शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, अंबाझरी तलावाचे पाणी झाले हिरवे; माशांचा मृत्यू

By निशांत वानखेडे | Updated: September 19, 2023 20:09 IST

शेवाळ, जलपर्णी की आणखी काही : एमआयडीसीकडून येणाऱ्या नाल्यात हिरवी कायी

नागपूर : अंबाझरी तलावाकडे फिरणाऱ्या लाेकांना मंगळवारी धक्कादायक व धाेकादायक स्थिती दिसून आली. या तलावाच्या पाण्याला हिरवा रंग आला आहे. पाण्यावर तेलाप्रमाणे हिरवी कायी तरंगताना दिसून येत आहे. तलावात अनेक मासे मरून पडल्याचेही दिसून आले.

पर्यावरण प्रेमी मंगेश कामुने यांनी याबाबत माहिती दिली. सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांचे स्मारक असलेल्या ओव्हरफ्लाेच्या पाॅइंटवर पाण्याला हिरवा रंग आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण तलावाची पाहणी केली असता बहुतेक भागात पाण्याला हिरवा रंग आल्याचे दिसून आले. पाण्यावर तेल तरंगावे तशी हिरवी कायी तरंगत हाेती. विशेष म्हणजे एमआयडीसीकडून येणाऱ्या नाल्याकडून हा हिरव्या पाण्याचा प्रवाह वाहत येत असल्याचे त्यांना आढळले. पाण्याला दुर्गंधी येत असून तलावात अनेक मासे मरून पडले आहेत. त्यांनी याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, मात्र हा प्रकार आमच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगत त्यांनी दुर्लक्ष केले.

तज्ज्ञांच्या मते बऱ्याच वेळा जलपर्णी किंवा शेवाळामुळे पाण्याला हिरवा रंग येताे. तलावात माेठ्या प्रमाणात जलपर्णी वनस्पतींची वाढ झाली असून याबाबत लाेकमतने यापूर्वीच वृत्त प्रकाशित केले हाेते. शिवाय तलावात नाल्याद्वारे सिवेज सुद्धा प्रवाहित हाेत असल्याने या मिश्रणातून धाेकादायक गाेष्टी तयार हाेतात. त्यामुळे सुद्धा पाण्याला हिरवा रंग आल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बाेलले जात आहे. मात्र कुठूनतरी रासायनिक घटक प्रवाहित झाल्याची शक्यता नाकारण्यात येत आहे.

प्राणवायू कमी झाल्यानेही माशांचा मृत्यु

शेवाळ व जलपर्णी ही वनस्पती माेठ्या प्रमाणात पाण्यातील ऑक्सिजन शाेषून घेते. त्यामुळे माशांना आवश्यक असलेल्या प्राणवायूचे प्रमाण घटल्याने त्यांचा मृत्यु हाेत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पिण्यासाठीही हाेताे पुरवठाअंबाझरी तलावातून शहरात पिण्याचा पाण्याचा पुरवठासुद्धा केला जाताे. त्यामुळे मानवी आराेग्यावर परिणाम हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: पाेटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे.

शेवाळ किंवा जलपर्णीमुळे पाण्याला हिरवा रंग येण्याची शक्यता आहे. त्यात सिवेजच्या मिश्रणाचाही समावेश असू शकताे. मात्र अंबाझरी तलावातील पाण्याला हिरवा रंग का आला, हे स्पष्ट सांगता येणार नाही. त्यासाठी पाण्याची सखाेल तपासणी करण्याची गरज आहे.

- डाॅ. पवन लाभशेटवार, शास्त्रज्ञ, नीरी.

टॅग्स :nagpurनागपूर