शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

धक्कादायक, अंबाझरी तलावाचे पाणी झाले हिरवे; माशांचा मृत्यू

By निशांत वानखेडे | Updated: September 19, 2023 20:09 IST

शेवाळ, जलपर्णी की आणखी काही : एमआयडीसीकडून येणाऱ्या नाल्यात हिरवी कायी

नागपूर : अंबाझरी तलावाकडे फिरणाऱ्या लाेकांना मंगळवारी धक्कादायक व धाेकादायक स्थिती दिसून आली. या तलावाच्या पाण्याला हिरवा रंग आला आहे. पाण्यावर तेलाप्रमाणे हिरवी कायी तरंगताना दिसून येत आहे. तलावात अनेक मासे मरून पडल्याचेही दिसून आले.

पर्यावरण प्रेमी मंगेश कामुने यांनी याबाबत माहिती दिली. सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांचे स्मारक असलेल्या ओव्हरफ्लाेच्या पाॅइंटवर पाण्याला हिरवा रंग आल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी संपूर्ण तलावाची पाहणी केली असता बहुतेक भागात पाण्याला हिरवा रंग आल्याचे दिसून आले. पाण्यावर तेल तरंगावे तशी हिरवी कायी तरंगत हाेती. विशेष म्हणजे एमआयडीसीकडून येणाऱ्या नाल्याकडून हा हिरव्या पाण्याचा प्रवाह वाहत येत असल्याचे त्यांना आढळले. पाण्याला दुर्गंधी येत असून तलावात अनेक मासे मरून पडले आहेत. त्यांनी याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली, मात्र हा प्रकार आमच्या अखत्यारित येत नसल्याचे सांगत त्यांनी दुर्लक्ष केले.

तज्ज्ञांच्या मते बऱ्याच वेळा जलपर्णी किंवा शेवाळामुळे पाण्याला हिरवा रंग येताे. तलावात माेठ्या प्रमाणात जलपर्णी वनस्पतींची वाढ झाली असून याबाबत लाेकमतने यापूर्वीच वृत्त प्रकाशित केले हाेते. शिवाय तलावात नाल्याद्वारे सिवेज सुद्धा प्रवाहित हाेत असल्याने या मिश्रणातून धाेकादायक गाेष्टी तयार हाेतात. त्यामुळे सुद्धा पाण्याला हिरवा रंग आल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बाेलले जात आहे. मात्र कुठूनतरी रासायनिक घटक प्रवाहित झाल्याची शक्यता नाकारण्यात येत आहे.

प्राणवायू कमी झाल्यानेही माशांचा मृत्यु

शेवाळ व जलपर्णी ही वनस्पती माेठ्या प्रमाणात पाण्यातील ऑक्सिजन शाेषून घेते. त्यामुळे माशांना आवश्यक असलेल्या प्राणवायूचे प्रमाण घटल्याने त्यांचा मृत्यु हाेत असल्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पिण्यासाठीही हाेताे पुरवठाअंबाझरी तलावातून शहरात पिण्याचा पाण्याचा पुरवठासुद्धा केला जाताे. त्यामुळे मानवी आराेग्यावर परिणाम हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: पाेटाचे विकार वाढण्याची शक्यता आहे.

शेवाळ किंवा जलपर्णीमुळे पाण्याला हिरवा रंग येण्याची शक्यता आहे. त्यात सिवेजच्या मिश्रणाचाही समावेश असू शकताे. मात्र अंबाझरी तलावातील पाण्याला हिरवा रंग का आला, हे स्पष्ट सांगता येणार नाही. त्यासाठी पाण्याची सखाेल तपासणी करण्याची गरज आहे.

- डाॅ. पवन लाभशेटवार, शास्त्रज्ञ, नीरी.

टॅग्स :nagpurनागपूर