शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

धक्कादायक ! जावई आणि मेव्हण्याने रचला होता अपहरणाचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:18 IST

चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देहल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न : निर्जन ठिकाणी नेऊन वसूलणार होते खंडणी : आरोपींनी दिली पोलिसांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. धंतोली पोलिसांनी बुधवारी रात्री आतिश सिंगला अटक केली. त्यामुळे आता या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली आहे.मध्य भारतातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा करून धंतोली पोलिसांनी २ जुलैच्या रात्री या अपहरणकांडाचा सूत्रधार पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०, रा. हिवरीनगर), सौरभ भीमराव चव्हाण (वय २१), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९), अतुल गोपाळ पाटील (वय २४), विनोद भूमेश्वर गेडाम (वय २३) यांना अटक केली. न्यायालयातून त्यांची ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक मारुती व्हॅनही जप्त केली आहे. बुधवारी पुन्हा आतिश सिंगला अटक करण्यात आली. २८ एप्रिलला ज्यावेळी आरोपींनी अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपी आतिश सिंग तेथे हजर होता. त्यानेच सर्व गुन्हेगारांची त्याचा जावई श्यामबहादूरला भेट घालून दिली. या सर्वांसोबत गुन्ह्यात सहभागी असलेला बाळू ऊर्फ नीलेश अंबाडरे (वय २७, रा. इमामवाडा) नामक आरोपी फरार आहे.२८ एप्रिल २०१८ ला राजेंद्र अग्रवाल त्यांचा वाहनचालक कपिलराज चव्हाणसोबत शनी मंदिरात दर्शनाला आले होते. दर्शन आटोपल्यानंतर तेथील भाविकांना ते प्रसाद वाटत होते. त्यावेळी झालेल्या गर्दीचा गैरफयदा घेत आरोपींनी अग्रवाल यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्रवाल यांना आरोपी ओळखत नसल्यामुळे त्यांनी अग्रवाल समजून त्यांचा वाहनचालक चव्हाण यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. चव्हाण यांनी आरोपींचा जोरदार प्रतिकार केल्याने त्यावेळी हा गुन्हा टळला. त्यानंतर आरोपींनी अग्रवाल यांच्या मोबाईलवर २८ जूनला वारंवार फोन आणि मेसेज करून ५० लाखांची खंडणी दिली नाही तर अपहरण करून जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. हा प्रकार पोलिसांना कळताच धंतोली पोलिसांनी धावपळ करून या अपहरणकांडाचा उलगडा करून उपरोक्त आरोपींना अटक केली.मार्गही ठरवून ठेवला होतादरम्यान, आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी अग्रवाल यांचे अपहरण केल्यानंतर ते काय करणार होते, याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, अग्रवाल यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना पागलखाना चौकातून कळमेश्वरकडे न्यायचे. एका निर्जन ठिकाणी नेल्यानंतर अग्रवाल यांच्या नातेवाईकांना फोन करून खंडणीची रक्कम मागायची. नंतर काय करायचे, हे त्यांनी सांगितले नाही. मात्र, अग्रवाल यांना कोणत्या मार्गाने नागपूरच्या बाहेर न्यायचे, हे आरोपींनी आधीच ठरवून ठेवले होते. पोलिसांना त्यांनी तशी माहिती दिल्याचे समजते.आरोपींमध्ये तीन खतरनाक गुन्हेगारया गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींमध्ये गौरव चव्हाण, अतुल पाटील तसेच फरार असलेला नीलेश अंबाडरे हे तिघे खतरनाक गुन्हेगार आहेत. गौरव चव्हाणविरुद्ध हत्या, लुटमार, पाटीलविरुद्ध हत्येचा प्रयत्न, लुटमार आणि हत्यार कायदा तसेच अंबाडरेविरुद्धही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आणखी काही खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांनी वर्तविली आहे.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण