शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअप झाला म्हणून जीव द्यायचा का? २०२१ मध्ये ७५०० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2023 08:10 IST

Nagpur News अलीकडे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देप्रेम प्रकरणातील आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले

 

सुमेध वाघमारे

नागपूर : आनंद, दु:ख, राग, भीती आदी भावनांसारखीच प्रेमही एक भावना आहे. इतर भावना ज्याप्रमाणे निर्माण होतात आणि नष्ट होतात, त्याचप्रमाणे प्रेमभावनेचेही आहे. मात्र, प्रेम करणारे काही जण या भावनांना समजून घेत नाही. ते कोणत्याही थराला जातात. विशेषत: प्रेमात अपयश आल्याचे पाहता आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. अलीकडे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रेम करणे म्हणजे त्या व्यक्तीचा तिच्या गुणदोषांसहित स्वीकार करणे. परंतु, बहुसंख्य प्रकरणांत तसे होताना दिसून येत नाही. दुसरीकडे, आपल्याला हीच प्रेयसी किंवा हाच प्रियकर हवा, याच भावनेने पछाडलेले असतात. त्याचे किंवा तिचे प्रेम मिळवणे यालाच प्राधान्य देतात. यासाठी काही जण कोणत्याही थराला जातात. यातूनच आत्महत्या, हत्या, तिचे जगणे नकोसे करणे आदी प्रकरणे समोर येतात. एकूणच भावना अनावर होत असल्याची लक्षणे ओळखल्यास व तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास यातून बाहेर पडणे सहज शक्य असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- प्रेम दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त टिकत नाही

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) मनोविकृतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी म्हणाले, ‘‘प्रेम साधारण दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. त्यानंतर परस्परांबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक संबंध आदी बाबी नातेसंबंध टिकवून ठेवतात. जिथे सकारात्मक स्थिती प्राप्त होत नाही, तिथे नैराश्यापासून ते आत्महत्येपर्यंत मानसिक आरोग्याच्या समस्यांचे भाग उद्भवतात.”

-एकूण आत्महत्यांपैकी ४.६ टक्के प्रेम प्रकरणातील अपयशाचे

डॉ. सोमानी म्हणाले, ‘‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या २०२१ च्या अधिकृत उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील एकूण आत्महत्यांपैकी ४.६ टक्के म्हणजे सुमारे ७५०० मृत्यू हे प्रेम प्रकरणातील अपयशाचे आहेत. त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले आहे. तर, परीक्षेत अनुत्तीर्ण मृत्यू २० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

-आत्महत्या करणारी व्यक्ती स्वत:चे मूल्यच विसरते

प्रेयसी किंवा प्रियकरासाठी जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा ती नकळत स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व किंवा मूल्यच विसरते. अशा व्यक्ती मुळात स्वत:वरही प्रेम करीत नाहीत.

-डॉ. अभिषेक सोमानी, प्रमुख, मनोविकृतिशास्त्र विभाग, मेयो.

टॅग्स :Deathमृत्यू