शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

एसएनडीएल बेचैन, महावितरण तयार : दिवसभर होते मुंबईकडे लक्ष, सुरू होत्या बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:59 IST

शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या एसएनडीएलने महावितरणला पत्र पाठवून वीज वितरणाची जबाबदारी पूर्ववत सांभाळू शकत नाही, अशी मागणी केल्यामुळे बुधवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना पत्र पाठवून कामावर उपस्थित राहण्याचे अपिल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या एसएनडीएलने महावितरणला पत्र पाठवून वीज वितरणाची जबाबदारी पूर्ववत सांभाळू शकत नाही, अशी मागणी केल्यामुळे बुधवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. एसएनडीएलचे कर्मचारी मात्र चिंतेत होते. तिकडे मुंबईत बैठकांचा जोर सुरू होता. आता एसएनडीएल दावा करीत आहे की, त्यांची महावितरणसोबत चर्चा यशस्वी ठरली आहे. मात्र महावितरणचे म्हणणे आहे की, शहरातील विजेची जबाबदारी सांभाळायला आम्ही तयार आहोत.एसएनडीएलच्या शहरातील सर्व कार्यालयात आज सकाळपासून पत्राची चर्चा सुरू होती. दरम्यान कंपनीचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराना यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल करून कामावर उपस्थित राहण्याचा आग्रह केला. त्यांनी ई-मेलमध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत स्पष्ट केले की, कंपनीला व्हेंडर व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास अडचणी आहे. त्यामुळे कंपनीने महावितरणकडून सहकार्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, कंपनी वीज पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे. कर्मचारी शहराच्या हितार्थ काम करण्यास इच्छुक आहे.दुसरीकडे महावितरणचे जनसंपर्क सल्लागार पी.एस. पाटील म्हणाले की, कंपनी घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे. कुठल्याही अपात्कालीन स्थितीत कंपनी नागपूरची जबाबदारी सांभाळायला तयार आहे. महावितरणने अभियंता व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तयारी सुरू केली आहे. परंतु जे काही होणार आहे, ते फ्रेंचायसी करारांतर्गत होणार आहे. करारानुसार मध्येच काम सोडल्यामुळे एसएनडीएलवर दंडाची वसुली करावी का, यासंदर्भातही विचार होत आहे.महावितरणशी चर्चा यशस्वी - खुरानाएसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराना यांनी लोकमतला सांगितले की, कंपनीची महावितरणशी चर्चा यशस्वी झाली आहे. महावितरणने कंपनीच्या तक्रारी ऐकून घेत, समजूनही घेतल्या आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कंपनी शहराचा वीज पुरवठा कुठल्याही परिस्थितीत बाधित होऊ देणार नाही. कंपनीसाठी शहराच्या नागरिकांचे हित महत्त्वाचे आहे. वित्तीय संकटातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने बँकेसोबतही चर्चा सुरू केली आहे.ठेकेदारांचे २० कोटी रुपये अडकलेया घटनाक्रमामुळे एसएनडीएलमध्ये काम करणारे व्हेंडर (ठेकेदार) चिंतित आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, कंपनी अनेक काम आऊटसोर्सिंगद्वारे आमच्या माध्यमातून करवून घेते. आमचे २० कोटी रुपये एसएनडीएलकडे अडकले आहे. एसएनडीएलने आपली आर्थिक स्थिती मांडल्यामुळे ते संकटात पडले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, महावितरणने त्यांची अडकलेली देयके देण्यासंदर्भातही विचार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर