शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

नागपूर जिल्ह्यातल्या मोपहा पालिकेचे कचरा संकलनासाठी ‘स्मार्ट कार्ड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 10:40 IST

जिल्ह्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त शहराचा पुरस्कार मिळविणाऱ्या मोहपा पालिकेने स्वच्छता अभियानातही एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन करण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ असा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देस्वच्छता अभियानात एक पाऊल पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यात सर्वप्रथम हागणदारीमुक्त शहराचा पुरस्कार मिळविणाऱ्या मोहपा पालिकेने स्वच्छता अभियानातही एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन करण्यासाठी ‘स्मार्ट कार्ड’ असा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासोबतच स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातूनही शहरातील स्वच्छतेवर भर देण्यात येणार आहे. निवडक वॉर्डात स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येत असून, यशस्वी झाल्यास तो राज्यातील नगर पालिकांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरेल, असा विश्वास पालिकेच्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.केंद्र शासनाने २०१४ मध्ये स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. त्यात राज्यातील नगर पालिका हागणदारीमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते.त्यानुसार मोहपा पालिकेने त्यात सहभाग नोंदवीत प्रथम क्रमांक पटकावला. मोहपा ही नगर परिषद जिल्ह्यातील जुन्या १० नगर परिषदांपैकी सर्वात लहान ‘क’ वर्ग नगर परिषद आहे. मात्र तरीही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात ही नगर परिषद पहिल्या क्रमांकावर आहे. नागरिकांच्या समस्या नोंदविण्यासाठी जिल्ह्यात सर्वप्रथम टोल फ्री क्रमांक देणाऱ्या या नगर परिषदेने शहराच्या स्वच्छतेसाठी आता अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.

आॅनलाईन राहणार ‘वॉच’स्वच्छ भारत अभियानांतर्गत पालिकेने कचरा संकलनासाठी स्वत:चे अ‍ॅप विकसित केले आहे. शहरातील सर्व मालमत्ताधारकांना एक युनिक स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. कार्डच्या मागे क्यूआर कोड असणार आहे. प्रत्येक कुटुंबाने दररोज त्यांच्याकडील ओला आणि सुका कचऱ्याचे विलगीकरण करून कचरागाडीत टाकल्यानंतर कचरा संकलक त्याच्याकडील मोबाईलद्वारे कार्डचा क्यूआर कोड स्कॅन करेल. लगेच कचरा संकलनाची माहिती सर्व्हरवर अपलोड होईल. कोणत्या कुटुंबाकडून कचरा संकलित केला, केव्हा केला याची डिजिटल स्वरूपात नोंद होणार आहे. त्यामुळे कचरा संकलनाच्या कामातील हयगय, टाळाटाळ, नागरिकांच्या तक्रारी याला आळा बसणार आहे. कचरागाडी सध्या कोठे आहे, संकलनाच्या दैनिक, आठवडी, मासिक अहवालासोबतच कचरागाडीत कचरा न टाकता इतरत्र टाकणारे ओळखता येणार आहे. या प्रणालीवर संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ‘आॅनलाईन वॉच’ राहणार आहे.

नागरिकांचे सहकार्य गरजेचेसध्या वॉर्ड क्र. १, १० आणि १२ साठी या प्रणालीचा वापर करण्यास नगर पालिकेने सुरुवात केली आहे. यात नगराध्यक्ष, पदाधिकारी व सर्व नगरसेवक यांचे सहकार्य मिळत आहे. या उपक्रमासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नागरिकांच्या सहकार्यानेच शहर स्वच्छ राहील.- हरिश्चंद्र टाकरखेडे,मुख्याधिकारी, न.प. मोहपा.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान