शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

एसएनडीएल बेचैन, महावितरण तयार : दिवसभर होते मुंबईकडे लक्ष, सुरू होत्या बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:59 IST

शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या एसएनडीएलने महावितरणला पत्र पाठवून वीज वितरणाची जबाबदारी पूर्ववत सांभाळू शकत नाही, अशी मागणी केल्यामुळे बुधवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना पत्र पाठवून कामावर उपस्थित राहण्याचे अपिल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या एसएनडीएलने महावितरणला पत्र पाठवून वीज वितरणाची जबाबदारी पूर्ववत सांभाळू शकत नाही, अशी मागणी केल्यामुळे बुधवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. एसएनडीएलचे कर्मचारी मात्र चिंतेत होते. तिकडे मुंबईत बैठकांचा जोर सुरू होता. आता एसएनडीएल दावा करीत आहे की, त्यांची महावितरणसोबत चर्चा यशस्वी ठरली आहे. मात्र महावितरणचे म्हणणे आहे की, शहरातील विजेची जबाबदारी सांभाळायला आम्ही तयार आहोत.एसएनडीएलच्या शहरातील सर्व कार्यालयात आज सकाळपासून पत्राची चर्चा सुरू होती. दरम्यान कंपनीचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराना यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल करून कामावर उपस्थित राहण्याचा आग्रह केला. त्यांनी ई-मेलमध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत स्पष्ट केले की, कंपनीला व्हेंडर व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास अडचणी आहे. त्यामुळे कंपनीने महावितरणकडून सहकार्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, कंपनी वीज पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे. कर्मचारी शहराच्या हितार्थ काम करण्यास इच्छुक आहे.दुसरीकडे महावितरणचे जनसंपर्क सल्लागार पी.एस. पाटील म्हणाले की, कंपनी घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे. कुठल्याही अपात्कालीन स्थितीत कंपनी नागपूरची जबाबदारी सांभाळायला तयार आहे. महावितरणने अभियंता व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तयारी सुरू केली आहे. परंतु जे काही होणार आहे, ते फ्रेंचायसी करारांतर्गत होणार आहे. करारानुसार मध्येच काम सोडल्यामुळे एसएनडीएलवर दंडाची वसुली करावी का, यासंदर्भातही विचार होत आहे.महावितरणशी चर्चा यशस्वी - खुरानाएसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराना यांनी लोकमतला सांगितले की, कंपनीची महावितरणशी चर्चा यशस्वी झाली आहे. महावितरणने कंपनीच्या तक्रारी ऐकून घेत, समजूनही घेतल्या आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कंपनी शहराचा वीज पुरवठा कुठल्याही परिस्थितीत बाधित होऊ देणार नाही. कंपनीसाठी शहराच्या नागरिकांचे हित महत्त्वाचे आहे. वित्तीय संकटातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने बँकेसोबतही चर्चा सुरू केली आहे.ठेकेदारांचे २० कोटी रुपये अडकलेया घटनाक्रमामुळे एसएनडीएलमध्ये काम करणारे व्हेंडर (ठेकेदार) चिंतित आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, कंपनी अनेक काम आऊटसोर्सिंगद्वारे आमच्या माध्यमातून करवून घेते. आमचे २० कोटी रुपये एसएनडीएलकडे अडकले आहे. एसएनडीएलने आपली आर्थिक स्थिती मांडल्यामुळे ते संकटात पडले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, महावितरणने त्यांची अडकलेली देयके देण्यासंदर्भातही विचार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर