शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

नागपुरात  साप पकडण्याचा व्यवसाय जोरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:02 IST

पूर्वी साप दिसल्यास त्याला मारले जायचे. आता जनजागृतीमुळे आता साप दिसताच सर्पमित्रांना बोलावण्यात येते. हे लक्षात घेत काही सर्पमित्रांनी साप पकडण्याचा व्यवसायच बनविला आहे. शहरातील अनेक युवक पैसे कमविण्याच्या लालसेपोटी सर्पमित्र बनत आहे. काही सर्पमित्र साप पकडल्यानंतर ५०० ते १००० रुपये घेत आहे. पैसे न दिल्यास साप त्यांच्याच घरात सोडून देण्याची धमकी देत आहे. त्यामुळे सामान्य माणूस सर्पमित्रांची मागणी पूर्ण करीत आहे. अशा काही सर्पमित्रामुळे निस्वार्थ सेवा देणाऱ्या सर्पमित्रांची प्रतिमा खराब होत आहे.

ठळक मुद्देपैशाच्या लालसेत युवक बनताहेत सर्पमित्र : पैसे न दिल्यास साप सोडण्याची देताहेत धमकी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पूर्वी साप दिसल्यास त्याला मारले जायचे. आता जनजागृतीमुळे आता साप दिसताच सर्पमित्रांना बोलावण्यात येते. हे लक्षात घेत काही सर्पमित्रांनी साप पकडण्याचा व्यवसायच बनविला आहे. शहरातील अनेक युवक पैसे कमविण्याच्या लालसेपोटी सर्पमित्र बनत आहे. काही सर्पमित्र साप पकडल्यानंतर ५०० ते १००० रुपये घेत आहे. पैसे न दिल्यास साप त्यांच्याच घरात सोडून देण्याची धमकी देत आहे. त्यामुळे सामान्य माणूस सर्पमित्रांची मागणी पूर्ण करीत आहे. अशा काही सर्पमित्रामुळे निस्वार्थ सेवा देणाऱ्या सर्पमित्रांची प्रतिमा खराब होत आहे.वाठोडा परिसरात आठवड्याभरापूर्वी एका गरीब महिलेच्या घरात साप निघाला होता. महिलेने एका सर्पमित्राला बोलाविले. त्याने सापही पकडला. मात्र साप घेऊन जाण्यासाठी त्याने महिलेकडून एक हजार रुपयांची मागणी केली. त्या महिलेने पैसे देण्यास असमर्थतता दर्शविली. मात्र सर्पमित्राने साप घरातच सोडून देण्याची धमकी दिली. त्यामुळे तिने उधार घेऊन सर्पमित्राला पैसे दिले. साप मारल्याशिवाय पर्याय नाहीसूत्रांनी सांगितले की, कामठी परिसरातील काही गावांमध्ये साप निघाल्यानंतर लोक सर्पमित्राला बोलावित होते. सर्पमित्राने साप पकडल्यास पेट्रोलचा खर्च म्हणून स्थानिक रहिवासी त्यांना १०० ते २०० रुपये देत होते. परंतु आता काही नवीन सर्पमित्र त्यांच्या गावात साप पकडण्यासाठी येतात. हे सर्पमित्र गावकऱ्यांकडून मनमानी पैशांची मागणी करतात. त्यामुळे गावकऱ्यांनी सर्पमित्राच्या मागे धावणे बंद केले असून, स्वत:च सापाला मारत आहे. वन विभागाकडून पैसे मिळत नाहीनागरिकांचा भ्रम आहे की, साप पकडल्यानंतर सर्पमित्रांना वन विभागाकडून मानधन दिले जाते. परंतु सर्पमित्रांना अशी कुठलीही रक्कम मिळत नाही. आम्ही फीडबॅक सुद्धा घेतोविदर्भ सर्पमित्र समितीचे अध्यक्ष मोनू सिंह म्हणाले की, त्यांना बरेचदा नागरिकांकडून साप पकडल्यानंतर हजार रुपये मागितल्याच्या तक्रारी मिळाल्या आहे. अशा सर्पमित्रावर वन विभागाकडून कारवाई होणे आवश्यक आहे. आम्ही आपल्या सदस्यांना स्पष्ट सांगतो की, हे काम पैसे घेऊन करायचे नाही. कुणी जर पेट्रोल खर्च म्हणून १००, २०० रुपये दिले तर ठीक. अन्यथा नाही दिले तरी मानव व साप वाचविण्याचे सामाजिक काम करायचे आहे. आम्ही कॉल आल्यानंतर सर्पमित्राला पाठवितो, त्यानंतर संबंधित व्यक्तीचा फीडबॅक सुद्धा घेतो.

टॅग्स :snakeसापnagpurनागपूर