शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

नागपुरातील परिस्थिती हाताबाहेर, लॉकडाऊन लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 21:57 IST

कोरोनामुळे वाढते मृत्यू आणि बाधितांची संख्या चिंता वाढविणारी आहे. त्यातच बाजारात दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, फिजिकल डिस्टन्सचा उडालेला फज्जा, मास्कचा वापर न करता फिरणे, नियमांचे सर्रास उल्लंघन अशी परिस्थिती सर्वत्र आहे. याला आळा घालण्यासाठी संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे आहे. याचा विचार करता काही दिवसांचा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मनपातील पदाधिकाऱ्यानी मांडली आहे.

ठळक मुद्देमनपातील पदाधिकाऱ्यांची मागणी : चेन तोडल्याशिवाय संसर्ग कमी होणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे वाढते मृत्यू आणि बाधितांची संख्या चिंता वाढविणारी आहे. त्यातच बाजारात दिवसेंदिवस वाढणारी गर्दी, फिजिकल डिस्टन्सचा उडालेला फज्जा, मास्कचा वापर न करता फिरणे, नियमांचे सर्रास उल्लंघन अशी परिस्थिती सर्वत्र आहे. याला आळा घालण्यासाठी संसर्गाची साखळी तोडणे गरजेचे आहे. याचा विचार करता काही दिवसांचा लॉकडाऊन लावला जावा, अशी भूमिका मनपातील पदाधिकाऱ्यानी मांडली आहे.कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात यावा, अशी मागणी मनपातील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी सोमवारी पालकमंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.दरम्यान, लॉकडाऊन झालेच तर ते किमान एक आठवड्यांचे असावे, अशी मागणी पुढे येत आहे. सम-विषमचा नियम रद्द करण्याच्या मागणीसह चाचणीलाही विरोध करणारे अनेक व्यापारी आता लॉकडाऊनचे समर्थन करत आहेत. त्यांच्याकडील कर्मचारीच आता करोनाबाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे लॉकडाऊनची मागणी पुढे येत आहे.

लॉकडाऊन आवश्यकचशहरात कोरोनाचा वाढता संसर्ग व उपचारासाठी होत असलेल्या रुग्णांची भटकंती विचारात घेता परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी संसर्गाची साखळी खंडित करणे गरजेचे आहे. याचा विचार करता लॉकडाऊन लावला जावा, असे माझे वैयक्तिक मत आहे.पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समितीचेन ब्रेक करण्याची गरजशहरात कोरोनाबाधित व मृतकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी चेन ब्रेक करण्याची गरज आहे. यासाठी किमान एक आठवड्याचा लॉकडाऊन लावला जावा. आज रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. परिस्थिती हाताबाहेर जात आहे. याला आळा घालण्याची गरज आहे.- दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस मनपाअसे आहेत पत्रातील मुद्दे- शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन लावावा.- दर शनिवार-रविवार जनता कर्फ्यू पाळण्यात यावा.- कोरोना रुग्णांसाठी हास्पिटलमध्ये बेडची संख्या वाढविण्यात यावी.- रुग्णवाहिका अधिक संख्येने उपलब्ध कराव्यात.- ऑक्सिजन सिलिंडर मागणीनुसार उपलब्ध व्हावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर