शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

गावगाड्याचे शिल्पकार बारा बलुतेदार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 09:50 IST

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाऊन सुरू केले आहे. कामे व व्यवहार ठप्प झाल्याने गावगाड्याची सेवा करणारे बारा बलुतेदार अडचणीत आले असून शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाऊन सुरू केले आहे. त्याचा परिणाम शहरी जीवनमानासोबतच ग्रामीण जीवनमानावरही होत आहे. कामे व व्यवहार ठप्प झाल्याने गावगाड्याची सेवा करणारे बारा बलुतेदार अडचणीत आले असून शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाने केली आहे.या परिस्थितीमध्ये शासनाकडून काही विशेष पॅकेज जाहीर होणार का, असा प्रश्न बारा बलुतेदार व्यवसायातील नाभिक, परीट, सुतार, कुंभार, गुरव, भोई, शिंपी, सोनार, बेलदार, लोहार, साळी, भावसार, ग्रामजोशी, कोळी, चर्मकार यांच्याकडून विचारला जात आहे. बलुतेदार वर्ग हा बहुतांशी भूमिहीन असल्याने त्यांची गुजराण व्यवसायांवरच अवलंबून आहे. यातील ९० टक्के व्यावसायिकांची दुकाने, घरे भाडेतत्त्वावर असून अनेकांवर पतसंस्था, बँका, फायनान्स कंपन्यांचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत या कर्जाला मुदतवाढ मिळून संपूर्ण व्याज व दंड माफ करण्यात यावे, तसेच भूमिहीन व्यावसायिकांचे घरगुती व व्यावसायिक वीजबिल माफ करावे, अशी मागणी बारा बलुतेदारांनी केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कोरोनामुळे बारा बलुतेदारांवर ओढवत असलेल्या समस्यांचे सूक्ष्मपणे निरीक्षण करून बांधकाम कामगारांप्रमाणे योजनेत समाविष्ट करून घ्यावे व दोन हजारांची आर्थिक मदत करावी, अशी मुख्यमंत्र्यांना ट्विटच्या माध्यमातून मागणी केली आहे.

ऐन हंगामात फटकालॉकडाऊनमुळे या समाजातील व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लग्न, समारंभ, यात्रा महोत्सव यासह विविध सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाल्याने बारा बलुतेदारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लग्नसराई व यात्रा हा त्यांचा हंगाम असतो. यावर वर्षभराची गुजराण होते. मात्र ऐन हंगामात लॉकडाऊन झाल्याने हा वर्ग हतबल झाला आहे. जवळचे तुटपुंजे भांडवल व्यवसायात गुंतवले असल्याने हाताशी काहीच रोकड शिल्लक नसल्याने अनेकांचे भविष्य काळवंडले आहे.या वर्गाला त्वरित मदत न मिळाल्यास त्यांच्यासह कुटुंबीयांवर मोठा अनर्थ ओढवू शकतो. ही परिस्थिती शोकांतिकेत बदलू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने ठोस पावले उचलावीत. दरमहा ५ हजार रुपयांची मदत त्वरित करावी व लॉकडाऊननंतर त्यांच्या व्यवसायांना उभारी देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे.- कल्याण दळे, राज्याध्यक्ष, बारा बलुतेदार महासंघ

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस