शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

गावगाड्याचे शिल्पकार बारा बलुतेदार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 09:50 IST

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाऊन सुरू केले आहे. कामे व व्यवहार ठप्प झाल्याने गावगाड्याची सेवा करणारे बारा बलुतेदार अडचणीत आले असून शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाऊन सुरू केले आहे. त्याचा परिणाम शहरी जीवनमानासोबतच ग्रामीण जीवनमानावरही होत आहे. कामे व व्यवहार ठप्प झाल्याने गावगाड्याची सेवा करणारे बारा बलुतेदार अडचणीत आले असून शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाने केली आहे.या परिस्थितीमध्ये शासनाकडून काही विशेष पॅकेज जाहीर होणार का, असा प्रश्न बारा बलुतेदार व्यवसायातील नाभिक, परीट, सुतार, कुंभार, गुरव, भोई, शिंपी, सोनार, बेलदार, लोहार, साळी, भावसार, ग्रामजोशी, कोळी, चर्मकार यांच्याकडून विचारला जात आहे. बलुतेदार वर्ग हा बहुतांशी भूमिहीन असल्याने त्यांची गुजराण व्यवसायांवरच अवलंबून आहे. यातील ९० टक्के व्यावसायिकांची दुकाने, घरे भाडेतत्त्वावर असून अनेकांवर पतसंस्था, बँका, फायनान्स कंपन्यांचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत या कर्जाला मुदतवाढ मिळून संपूर्ण व्याज व दंड माफ करण्यात यावे, तसेच भूमिहीन व्यावसायिकांचे घरगुती व व्यावसायिक वीजबिल माफ करावे, अशी मागणी बारा बलुतेदारांनी केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कोरोनामुळे बारा बलुतेदारांवर ओढवत असलेल्या समस्यांचे सूक्ष्मपणे निरीक्षण करून बांधकाम कामगारांप्रमाणे योजनेत समाविष्ट करून घ्यावे व दोन हजारांची आर्थिक मदत करावी, अशी मुख्यमंत्र्यांना ट्विटच्या माध्यमातून मागणी केली आहे.

ऐन हंगामात फटकालॉकडाऊनमुळे या समाजातील व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. लग्न, समारंभ, यात्रा महोत्सव यासह विविध सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाल्याने बारा बलुतेदारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. लग्नसराई व यात्रा हा त्यांचा हंगाम असतो. यावर वर्षभराची गुजराण होते. मात्र ऐन हंगामात लॉकडाऊन झाल्याने हा वर्ग हतबल झाला आहे. जवळचे तुटपुंजे भांडवल व्यवसायात गुंतवले असल्याने हाताशी काहीच रोकड शिल्लक नसल्याने अनेकांचे भविष्य काळवंडले आहे.या वर्गाला त्वरित मदत न मिळाल्यास त्यांच्यासह कुटुंबीयांवर मोठा अनर्थ ओढवू शकतो. ही परिस्थिती शोकांतिकेत बदलू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने ठोस पावले उचलावीत. दरमहा ५ हजार रुपयांची मदत त्वरित करावी व लॉकडाऊननंतर त्यांच्या व्यवसायांना उभारी देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे.- कल्याण दळे, राज्याध्यक्ष, बारा बलुतेदार महासंघ

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस