांडाराला नवीन जागा उपलब्ध न झाल्यास, २२ जिल्ह्यांना होणारा क्षयरोग औषधांचा पुरवठा ठप्प होण्याची दाट शक्यता आहे.जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगाच्या एकूण रुग्णांपैकी २६ टक्के रुग्ण भारतात आढळतात. त्यापैकी ७० टक्के रुग्ण १५ ते ५४ वयोगटांतील आहेत. महाराष्ट्रात २०१७ मध्ये क्षयरोगाचे १,६४,७४३ रुग्ण होते. आता हा आकडा ३ लाखांजवळ पोहोचला आहे. क्षयरोग हा औषधोपचाराने बरा होणारा आजार आहे. यासाठी सरकार रुग्णांना मोफत औषधी, मोफत तपासणी, रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवास भत्ता व निक्षय पोषण योजनेतून दरमहा ५०० रुपये खात्यात जमा करते. नऊ महिन्यांपासून ते दीड वर्षापर्यंत क्षयरोगावर औषधोपचार आवश्यक ठरतो. औषधी मध्येच बंद केल्यास शरीरातील जंतू टीबीच्या औषधांना पुन्हा दाद देत नाहीत. यामुळे क्षयरोगाच्या रुग्णांसाठी नियमित औषधी महत्त्वाची ठरते, परंतु २२ जिल्ह्यांना औषधीचा पुरवठा करणाऱ्या नागपुरातील राज्य औषधी भांडाराची इमारतच मोडकळीस आल्याने व तातडीने जागा उपलब्ध न झाल्यास, पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे.-२०११ पासून औषधी पुरवठामेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात २०११ पासून राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्र नागपूरच्या वतीने आरोग्यसेवाच्या राज्य औषधी भांडारातून विदर्भासह, मराठवाड्यातील जिल्ह्यांना डॉट प्लस औषधांचा पुरवठा केला जातो. मेडिकलने नियमानुसार नुकतेच टीबी वॉर्ड परिसरातील इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट केले. त्यात मेडिकलचे क्षयरोगाचे वॉर्ड, ओपीडीसह राज्य भांडाराची इमारत मोडकळीस आल्याचे स्पष्ट केले आहे.- जागनाथ बुधवारी किंवा मनोरुग्णालयात होऊ शकते भांडारमेडिकलच्या बांधकाम विभागाने आरोग्य विभागाला औषधी भांडाराची इमारत पाडण्याच्या सूचना केल्या आहेत. याला गंभीरतेने घेत, औषधी भांडाराचे अधिकारी पयार्यी जागेचा शोध घेत आहेत. एका अधिकाऱ्यांने सांगितले, जागनाथ बुधवारी येथील जिल्हा क्षयरोग केंद्र किंवा प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर बांधकाम करून, तिथे राज्य औषधी भांडार स्थानांतरित करता येऊ शकते, परंतु यासाठी वरच्या स्तरावर तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्य