शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शहीद जवानांचं तेरावं योग्य प्रकारे झालं- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 22:07 IST

भारतीय वायूदलाने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संघ परिवारातून स्वागत करण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी शहीद जवानांच्या तेरवीचे श्राद्ध योग्य प्रकारेच झाले, असेच वक्तव्य करत या कारवाईवर भाष्य केले.

ठळक मुद्दे ‘एअर स्ट्राईक’चे संघ परिवारातून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय वायूदलाने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संघ परिवारातून स्वागत करण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी शहीद जवानांच्या तेरवीचे श्राद्ध योग्य प्रकारेच झाले, असेच वक्तव्य करत या कारवाईवर भाष्य केले.पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी जशास तसे उत्तर द्या असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका घेण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर संघाकडून अधिकृत भूमिकादेखील जाहीर करण्यात आली. तर सायंकाळी एका कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांनी आपली भावना व्यक्त केली. वायुदलाने ज्याप्रकारे कारवाई केली आहे, ती पाहता सावरकर यांचे नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले.तर सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनीदेखील वायुसेना तसेच केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांविरोधात संताप होता. त्यांना कडक प्रत्युत्तर देण्यात यावे, अशीच भारतीय लोकांची इच्छा होती. भारतीय वायुसेनेने कोट्यवधी जनतेच्या भावनांनुसार दहशतवादी तळ उद्धवस्त केले. विशेष म्हणजे यावेळी वायुसेनेने पाकिस्तानी नागरिकांना कुठलीही हानी पोहोचविली नाही. वायुसेनेचे हे कार्य भारतीय सभ्यतेनुसारच झाले आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन असल्याचे मत भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.मोदींनी दृढ राजकीय इच्छाशक्ती दाखविलीराष्ट्रसेविका समितीतर्फेदेखील या ‘एअरस्ट्राईक’बाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेने केलेल्या कामगिरीचे अभिनंदनच व्हायला हवे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला कारवाईसाठी खुली सूट दिली हेदेखील महत्त्वाचे आहे. यातून त्यांनी दृढ राजकीय इच्छाशक्ती दाखवून दिली आहे. जर कुणी देशाकडे वाकडी मान करुन पाहिले तर त्याला योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल, हे या ‘स्ट्राईक’मधून सांगण्यात आले आहे. संरक्षण दलांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे व शत्रूला कुठलीही मनमानी करु दिली जाणार नाही, असे कारवाईतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले आहे.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकMohan Bhagwatमोहन भागवतindian air forceभारतीय हवाई दल