शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

ब्रेकअप झाला म्हणून जीव द्यायचा का? २०२१ मध्ये ७५०० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2023 08:10 IST

Nagpur News अलीकडे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देप्रेम प्रकरणातील आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले

 

सुमेध वाघमारे

नागपूर : आनंद, दु:ख, राग, भीती आदी भावनांसारखीच प्रेमही एक भावना आहे. इतर भावना ज्याप्रमाणे निर्माण होतात आणि नष्ट होतात, त्याचप्रमाणे प्रेमभावनेचेही आहे. मात्र, प्रेम करणारे काही जण या भावनांना समजून घेत नाही. ते कोणत्याही थराला जातात. विशेषत: प्रेमात अपयश आल्याचे पाहता आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलतात. अलीकडे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

प्रेम करणे म्हणजे त्या व्यक्तीचा तिच्या गुणदोषांसहित स्वीकार करणे. परंतु, बहुसंख्य प्रकरणांत तसे होताना दिसून येत नाही. दुसरीकडे, आपल्याला हीच प्रेयसी किंवा हाच प्रियकर हवा, याच भावनेने पछाडलेले असतात. त्याचे किंवा तिचे प्रेम मिळवणे यालाच प्राधान्य देतात. यासाठी काही जण कोणत्याही थराला जातात. यातूनच आत्महत्या, हत्या, तिचे जगणे नकोसे करणे आदी प्रकरणे समोर येतात. एकूणच भावना अनावर होत असल्याची लक्षणे ओळखल्यास व तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास यातून बाहेर पडणे सहज शक्य असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

- प्रेम दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त टिकत नाही

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) मनोविकृतिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी म्हणाले, ‘‘प्रेम साधारण दोन ते तीन वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. त्यानंतर परस्परांबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक संबंध आदी बाबी नातेसंबंध टिकवून ठेवतात. जिथे सकारात्मक स्थिती प्राप्त होत नाही, तिथे नैराश्यापासून ते आत्महत्येपर्यंत मानसिक आरोग्याच्या समस्यांचे भाग उद्भवतात.”

-एकूण आत्महत्यांपैकी ४.६ टक्के प्रेम प्रकरणातील अपयशाचे

डॉ. सोमानी म्हणाले, ‘‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या २०२१ च्या अधिकृत उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील एकूण आत्महत्यांपैकी ४.६ टक्के म्हणजे सुमारे ७५०० मृत्यू हे प्रेम प्रकरणातील अपयशाचे आहेत. त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे प्रेम प्रकरणामुळे होणाऱ्या आत्महत्येचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले आहे. तर, परीक्षेत अनुत्तीर्ण मृत्यू २० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

-आत्महत्या करणारी व्यक्ती स्वत:चे मूल्यच विसरते

प्रेयसी किंवा प्रियकरासाठी जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा ती नकळत स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व किंवा मूल्यच विसरते. अशा व्यक्ती मुळात स्वत:वरही प्रेम करीत नाहीत.

-डॉ. अभिषेक सोमानी, प्रमुख, मनोविकृतिशास्त्र विभाग, मेयो.

टॅग्स :Deathमृत्यू