शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

‘शुभमंगल’ला परवानगी मिळाली पण उशीर झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 23:08 IST

अनलॉकची प्रक्रिया सुरू करून टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता देत नियमांच्या अधीन राहून मंगल कार्यालय, सभागृहामध्ये ५० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आली. मात्र या परवानगीला आता खूप उशीर झाला आहे आणि संबंधित क्षेत्राची पूर्ण साखळी विस्कटली असून झालेले नुकसान भरून निघणारे नाही, अशी खंत मंगल कार्यालय व्यावसायिकांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनलॉकची प्रक्रिया सुरू करून टाळेबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता देत नियमांच्या अधीन राहून मंगल कार्यालय, सभागृहामध्ये ५० वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आली. मात्र या परवानगीला आता खूप उशीर झाला आहे आणि संबंधित क्षेत्राची पूर्ण साखळी विस्कटली असून झालेले नुकसान भरून निघणारे नाही, अशी खंत मंगल कार्यालय व्यावसायिकांनी व्यक्त केली.प्रशासनाने दिलेल्या नियमावलीनुसार मंगल कार्यालयात फिजिकल डिस्टन्स्ािंगचे पालन करत लग्नसोहळा आयोजित करण्यात येणार आहेत. मात्र या परवानगीला खूप उशीर झाला आहे. मंगल कार्यालय, लॉन व्यावसायिकांची लाखोंची कमाई बुडाली. शहरात दीड हजारावर मंगल कार्यालये आहेत. हजारावर सभागृह तर लॉनदेखील पाचशेवर आहेत. मंगल कार्यालयाचे कमीतकमी भाडे सरासरी ४० हजार ते लाखो रुपयांच्या घरात असते. लॉन आणि सभागृहाचीही स्थिती जवळपास सारखीच असते. भाड्याव्यतिरिक्त इतर शुल्क घेतले जाते. मात्र लग्न कार्यच झाले नसल्याने हे सर्व बुडाले. मंगल कार्यालयातील लग्न समारंभाशी जुळलेले कॅटरिंग व्यवसाय, बिछायत, बॅण्ड, घोडे यांचा व्यवसाय तसेच कार्यालयात काम करणारे कामगार, स्वयंपाकी यांचा रोजगार अशी पूर्ण साखळी कोलमडली. आता किमान वर्षभर तरी हे नुकसान भरून निघणार नाही, अशी व्यथा मंगल कार्यालय मालकांनी व्यक्त केली. परवानगी मिळण्यासाठी अनेकदा बैठक घेऊन शासन व प्रशासनाला निवेदने दिली. शासनाने परवानगी दिली, पण खूप उशीर केल्याची टीका व्यावसायिकांनी केली आहे.दरवर्षी याच सीझनमध्ये लाखोंची उलाढाल होत असते. मात्र यावर्षी पूर्ण सीझन खाली गेला. प्रशासनाने लोकांना घरी लग्न करण्याची परवानगी दिली व अनेकांनी ते उरकूनही घेतले. मात्र ९० टक्के लोकांच्या घरी एवढी जागा नसते, ज्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले असेल का?. हीच परवानगी मंगल कार्यालय चालकांना दिली असती तर नियमांचे पालन झाले असते आणि थोडा का होईना व्यवसायही मिळाला असता.युवराज शिर्के, मंगल कार्यालय व्यावसायिकलहान कार्यालयांना प्राधान्य, दरही कमी केलेमोठ्या मंगल कार्यालयांचे भाडे ५० व्यक्तींसाठी परवडणारे नसल्याने लहान हॉल बुकिंग केले जात आहेत. जून महिन्यात २५, २९ व ३० या तीनच तारखांचे मुहूर्त शिल्लक होते व या दिवशी अनेकांनी लग्न उरकून घेतल्याची माहिती आहे. अनेक मंगल कार्यालयाच्या मालकांनी कार्यालयांचे दर १० ते १५ हजारांनी कमी केले आहे.

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूर