शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसएनडीएल बेचैन, महावितरण तयार : दिवसभर होते मुंबईकडे लक्ष, सुरू होत्या बैठका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 21:59 IST

शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या एसएनडीएलने महावितरणला पत्र पाठवून वीज वितरणाची जबाबदारी पूर्ववत सांभाळू शकत नाही, अशी मागणी केल्यामुळे बुधवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांना पत्र पाठवून कामावर उपस्थित राहण्याचे अपिल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराच्या वीज वितरणाची जबाबदारी असलेल्या एसएनडीएलने महावितरणला पत्र पाठवून वीज वितरणाची जबाबदारी पूर्ववत सांभाळू शकत नाही, अशी मागणी केल्यामुळे बुधवारी दिवसभर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. एसएनडीएलचे कर्मचारी मात्र चिंतेत होते. तिकडे मुंबईत बैठकांचा जोर सुरू होता. आता एसएनडीएल दावा करीत आहे की, त्यांची महावितरणसोबत चर्चा यशस्वी ठरली आहे. मात्र महावितरणचे म्हणणे आहे की, शहरातील विजेची जबाबदारी सांभाळायला आम्ही तयार आहोत.एसएनडीएलच्या शहरातील सर्व कार्यालयात आज सकाळपासून पत्राची चर्चा सुरू होती. दरम्यान कंपनीचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराना यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल करून कामावर उपस्थित राहण्याचा आग्रह केला. त्यांनी ई-मेलमध्ये कंपनीच्या आर्थिक स्थितीचा हवाला देत स्पष्ट केले की, कंपनीला व्हेंडर व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास अडचणी आहे. त्यामुळे कंपनीने महावितरणकडून सहकार्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, कंपनी वीज पुरवठा करण्यास कटिबद्ध आहे. कर्मचारी शहराच्या हितार्थ काम करण्यास इच्छुक आहे.दुसरीकडे महावितरणचे जनसंपर्क सल्लागार पी.एस. पाटील म्हणाले की, कंपनी घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहे. कुठल्याही अपात्कालीन स्थितीत कंपनी नागपूरची जबाबदारी सांभाळायला तयार आहे. महावितरणने अभियंता व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची तयारी सुरू केली आहे. परंतु जे काही होणार आहे, ते फ्रेंचायसी करारांतर्गत होणार आहे. करारानुसार मध्येच काम सोडल्यामुळे एसएनडीएलवर दंडाची वसुली करावी का, यासंदर्भातही विचार होत आहे.महावितरणशी चर्चा यशस्वी - खुरानाएसएनडीएलचे व्यवसाय प्रमुख सोनल खुराना यांनी लोकमतला सांगितले की, कंपनीची महावितरणशी चर्चा यशस्वी झाली आहे. महावितरणने कंपनीच्या तक्रारी ऐकून घेत, समजूनही घेतल्या आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्नसुद्धा सुरू आहे. त्यांनी स्पष्ट केले की, कंपनी शहराचा वीज पुरवठा कुठल्याही परिस्थितीत बाधित होऊ देणार नाही. कंपनीसाठी शहराच्या नागरिकांचे हित महत्त्वाचे आहे. वित्तीय संकटातून मार्ग काढण्यासाठी कंपनीने बँकेसोबतही चर्चा सुरू केली आहे.ठेकेदारांचे २० कोटी रुपये अडकलेया घटनाक्रमामुळे एसएनडीएलमध्ये काम करणारे व्हेंडर (ठेकेदार) चिंतित आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, कंपनी अनेक काम आऊटसोर्सिंगद्वारे आमच्या माध्यमातून करवून घेते. आमचे २० कोटी रुपये एसएनडीएलकडे अडकले आहे. एसएनडीएलने आपली आर्थिक स्थिती मांडल्यामुळे ते संकटात पडले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, महावितरणने त्यांची अडकलेली देयके देण्यासंदर्भातही विचार करणे गरजेचे आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर