शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

शटर बंद; पण व्यवसाय सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:07 IST

नागपूर : लॉकडाऊनमध्ये जीवनाश्यक वस्तूंची दुकानेवगळता सर्वच दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून बहुतांश ...

नागपूर : लॉकडाऊनमध्ये जीवनाश्यक वस्तूंची दुकानेवगळता सर्वच दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून बहुतांश व्यापारी दुकानासमोर उभे राहून ग्राहकांना दुकानातून वस्तू काढून विक्री करीत आहेत. ही स्थिती सर्वच बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. अशा प्रकारातून कोरोना संसर्गाचा धोका असला तरीही पथकासोबतच्या आर्थिक व्यवहारामुळे कारवाई होत नसल्याची माहिती आहे. दुकाने ३१ मेपर्यंत बंद राहणार आहेत, हे विशेष.

प्रत्येक व्यापाऱ्याकडे ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आहेत. या क्रमांकाद्वारे व्यापाऱ्यांतर्फे ग्राहकांसोबत संपर्क साधण्यात येत आहे. ही बाब इतवारी, मस्कासाथ, गांधीबाग, महाल, सीताबर्डी, खामला, जरीपटका, सक्करदरा, हुडकेश्वर, मानेवाडा रोड येथील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. व्यापारी घरी बसण्याऐवजी दुकानासमोर खुर्च्या टाकून बसत आहेत. मोबाईलवर संपर्क साधून ग्राहक आल्यास त्यांना दुकानाचे शटर वर करून माल देण्यात येत आहे. बहुतांश दुकानाच्या आत कर्मचारी हजर असतात. ही युक्ती सर्वच व्यापाऱ्यांनी अवलंबविली आहे. काही दिवसांपूर्वी एका दुकानातून मनपाच्या पथकाने सायंकाळी ४२ जणांना दुकानातून बाहेर काढले होते. या दुकानात ग्राहक लग्नाची खरेदी करीत होते. मनपाने दुकानदाराला दंड ठोठावला होता. अशीच युक्ती सावजी व बारमालक अवलंबित आहेत. पोलिसांनी अशांवर कारवाई करून दुकानाला सील ठोकून दंड वसूल केला होता.

नाव न सांगण्याच्या अटीवर व्यापारी म्हणाले, दुकाने एप्रिलपासून बंद आहेत. अशा संकटकाळात आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. मोबाईलवर संपर्क साधून ग्राहकांना मालाची डिलिव्हरी देण्यात येत आहे. इतवारी आणि गांधीबाग, खामला, जरीपटका भागातील अनेक कापड दुकानदार मालाची विक्री करीत आहेत. ग्राहकाला माल देण्यासाठी शटर वर करण्यात येते. त्यानंतर पुन्हा खाली होते. दुकाने बंद असतानाही वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार आणि बँकांचे कर्जाचे हप्ते सुरूच आहेत. उत्पन्न न झाल्यास भरणा कसा करणार, असा सवाल आहे. अशा पद्धतीने दररोज २० ते ३० टक्के व्यवसाय होतो. प्रशासनाने वेळेचे बंधन ठेवून दुकाने सुरू करावीत.