शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

धक्कादायक! उपराजधानीत हजारो जोडप्यांना हवाय घटस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 10:12 IST

१ जानेवारी २०१४ ते ३१ जुलै २०१८ या ५५ महिन्यांच्या कालावधीत कौटुंबिक न्यायालयाकडे थोडेथोडके नव्हे तर घटस्फोटाचे १७ हजारांहून अधिक दावे आले. ही धक्कादायक आकडेवारी कौटुंबिक समाज व्यवस्थेत चिंता वाढविणारी आहे.

ठळक मुद्दे५५ महिन्यात १७ हजार दावेकौटुंबिक न्यायालयातील धक्कादायक आकडेवारीसद्यस्थितीत सव्वातीन हजार प्रकरणे प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षांपासून घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याचे दावे विविध संस्था-संघटनांकडून करण्यात येत आहेत. १ जानेवारी २०१४ ते ३१ जुलै २०१८ या ५५ महिन्यांच्या कालावधीत कौटुंबिक न्यायालयाकडे थोडेथोडके नव्हे तर घटस्फोटाचे १७ हजारांहून अधिक दावे आले. ही धक्कादायक आकडेवारी कौटुंबिक समाज व्यवस्थेत चिंता वाढविणारी आहे.यातील अवघे ११०० घटस्फोट समुपदेशनामुळे टळू शकले. कुटुंब व्यवस्था ढासळत असल्याची चर्चा सुरू असताना या कालावधीत झालेल्या एकूण घटस्फोटांची संख्या नक्कीच चिंतन करायला लावणारी आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत कौटुंबिक न्यायालयाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१४ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत विवाह विच्छेदन. स्त्रीधन, पोटगी, मुलाचा ताबा मिळविणे यांचे किती दावे आले, किती खटले प्रलंबित आहेत इत्यादीसंदर्भात विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या माहितीनुसार कौटुंबिक न्यायालयाकडे १ जानेवारी २०१४ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत घटस्फोटाची १७ हजार ६२० प्रकरणे दाखल झाली. या काळात एकूण ५ हजार ८५९ घटस्फोट झाले. तर १ हजार ११३ घटस्फोट टळू शकले.

३१ महिन्यांत टळले साडेसहाशेहून अधिक ‘घटस्फोट’कौटुंबिक न्यायालयाकडे २०१६ सालापासून ३१ महिन्यात घटस्फोटासाठी सुमारे चार हजार दावे दाखल झाले. मात्र समुपदेशनामुळे यातील अनेक प्रकरणांत नवरा-बायकोदरम्यानचा वाद निवळला. या कालावधीत कौटुंबिक न्यायालयाकडे एकूण १० हजार ११७ विविध प्रकारचे दावे आले. यात ३ हजार ९१७ दावे हे घटस्फोटाचे होते. या कालावधीत समुपदेशनामुळे ६६३ घटस्फोट टळले. तर अगोदरच्या प्रकरणांसह एकूण ३ हजार ७१३ घटस्फोट झाले.

टॅग्स :Divorceघटस्फोट