शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

शहीद जवानांचं तेरावं योग्य प्रकारे झालं- मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 22:07 IST

भारतीय वायूदलाने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संघ परिवारातून स्वागत करण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी शहीद जवानांच्या तेरवीचे श्राद्ध योग्य प्रकारेच झाले, असेच वक्तव्य करत या कारवाईवर भाष्य केले.

ठळक मुद्दे ‘एअर स्ट्राईक’चे संघ परिवारातून स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय वायूदलाने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच संघ परिवारातून स्वागत करण्यात आले आहे. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी शहीद जवानांच्या तेरवीचे श्राद्ध योग्य प्रकारेच झाले, असेच वक्तव्य करत या कारवाईवर भाष्य केले.पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी जशास तसे उत्तर द्या असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका घेण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर संघाकडून अधिकृत भूमिकादेखील जाहीर करण्यात आली. तर सायंकाळी एका कार्यक्रमादरम्यान सरसंघचालकांनी आपली भावना व्यक्त केली. वायुदलाने ज्याप्रकारे कारवाई केली आहे, ती पाहता सावरकर यांचे नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे, असे डॉ.मोहन भागवत म्हणाले.तर सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनीदेखील वायुसेना तसेच केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांविरोधात संताप होता. त्यांना कडक प्रत्युत्तर देण्यात यावे, अशीच भारतीय लोकांची इच्छा होती. भारतीय वायुसेनेने कोट्यवधी जनतेच्या भावनांनुसार दहशतवादी तळ उद्धवस्त केले. विशेष म्हणजे यावेळी वायुसेनेने पाकिस्तानी नागरिकांना कुठलीही हानी पोहोचविली नाही. वायुसेनेचे हे कार्य भारतीय सभ्यतेनुसारच झाले आहे. यासाठी त्यांचे अभिनंदन असल्याचे मत भय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे.मोदींनी दृढ राजकीय इच्छाशक्ती दाखविलीराष्ट्रसेविका समितीतर्फेदेखील या ‘एअरस्ट्राईक’बाबत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेने केलेल्या कामगिरीचे अभिनंदनच व्हायला हवे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याला कारवाईसाठी खुली सूट दिली हेदेखील महत्त्वाचे आहे. यातून त्यांनी दृढ राजकीय इच्छाशक्ती दाखवून दिली आहे. जर कुणी देशाकडे वाकडी मान करुन पाहिले तर त्याला योग्य प्रत्युत्तर देण्यात येईल, हे या ‘स्ट्राईक’मधून सांगण्यात आले आहे. संरक्षण दलांनी नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे व शत्रूला कुठलीही मनमानी करु दिली जाणार नाही, असे कारवाईतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले आहे.

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकMohan Bhagwatमोहन भागवतindian air forceभारतीय हवाई दल