शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सामाजिक उदारतेतून जुळल्या ऋणानुबंधाच्या रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 10:37 IST

Shankar papalkar Nagpur News ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वर्षा आणि मानसपुत्र समीर यांचा शुभविवाह रविवारी पोलीस लाईन टाकळी येथील सद्भावना लॉनमध्ये पार पडला.

ठळक मुद्देऋणानुबंधाच्या रेशीमगाठी जोडण्यासाठी दिसली सामाजिक उदारता

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काही उपक्रम हे हेतूपुरस्सर पार पाडले जातात. कारण एकच, समाजाने प्रेरणा घ्यावी. गणमान्यांनी पुढाकार घेतला की समाजही आपली उदारता दाखवतो, अशी अनेक उदाहरणे आहेत. त्याच शृंखलेत आज पार पडलेल्या विवाह सोहळ्याचा समावेश करावा लागेल. हा आनंदाचा क्षण होता, दोन मनांच्या रेशीमगाठी जोडल्या गेल्या आणि त्याला सामाजिक ऋणानुबंधाची जोडही होती. ऋणानुबंधाच्या रेशीमगाठी जोडताना भरभक्कम सामाजिक उदारता दिसून आली.

ज्येष्ठ समाजसेवक शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या वर्षा आणि मानसपुत्र समीर यांचा शुभविवाह रविवारी पोलीस लाईन टाकळी येथील सद्भावना लॉनमध्ये पार पडला. दोघेही दिव्यांग आहेत. वधूचे पालकत्त्व गृहमंत्री अनिल व आरती देशमुख यांनी तर वराचे पालकत्त्व जिल्हाधिकारी रवींद्र व ज्योत्सना ठाकरे यांनी स्वीकारले. जणू हा सोहळा देशमुख आणि ठाकरे घराण्यातील आहे, अशीच तयारी दोन्ही कुटुंबीयांची होती. अगदी वर-वधूचे आगमन ते वधूची वरघरी होणारी बिदाईपर्यंतच्या सोहळ्यात दोन्ही कुटुंबीय उपस्थित होते. वधूचे कन्यादान करताना देशमुख कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव संवेदनेचे होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, खा. कृपाल तुमाने, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपायुक्त विनिता शाहू, आ. विकास ठाकरे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, समाजसेवक गिरीश गांधी, माजी मंत्री अनिस अहमद, रणजित देशमुख, रमेश बंग, सतीश चतुर्वेदी, माजी खा. दत्ता मेघे, समाजसेविका सीमा साखरे, विष्णू मनोहर, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष माधुरी तिडके-वैद्य, सलिल देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून वधू-वरास आशीर्वाद दिले.

 सरसंघचालक मोहन भागवत यांनीही दिले आशीर्वाद

विवाह सोहळ्याचे यजमान असलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज स्वत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना राष्ट्रीय विवाह महोत्सवाचे आमंत्रण दिले. नवदाम्पत्यांना आपले आशीर्वाद देण्याची आग्रही विनंती यावेळी त्यांनी केली. विनंतीला मान देत भागवत यांनी दिलेल्या निश्चित वेळेत सोहळ्यास हजेरी लावली आणि समीर व वर्षा यांना शुभाशीर्वाद दिले.

 तत्त्वाप्रमाणे शंकरबाबा नव्हते

कुठलेही व्यासपीठ नको, कुठलीही प्रसिद्धी नको या तत्त्वाला जागत शंकरबाबा पापळकर ऐन वेळी सोहळ्यातून अदृष्य झाले. त्यांना अनिल देशमुख यांनी व्यासपीठावर पाचारण केले. मात्र, ते त्यांच्या तत्त्वाला जागत बाहेर पडले होते.

टॅग्स :marriageलग्नShankarbaba Papalkarशंकरबाबा पापळकर