शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतून सोने, चांदी, हिरे आणखी कशा-कशाची तस्करी? १५ दिवसांत दोन मोठ्या खेप पकडल्या 

By नरेश डोंगरे | Updated: November 3, 2023 19:12 IST

रेल्वे सुरक्षा दलासह वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी अवघ्या १५ दिवसांत सोने आणि चांदीच्या दोन मोठ्या डिल पकडून तस्करीचा भंडाफोड केल्याने रेल्वे पोलीस, सुरक्षा दलासह साऱ्याच तपास यंत्रणांचे नेत्र विस्फारले आहे.

नागपूर : देशभरातील तस्करांनी सोने, चांदी, हिरे आणि अशाच माैल्यवान चिजवस्तूंची रेल्वेतून धडाक्यात तस्करी चालविली आहे. विविध रेल्वेगाड्यांमधून तस्करांचे हस्तक बेमालुमपणे कोट्यवधींचा माल ईकडून तिकडे करीत आहेत. रेल्वे सुरक्षा दलासह वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी अवघ्या १५ दिवसांत सोने आणि चांदीच्या दोन मोठ्या डिल पकडून तस्करीचा भंडाफोड केल्याने रेल्वे पोलीस, सुरक्षा दलासह साऱ्याच तपास यंत्रणांचे नेत्र विस्फारले आहे.

देशात आधी सोने-चांदीची तस्करी सागरी मार्गाने केली जायची. मोठमोठ्या खेप वेगवेगळ्या बंदरावर पोहचायच्या. मात्र, सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्याने तस्करांचे डाव उधळले गेले. कोट्यवधींचा माल पकडला जाऊ लागल्याने विदेशात धागेदोरे असलेल्या तस्करांनी हवाई मार्ग निवडला. मात्र, वेगवेगळ्या विमानतळावर सोने तस्कर जेरबंद होऊ लागल्याने तस्करांनी आता सोने-चांदीची तस्करी करण्यासाठी रेल्वेची निवड केली आहे. बांगलादेशातून कोलकाता मार्गे उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात आणली जाणारी अशीच एक सोन्याची खेप डीआरआयने आरपीएफच्या मदतीने पकडली. या प्रकरणात ११ जणांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल ३२ किलो सोने जप्त करण्यात आले.

विशेष म्हणजे, या गोल्ड स्मगलिंगची चाैकशी सुरूच असताना रेल्वे सुरक्षा दलाने गुरुवारी गोंदियाजवळ शालीमार एक्सप्रेसमध्ये तस्करीची ५० किलो चांदी पकडून पुन्हा चांदी तस्करीचा भंडाफोड केला. अशा प्रकारे १५ दिवसांपूर्वी रेल्वेगाडीतून तस्करी करून आणलेले सोने आणि आता चांदी आणि तत्पूर्वी दुर्मिळ कासवं जप्त करण्यात आल्याने 'रेल्वे गाड्या आणि तस्करी'चा मुद्दा जोरदार चर्चेला आला आहे. केवळ, सोने चांदीच नव्हे तर हिरे आणि अन्य माैल्यवान चिजवस्तूंचीही रेल्वेतून नियमित तस्करी केली जात असल्याची जोरदार चर्चा ऐकायला येत आहे.

छत्तीसगड-मध्य प्रदेशची दारू, ओडिशाचा गांजा अन् मुंबईची एमडीरेल्वे गाड्यातून दारू, गांजा, एमडी अशा अंमली पदार्थांची तस्करी जवळपास रोजच होते. छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात नकली ब्रॅण्डेड दारू तयार केली जाते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात या दारूची रेल्वेने तस्करी केली जाते.

ओडिशातील मलकनगिरी, संभलपूर येथून कोलकाता मार्गाने रेल्वेने गांजा आणला जातो आणि ती खेप महाराष्ट्र, मध्यप्रदेश, दिल्लीत पाठविली जाते. तर, सर्वात जहाल आणि महागडे समजले जाणारे मेफॅड्रोन (एमडी) हे अंमली पावडर मुंबईतून रेल्वेने ईटारसी मार्गे मध्यप्रदेश, दिल्ली, नोएडात पाठविले जाते तर अमरावती, नागपूर मार्गे महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्रासह अन्य राज्यात पोहचवले जाते.

कोट्यवधींच्या रकमेचीही हेराफेरीसोन्या-चांदीसह माैल्यवान चिजवस्तू आणि वेगवेगळे अंमली पदार्थच नव्हे तर रेल्वे गाड्यातून कोट्यवधीच्या रकमेचीही हेरफेर केली जाते. वेगवेगळ्या बॉक्समध्ये, पिंप, डब्यातून हवालाची रोकडही नागपूर मार्गे दूरदूरवर पाठविली जाते. ही हेरफेर एवढ्या सराईतपणे केली जाते की शंभरातून एखादवेळीच त्याचा तपास यंत्रणांना सुगावा लागतो आणि ती पकडली जाते.

टॅग्स :railwayरेल्वे