शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

शटर बंद; पण व्यवसाय सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:07 IST

नागपूर : लॉकडाऊनमध्ये जीवनाश्यक वस्तूंची दुकानेवगळता सर्वच दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून बहुतांश ...

नागपूर : लॉकडाऊनमध्ये जीवनाश्यक वस्तूंची दुकानेवगळता सर्वच दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून बहुतांश व्यापारी दुकानासमोर उभे राहून ग्राहकांना दुकानातून वस्तू काढून विक्री करीत आहेत. ही स्थिती सर्वच बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. अशा प्रकारातून कोरोना संसर्गाचा धोका असला तरीही पथकासोबतच्या आर्थिक व्यवहारामुळे कारवाई होत नसल्याची माहिती आहे. दुकाने ३१ मेपर्यंत बंद राहणार आहेत, हे विशेष.

प्रत्येक व्यापाऱ्याकडे ग्राहकांचे मोबाईल क्रमांक आहेत. या क्रमांकाद्वारे व्यापाऱ्यांतर्फे ग्राहकांसोबत संपर्क साधण्यात येत आहे. ही बाब इतवारी, मस्कासाथ, गांधीबाग, महाल, सीताबर्डी, खामला, जरीपटका, सक्करदरा, हुडकेश्वर, मानेवाडा रोड येथील बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. व्यापारी घरी बसण्याऐवजी दुकानासमोर खुर्च्या टाकून बसत आहेत. मोबाईलवर संपर्क साधून ग्राहक आल्यास त्यांना दुकानाचे शटर वर करून माल देण्यात येत आहे. बहुतांश दुकानाच्या आत कर्मचारी हजर असतात. ही युक्ती सर्वच व्यापाऱ्यांनी अवलंबविली आहे. काही दिवसांपूर्वी एका दुकानातून मनपाच्या पथकाने सायंकाळी ४२ जणांना दुकानातून बाहेर काढले होते. या दुकानात ग्राहक लग्नाची खरेदी करीत होते. मनपाने दुकानदाराला दंड ठोठावला होता. अशीच युक्ती सावजी व बारमालक अवलंबित आहेत. पोलिसांनी अशांवर कारवाई करून दुकानाला सील ठोकून दंड वसूल केला होता.

नाव न सांगण्याच्या अटीवर व्यापारी म्हणाले, दुकाने एप्रिलपासून बंद आहेत. अशा संकटकाळात आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. मोबाईलवर संपर्क साधून ग्राहकांना मालाची डिलिव्हरी देण्यात येत आहे. इतवारी आणि गांधीबाग, खामला, जरीपटका भागातील अनेक कापड दुकानदार मालाची विक्री करीत आहेत. ग्राहकाला माल देण्यासाठी शटर वर करण्यात येते. त्यानंतर पुन्हा खाली होते. दुकाने बंद असतानाही वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार आणि बँकांचे कर्जाचे हप्ते सुरूच आहेत. उत्पन्न न झाल्यास भरणा कसा करणार, असा सवाल आहे. अशा पद्धतीने दररोज २० ते ३० टक्के व्यवसाय होतो. प्रशासनाने वेळेचे बंधन ठेवून दुकाने सुरू करावीत.