शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

श्रीसूर्या प्रकरण, करडे विशेष सरकारी वकील

By admin | Updated: May 29, 2015 02:28 IST

श्रीसूर्या समूहाने केलेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याचा एमपीआयडी विशेष न्यायालयात खटला चालविण्यासाठी राज्यपालांनी अ‍ॅड. बी. एम. करडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

नागपूर : श्रीसूर्या समूहाने केलेल्या कोट्यवधीच्या घोटाळ्याचा एमपीआयडी विशेष न्यायालयात खटला चालविण्यासाठी राज्यपालांनी अ‍ॅड. बी. एम. करडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. शेकडो पीडित गुंतवणूकदारांनी शासनाकडे ही मागणी केली होती. करडे यांच्या नियुक्तीमुळे पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याची आशा बळावली आहे. समीर सुधीर जोशी आणि त्याची पत्नी पल्लवी समीर जोशी हे या महाघोटाळ्याचे म्होरके आहेत. त्यांनी मुदत ठेवींवर त्रैमासिक साडेबारा टक्के व्याजाचे आमिष दाखवून २००५ ते १४ सप्टेंबर २०१३ या काळात ५०९२ गुंतवणूकदारांची २३९ कोटी रुपयांनी फसवणूक केलेली आहे. सोमलवाडा येथील रहिवासी हॉटेल व्यवसायी अमित गोविंद मोरे यांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी समीर जोशी आणि पल्लवी जोशी यांच्याविरुद्ध १४ सप्टेंबर २०१३ रोजी भादंविच्या ४०६, ४२०, ३४ आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार (वित्तसंबंध) संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ३ अन्वये गुन्हे दाखल केले होते. आर्थिक गुन्हे पथकाकडे तपास सोपविण्यात आला होता. पोलीस निरीक्षक विष्णूपंत भोये यांनी तपास करून १३ डिसेंबर २०१३ रोजी या दोन्ही आरोपींविरुद्ध ३०२० पानी आरोपपत्र दाखल केलेले आहे. यात ६९९ जणांना साक्षीदार करण्यात आले आहे. या प्रकरणात एजंटांनाही आरोपी करण्यात आलेले आहे. सध्या समीर जोशी नागपूर मध्यवर्ती कारागृहात असून पल्लवी जामिनावर आहे.(प्रतिनिधी)