शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

नागपुरात  साप पकडण्याचा व्यवसाय जोरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:02 IST

पूर्वी साप दिसल्यास त्याला मारले जायचे. आता जनजागृतीमुळे आता साप दिसताच सर्पमित्रांना बोलावण्यात येते. हे लक्षात घेत काही सर्पमित्रांनी साप पकडण्याचा व्यवसायच बनविला आहे. शहरातील अनेक युवक पैसे कमविण्याच्या लालसेपोटी सर्पमित्र बनत आहे. काही सर्पमित्र साप पकडल्यानंतर ५०० ते १००० रुपये घेत आहे. पैसे न दिल्यास साप त्यांच्याच घरात सोडून देण्याची धमकी देत आहे. त्यामुळे सामान्य माणूस सर्पमित्रांची मागणी पूर्ण करीत आहे. अशा काही सर्पमित्रामुळे निस्वार्थ सेवा देणाऱ्या सर्पमित्रांची प्रतिमा खराब होत आहे.

ठळक मुद्देपैशाच्या लालसेत युवक बनताहेत सर्पमित्र : पैसे न दिल्यास साप सोडण्याची देताहेत धमकी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पूर्वी साप दिसल्यास त्याला मारले जायचे. आता जनजागृतीमुळे आता साप दिसताच सर्पमित्रांना बोलावण्यात येते. हे लक्षात घेत काही सर्पमित्रांनी साप पकडण्याचा व्यवसायच बनविला आहे. शहरातील अनेक युवक पैसे कमविण्याच्या लालसेपोटी सर्पमित्र बनत आहे. काही सर्पमित्र साप पकडल्यानंतर ५०० ते १००० रुपये घेत आहे. पैसे न दिल्यास साप त्यांच्याच घरात सोडून देण्याची धमकी देत आहे. त्यामुळे सामान्य माणूस सर्पमित्रांची मागणी पूर्ण करीत आहे. अशा काही सर्पमित्रामुळे निस्वार्थ सेवा देणाऱ्या सर्पमित्रांची प्रतिमा खराब होत आहे.वाठोडा परिसरात आठवड्याभरापूर्वी एका गरीब महिलेच्या घरात साप निघाला होता. महिलेने एका सर्पमित्राला बोलाविले. त्याने सापही पकडला. मात्र साप घेऊन जाण्यासाठी त्याने महिलेकडून एक हजार रुपयांची मागणी केली. त्या महिलेने पैसे देण्यास असमर्थतता दर्शविली. मात्र सर्पमित्राने साप घरातच सोडून देण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने उधार घेऊन सर्पमित्राला पैसे दिले. साप मारल्याशिवाय पर्याय नाहीसूत्रांनी सांगितले की, कामठी परिसरातील काही गावांमध्ये साप निघाल्यानंतर लोक सर्पमित्राला बोलावित होते. सर्पमित्राने साप पकडल्यास पेट्रोलचा खर्च म्हणून स्थानिक रहिवासी त्यांना १०० ते २०० रुपये देत होते. परंतु आता काही नवीन सर्पमित्र त्यांच्या गावात साप पकडण्यासाठी येतात. हे सर्पमित्र गावकऱ्यांकडून मनमानी पैशांची मागणी करतात. त्यामुळे गावकऱ्यांनी सर्पमित्राच्या मागे धावणे बंद केले असून, स्वत:च सापाला मारत आहे. वन विभागाकडून पैसे मिळत नाहीनागरिकांचा भ्रम आहे की, साप पकडल्यानंतर सर्पमित्रांना वन विभागाकडून मानधन दिले जाते. परंतु सर्पमित्रांना अशी कुठलीही रक्कम मिळत नाही. आम्ही फीडबॅक सुद्धा घेतोविदर्भ सर्पमित्र समितीचे अध्यक्ष मोनू सिंह म्हणाले की, त्यांना बरेचदा नागरिकांकडून साप पकडल्यानंतर हजार रुपये मागितल्याच्या तक्रारी मिळाल्या आहे. अशा सर्पमित्रावर वन विभागाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. आम्ही आपल्या सदस्यांना स्पष्ट सांगतो की, हे काम पैसे घेऊन करायचे नाही. कुणी जर पेट्रोल खर्च म्हणून १००, २०० रुपये दिले तर ठीक. अन्यथा नाही दिले तरी मानव व साप वाचविण्याचे सामाजिक काम करायचे आहे. आम्ही कॉल आल्यानंतर सर्पमित्राला पाठवितो, त्यानंतर संबंधित व्यक्तीचा फीडबॅक सुद्धा घेतो.

टॅग्स :snakeसापnagpurनागपूर