शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! जावई आणि मेव्हण्याने रचला होता अपहरणाचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:18 IST

चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देहल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न : निर्जन ठिकाणी नेऊन वसूलणार होते खंडणी : आरोपींनी दिली पोलिसांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. धंतोली पोलिसांनी बुधवारी रात्री आतिश सिंगला अटक केली. त्यामुळे आता या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली आहे.मध्य भारतातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा करून धंतोली पोलिसांनी २ जुलैच्या रात्री या अपहरणकांडाचा सूत्रधार पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०, रा. हिवरीनगर), सौरभ भीमराव चव्हाण (वय २१), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९), अतुल गोपाळ पाटील (वय २४), विनोद भूमेश्वर गेडाम (वय २३) यांना अटक केली. न्यायालयातून त्यांची ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक मारुती व्हॅनही जप्त केली आहे. बुधवारी पुन्हा आतिश सिंगला अटक करण्यात आली. २८ एप्रिलला ज्यावेळी आरोपींनी अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपी आतिश सिंग तेथे हजर होता. त्यानेच सर्व गुन्हेगारांची त्याचा जावई श्यामबहादूरला भेट घालून दिली. या सर्वांसोबत गुन्ह्यात सहभागी असलेला बाळू ऊर्फ नीलेश अंबाडरे (वय २७, रा. इमामवाडा) नामक आरोपी फरार आहे.२८ एप्रिल २०१८ ला राजेंद्र अग्रवाल त्यांचा वाहनचालक कपिलराज चव्हाणसोबत शनी मंदिरात दर्शनाला आले होते. दर्शन आटोपल्यानंतर तेथील भाविकांना ते प्रसाद वाटत होते. त्यावेळी झालेल्या गर्दीचा गैरफयदा घेत आरोपींनी अग्रवाल यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्रवाल यांना आरोपी ओळखत नसल्यामुळे त्यांनी अग्रवाल समजून त्यांचा वाहनचालक चव्हाण यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. चव्हाण यांनी आरोपींचा जोरदार प्रतिकार केल्याने त्यावेळी हा गुन्हा टळला. त्यानंतर आरोपींनी अग्रवाल यांच्या मोबाईलवर २८ जूनला वारंवार फोन आणि मेसेज करून ५० लाखांची खंडणी दिली नाही तर अपहरण करून जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. हा प्रकार पोलिसांना कळताच धंतोली पोलिसांनी धावपळ करून या अपहरणकांडाचा उलगडा करून उपरोक्त आरोपींना अटक केली.मार्गही ठरवून ठेवला होतादरम्यान, आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी अग्रवाल यांचे अपहरण केल्यानंतर ते काय करणार होते, याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, अग्रवाल यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना पागलखाना चौकातून कळमेश्वरकडे न्यायचे. एका निर्जन ठिकाणी नेल्यानंतर अग्रवाल यांच्या नातेवाईकांना फोन करून खंडणीची रक्कम मागायची. नंतर काय करायचे, हे त्यांनी सांगितले नाही. मात्र, अग्रवाल यांना कोणत्या मार्गाने नागपूरच्या बाहेर न्यायचे, हे आरोपींनी आधीच ठरवून ठेवले होते. पोलिसांना त्यांनी तशी माहिती दिल्याचे समजते.आरोपींमध्ये तीन खतरनाक गुन्हेगारया गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींमध्ये गौरव चव्हाण, अतुल पाटील तसेच फरार असलेला नीलेश अंबाडरे हे तिघे खतरनाक गुन्हेगार आहेत. गौरव चव्हाणविरुद्ध हत्या, लुटमार, पाटीलविरुद्ध हत्येचा प्रयत्न, लुटमार आणि हत्यार कायदा तसेच अंबाडरेविरुद्धही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आणखी काही खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांनी वर्तविली आहे.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण