शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

‘अवनी’ला गोळी मारणे बेकायदाच; व्याघ्र प्राधिकरण समितीचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 05:22 IST

टी-१ (अवनी) वाघिणीला बेशुद्ध करून तिला जेरबंद करणे आवश्यक असताना तिला गोळी घालून ठार करणे बेकायदा होते, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने राज्याचा वन विभाग आणि शिकारी असगर अली खान याच्यावर ठेवला आहे.

नागपूर/मुंबई : टी-१ (अवनी) वाघिणीला बेशुद्ध करून तिला जेरबंद करणे आवश्यक असताना तिला गोळी घालून ठार करणे बेकायदा होते, असा ठपका राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने राज्याचा वन विभाग आणि शिकारी असगर अली खान याच्यावर ठेवला आहे.यवतमाळातल्या राळेगाव जंगलातील नरभक्षक टी-१ वाघिणीला २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री शूटर असगर अली खान यानेगोळ्या घालून ठार केले होते. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी समितीकडून चौकशी व्हावी, अशी मागणी वन्यप्राणीप्रेमींनी केली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दोन सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल नुकताच सादरकेला आहे.अवनीच्या संदर्भात वन विभागाने चांगली पूर्वतयारी केली होती; मात्र २ नोव्हेंबर रोजी तिला आणि तिच्या शावकांना पकडण्यासाठी योग्य नियोजन केले गेले नाही. शिवाय, स्वसंरक्षणार्थ अवनीला गोळी घालावी लागली, असा दावा शार्पशूटर असगर अली खान याने केला होता.मात्र, अवनी पाठमोरी असताना तिला गोळी घालण्यात आल्याचे शवविच्छेदनातून दिसून येते, असे समितीने म्हटले आहे.अवनीला गोळ्या घालणारा शिकारी असगर अली खान याने भारतीय शस्त्रास्त्र कायदा १९५८ च्या ३(१), इंडियन व्हेटरनरी कौन्सिल अ‍ॅक्ट १९८४, वन्यजीव रक्षक कायदा १९७२ आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या स्टॅण्डर्ड आॅपरेटिव्ह प्रोसिजर(एसओपी)चा भंग झाल्याचे एनटीसीच्या अहवालात म्हटलेआहे. शिवाय, अवनीला बेशुद्ध करताना वापरलेल्या डार्टमधील औषध ५६ तास जुने असल्याचा खुलासाही करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला न्यायालयात नेण्याची तयारी वन्यप्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे.>पशुवैद्यकीय परिषदही करणार कारवाईआता या अहवालात वन विभागाने वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी जे डार्ट मारले ते कुठल्याही पशुवैद्यकीय तज्ज्ञ नसताना मारले. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पशुवैद्यकीय परिषदही या प्रकरणात कारवाई करणार असल्याचे सांगितले जाते.>अहवाल नाहीराष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने नेमलेल्या समितीने हा अहवाल राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन अणि राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा यांना सादर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र असा कुठलाही अहवाल राज्य सरकारला अद्याप प्राप्त झालेला नाही, असे वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.>नरभक्षक टी-१ वाघिणीला २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री शूटर असगर अली खान याने गोळ्या घालून ठार केले होते.

 

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीण