शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संघाने घातली जखमांवर हळुवार फुंकर

By admin | Updated: May 23, 2014 01:08 IST

यंदाच्या साहित्य संमेलनासाठी विदर्भ साहित्य संघातर्फे प्रभा गणोरकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी निवडणुकीत समोर आले. पण त्यांचा पराभव झाला. हा पराभव विदर्भ साहित्य संघाच्या

विदर्भ साहित्य संघाची तिमाही बैठक

नागपूर : यंदाच्या साहित्य संमेलनासाठी विदर्भ साहित्य संघातर्फे प्रभा गणोरकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी निवडणुकीत समोर आले. पण त्यांचा पराभव झाला. हा पराभव विदर्भ साहित्य संघाच्या जिव्हारी लागला. त्याप्रमाणेच यापूर्वी झालेल्या तीन विश्व मराठी साहित्य संमेलनाला विदर्भ साहित्य संघाचा विरोध होता. टोरॅन्टोच्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मात्र साहित्य संघाने मवाळ भूमिका घेतली आणि मोठ्या उत्साहाने काही साहित्यिकांना या संमेलनासाठी विदेशवारीची संधी दिली. पण घटनाबाह्य म्हणून हे संमेलनच वादात अडकले आणि रद्द झाले. त्यामुळे वैदर्भीय साहित्यिकांची विदेशवारीही रद्द झाली. त्यात अनेकांचे पैसेही अडकले. त्यामुळे साहित्यिकांमध्ये आलेली निराशा, मरगळ झटकून टाकण्यासाठी साहित्य संघाच्या अध्यक्षांनी त्यांच्या जखमेवर हळुवार फुंकर मारून त्यांना एक गोड बातमी देण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखविला. विदर्भ साहित्य संघाची दर तीन महिन्याने एक बैठक होते. नुकतीच ही बैठक पार पडली. साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याच्या दृष्टीने एक समिती साहित्य महामंडळातर्फे तयार करण्यात येते. या समितीवर प्रत्येक घटक संस्थांचे दोन प्रतिनिधी पाठविले जातात. या समितीवर निवड होणे महत्त्वाचे मानले जाते. ही समिती साहित्य संमेलनाचे नियोजन करणे, आयोजक संस्थेला भेट देणे, स्थळाची निवड करणे, निमंत्रणे पाठविणे, कार्यक्रम पत्रिका तयार करणे आदी कामे करते. त्यामुळेच या समितीवर घटक संस्थाकडून जबाबदार आणि ज्येष्ठ व्यक्ती पाठविण्यात येतात. बहुतेक कार्यकारिणीतीलच सदस्य या समितीवर पाठविण्याचा प्रघात आहे. संमेलनात घेण्यात येणारे ठराव कुठले आहेत, त्यातले कोणते ठराव घ्यायचे वा टाळायचे, हे नियामक मंडळ ठरविते. या नियामक मंडळावरही समिती सदस्य असतात. त्यामुळेच व्यासंग, अनुभव असणार्‍यांची निवड या समितीवर केली जाते. या समितीवर यंदा विदर्भातून वर्ध्याचे प्रदीप दाते आणि अमरावतीच्या मोना चिमोटे यांची निवड साहित्य संघाने केली आहे. यात प्रदीप दाते आयोजनाच्या बाबतीत अनुभवी आणि धडपडे आहेत. पण मोना चिमोटे या अभ्यासू प्राध्यापक असल्या तरी आयोजन, नियोजनाचा अनुभव त्यांना नाही. कार्यकारिणी सदस्यांना विश्वासात न घेताच त्यांच्यावर हा निर्णय थोपविण्यात आल्याने कार्यकारिणी सदस्यांनी निराशा व्यक्त केली. सध्याच्या राजकारणात ‘लार्जर दॅन पार्टी’ असणारे नेते यशस्वी होत आहेत. साहित्य संघाच्या अध्यक्षांनाही कदाचित हीच भूमिका पटली असावी. टोरॅन्टोच्या संमेलनासाठी मोना चिमोटे यांचे नाव साहित्य संघाने समोर केले होते. पण ते संमेलनच रद्द झाल्याने साहित्य संघावरही नामुष्की ओढवली. साहित्यिकांना विदेशात संमेलनासाठी पाठविण्याची तयारी केल्यावर संमेलनच रद्द झाल्याने ज्यांची नावे पाठविली होती ते साहित्यिक निराश झाले. त्यात भरीसभर साईट सिन पाहण्यासाठी भरलेले पैसेही ट्रॅव्हल कंपनीकडे अडकून पडले आहेत. या निराशेतून साहित्यिकांचे पुनर्वसन करण्याच्या प्रयत्नातून मोना चिमोटे यांना महामंडळाच्या समितीवर पाठविण्यात आल्याची बोचरी टीका काहींनी खाजगीत व्यक्त केली आहे. तर मोना चिमोटेंना महामंडळावर पाठविण्यात येत असताना टोरॅन्टोसाठी सुचविण्यात आलेली इतर नावे का विचारात घेत नाहीत, असाही सवाल उभा झाला आहे. बैठकीत एका सदस्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला पण अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी ‘अ‍ॅग्रेसिव्ह’ भूमिका घेतली. म्हैसाळकरांचा दबदबा साहित्य संघात सर्वश्रुत आहेच. ही नावे मी सुचविली आहेत. कोण याला विरोध करतो, त्याने समोर यावे, असे आव्हानच त्यांनी दिल्यावर कार्यकारिणी सदस्य शांत झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाद्वारे कुसुमाग्रज स्मृती विशाखा काव्य पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कार देण्यासाठी निवड समिती तयार केली जाते. या समितीवर यंदा विदर्भातून प्रभा गणोरकर यांची निवड करण्यात आली. आतापर्यंत साधारणत: कार्यकारिणी सदस्यांचीच निवड करण्यात आली आहे. तसा नियम नाही पण प्रघात आहे. याचाच लाभ घेत म्हैसाळकरांनी कार्यकारिणी सदस्य नसलेल्या प्रभा गणोरकर यांचे नाव सुचविले, फायनल केले आणि पाठविलेही. प्रभा गणोरकर विदर्भ साहित्य संघाने सुचविलेल्या उमेदवार होत्या. पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला. याची सल साहित्य संघाला आणि गणोरकरांनाही होती. या समितीवर निवड करून साहित्य संघाने त्यांना खूष करण्याचा प्रयत्न केला. आता टोरॅन्टोसाठी ज्यांची नावे पाठविण्यात आली होती, त्या उर्वरित सदस्यांसाठीही साहित्य संघ काही करते का? याची प्रतीक्षा उर्वरित साहित्यिकांना आहे. (प्रतिनिधी)