शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

३० शिक्षकांना कारणे दाखवा  :  शाळांची गुणवत्ता घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 21:39 IST

नागपूर जिल्हा परिषदेच्या ३० शाळेच्या शिक्षकांना शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे.

ठळक मुद्देभरारी पथकांच्या माध्यमातून शाळांचे सर्वेक्षण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची घसरलेली पटसंख्या, सोबतच होत असलेली गुणवत्तेची घसरण थांबविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी अध्ययन निष्पत्ती कार्यक्रम जिल्हाभर राबविला. काही शाळांना त्याचा फायदा झाला तर काही शाळांमध्ये कुठलीही प्रगती दिसून आली नाही, असे शिक्षण विभागाने भरारी पथकाच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. अशा ३० शाळेच्या शिक्षकांना शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे.शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी अध्ययन निष्पत्ती कार्यक्रम राबविला. एकदा कार्यक्रम राबविल्यानंतर त्यावर विशेषत्वाने भर देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत विशेष परिणाम झाला नाही. भाषा आणि गणित या विषयात अजूनही विद्यार्थी कमजोरच आहेत. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली की नाही, याची पाहणी करण्यासाठी जि.प. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी शाळांना भेटी देणे सुरू केले. यासाठी उपशिक्षणाधिकारी ढवंगळे व आगरकर यांच्या नेतृत्वात दोन भरारी पथके नेमण्यात आली. प्रत्येक पथकात सहा सदस्य आहे. यात विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांचाही समावेश आहे. पथकाद्वारे उलट तपासणी सुरू आहे. पथक विशेषत: दुर्गम भागातील शाळा व कमी पटसंख्येच्या शाळांना भेटी देत आहेत. ज्या शाळेतील विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयात गुणवत्ता कमी आढळली, त्या शाळेच्या शिक्षकांचा पथकाकडून अहवाल तयार करण्यात येत आहे. या अहवालाचे शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी हे अवलोकन करुन अशा गुणवत्ता कमी असलेल्या वर्गाच्या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावत आहेत. आजवर भरारी पथकाकडून सादर करण्यात आलेल्या अहवालावर अवलोकन झाल्यावर वंजारी यांनी ३० वर शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे. त्यामुळे सध्या गुणवत्ता कमी असलेल्या वर्गातील शिक्षकांमध्ये या भरारी पथकाची चांगलीच धास्ती वाढली आहे. विशेष म्हणजे सात दिवसापर्यंत उत्तर न सादर केल्यास, शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात येणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकzp schoolजिल्हा परिषद शाळा