शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअप झाला म्हणून जीव द्यायचा का? २०२१ मध्ये ७५०० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2023 08:10 IST

Nagpur News अलीकडे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देप्रेम प्रकरणातील आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले

 

सुमेध वाघमारे

नागपूर : आनंद, दु:ख, राग, भीती आदी भावनांसारखीच प्रेमही एक भावना आहे. इतर भावना ज्याप्रमाणे निर्माण होतात आणि नष्ट होतात, त्याचप्रमाणे प्रेमभावनेचेही आहे. मात्र, प्रेम करणारे काही जण या भावनांना समजून घेत नाही. ते कोणत्याही थराला जातात. विशेषत: प्रेमात अपयश आल्याचे पाहता आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. अलीकडे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रेम करणे म्हणजे त्या व्यक्तीचा तिच्या गुणदोषांसहित स्वीकार करणे. परंतु, बहुसंख्य प्रकरणांत तसे होताना दिसून येत नाही. दुसरीकडे, आपल्याला हीच प्रेयसी किंवा हाच प्रियकर हवा, याच भावनेने पछाडलेले असतात. त्याचे किंवा तिचे प्रेम मिळवणे यालाच प्राधान्य देतात. यासाठी काही जण कोणत्याही थराला जातात. यातूनच आत्महत्या, हत्या, तिचे जगणे नकोसे करणे आदी प्रकरणे समोर येतात. एकूणच भावना अनावर होत असल्याची लक्षणे ओळखल्यास व तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास यातून बाहेर पडणे सहज शक्य असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- प्रेम दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त टिकत नाही

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) मनोविकृतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी म्हणाले, ‘‘प्रेम साधारण दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. त्यानंतर परस्परांबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक संबंध आदी बाबी नातेसंबंध टिकवून ठेवतात. जिथे सकारात्मक स्थिती प्राप्त होत नाही, तिथे नैराश्यापासून ते आत्महत्येपर्यंत मानसिक आरोग्याच्या समस्यांचे भाग उद्भवतात.”

-एकूण आत्महत्यांपैकी ४.६ टक्के प्रेम प्रकरणातील अपयशाचे

डॉ. सोमानी म्हणाले, ‘‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या २०२१ च्या अधिकृत उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील एकूण आत्महत्यांपैकी ४.६ टक्के म्हणजे सुमारे ७५०० मृत्यू हे प्रेम प्रकरणातील अपयशाचे आहेत. त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले आहे. तर, परीक्षेत अनुत्तीर्ण मृत्यू २० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

-आत्महत्या करणारी व्यक्ती स्वत:चे मूल्यच विसरते

प्रेयसी किंवा प्रियकरासाठी जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा ती नकळत स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व किंवा मूल्यच विसरते. अशा व्यक्ती मुळात स्वत:वरही प्रेम करीत नाहीत.

-डॉ. अभिषेक सोमानी, प्रमुख, मनोविकृतिशास्त्र विभाग, मेयो.

टॅग्स :Deathमृत्यू