शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

धक्कादायक ! जावई आणि मेव्हण्याने रचला होता अपहरणाचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:18 IST

चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देहल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न : निर्जन ठिकाणी नेऊन वसूलणार होते खंडणी : आरोपींनी दिली पोलिसांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. धंतोली पोलिसांनी बुधवारी रात्री आतिश सिंगला अटक केली. त्यामुळे आता या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली आहे.मध्य भारतातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा करून धंतोली पोलिसांनी २ जुलैच्या रात्री या अपहरणकांडाचा सूत्रधार पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०, रा. हिवरीनगर), सौरभ भीमराव चव्हाण (वय २१), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९), अतुल गोपाळ पाटील (वय २४), विनोद भूमेश्वर गेडाम (वय २३) यांना अटक केली. न्यायालयातून त्यांची ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक मारुती व्हॅनही जप्त केली आहे. बुधवारी पुन्हा आतिश सिंगला अटक करण्यात आली. २८ एप्रिलला ज्यावेळी आरोपींनी अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपी आतिश सिंग तेथे हजर होता. त्यानेच सर्व गुन्हेगारांची त्याचा जावई श्यामबहादूरला भेट घालून दिली. या सर्वांसोबत गुन्ह्यात सहभागी असलेला बाळू ऊर्फ नीलेश अंबाडरे (वय २७, रा. इमामवाडा) नामक आरोपी फरार आहे.२८ एप्रिल २०१८ ला राजेंद्र अग्रवाल त्यांचा वाहनचालक कपिलराज चव्हाणसोबत शनी मंदिरात दर्शनाला आले होते. दर्शन आटोपल्यानंतर तेथील भाविकांना ते प्रसाद वाटत होते. त्यावेळी झालेल्या गर्दीचा गैरफयदा घेत आरोपींनी अग्रवाल यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्रवाल यांना आरोपी ओळखत नसल्यामुळे त्यांनी अग्रवाल समजून त्यांचा वाहनचालक चव्हाण यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. चव्हाण यांनी आरोपींचा जोरदार प्रतिकार केल्याने त्यावेळी हा गुन्हा टळला. त्यानंतर आरोपींनी अग्रवाल यांच्या मोबाईलवर २८ जूनला वारंवार फोन आणि मेसेज करून ५० लाखांची खंडणी दिली नाही तर अपहरण करून जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. हा प्रकार पोलिसांना कळताच धंतोली पोलिसांनी धावपळ करून या अपहरणकांडाचा उलगडा करून उपरोक्त आरोपींना अटक केली.मार्गही ठरवून ठेवला होतादरम्यान, आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी अग्रवाल यांचे अपहरण केल्यानंतर ते काय करणार होते, याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, अग्रवाल यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना पागलखाना चौकातून कळमेश्वरकडे न्यायचे. एका निर्जन ठिकाणी नेल्यानंतर अग्रवाल यांच्या नातेवाईकांना फोन करून खंडणीची रक्कम मागायची. नंतर काय करायचे, हे त्यांनी सांगितले नाही. मात्र, अग्रवाल यांना कोणत्या मार्गाने नागपूरच्या बाहेर न्यायचे, हे आरोपींनी आधीच ठरवून ठेवले होते. पोलिसांना त्यांनी तशी माहिती दिल्याचे समजते.आरोपींमध्ये तीन खतरनाक गुन्हेगारया गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींमध्ये गौरव चव्हाण, अतुल पाटील तसेच फरार असलेला नीलेश अंबाडरे हे तिघे खतरनाक गुन्हेगार आहेत. गौरव चव्हाणविरुद्ध हत्या, लुटमार, पाटीलविरुद्ध हत्येचा प्रयत्न, लुटमार आणि हत्यार कायदा तसेच अंबाडरेविरुद्धही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आणखी काही खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांनी वर्तविली आहे.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण