शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

धक्कादायक ! जावई आणि मेव्हण्याने रचला होता अपहरणाचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:18 IST

चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देहल्दीरामच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न : निर्जन ठिकाणी नेऊन वसूलणार होते खंडणी : आरोपींनी दिली पोलिसांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार वर्षांपूर्वी हल्दीराममध्ये वाहनचालक म्हणून काम करणारा आरोपी पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०) आणि त्याचा साळा (मेव्हणा) आतिश राजमहेंद्र सिंग (वय ३४) या दोघांनी मिळून हल्दीराम फूड प्रा.लि.कंपनीचे मालक राजेंद्र अग्रवाल यांचे अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा कट रचला होता, अशी खळबळजनक माहिती पुढे आली आहे. धंतोली पोलिसांनी बुधवारी रात्री आतिश सिंगला अटक केली. त्यामुळे आता या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या सहा झाली आहे.मध्य भारतातील व्यापारी-उद्योजकांत प्रचंड खळबळ निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा उलगडा करून धंतोली पोलिसांनी २ जुलैच्या रात्री या अपहरणकांडाचा सूत्रधार पप्पू ऊर्फ श्यामबहादूर समशेर सिंग (वय ४०, रा. हिवरीनगर), सौरभ भीमराव चव्हाण (वय २१), रोहित राजेंद्र घुमडे (वय २९), अतुल गोपाळ पाटील (वय २४), विनोद भूमेश्वर गेडाम (वय २३) यांना अटक केली. न्यायालयातून त्यांची ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळवण्यात आली आहे. अटकेतील आरोपींकडून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक मारुती व्हॅनही जप्त केली आहे. बुधवारी पुन्हा आतिश सिंगला अटक करण्यात आली. २८ एप्रिलला ज्यावेळी आरोपींनी अग्रवाल यांच्या अपहरणाचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपी आतिश सिंग तेथे हजर होता. त्यानेच सर्व गुन्हेगारांची त्याचा जावई श्यामबहादूरला भेट घालून दिली. या सर्वांसोबत गुन्ह्यात सहभागी असलेला बाळू ऊर्फ नीलेश अंबाडरे (वय २७, रा. इमामवाडा) नामक आरोपी फरार आहे.२८ एप्रिल २०१८ ला राजेंद्र अग्रवाल त्यांचा वाहनचालक कपिलराज चव्हाणसोबत शनी मंदिरात दर्शनाला आले होते. दर्शन आटोपल्यानंतर तेथील भाविकांना ते प्रसाद वाटत होते. त्यावेळी झालेल्या गर्दीचा गैरफयदा घेत आरोपींनी अग्रवाल यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्रवाल यांना आरोपी ओळखत नसल्यामुळे त्यांनी अग्रवाल समजून त्यांचा वाहनचालक चव्हाण यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता. चव्हाण यांनी आरोपींचा जोरदार प्रतिकार केल्याने त्यावेळी हा गुन्हा टळला. त्यानंतर आरोपींनी अग्रवाल यांच्या मोबाईलवर २८ जूनला वारंवार फोन आणि मेसेज करून ५० लाखांची खंडणी दिली नाही तर अपहरण करून जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. हा प्रकार पोलिसांना कळताच धंतोली पोलिसांनी धावपळ करून या अपहरणकांडाचा उलगडा करून उपरोक्त आरोपींना अटक केली.मार्गही ठरवून ठेवला होतादरम्यान, आतापर्यंतच्या तपासात आरोपींनी अग्रवाल यांचे अपहरण केल्यानंतर ते काय करणार होते, याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, अग्रवाल यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना पागलखाना चौकातून कळमेश्वरकडे न्यायचे. एका निर्जन ठिकाणी नेल्यानंतर अग्रवाल यांच्या नातेवाईकांना फोन करून खंडणीची रक्कम मागायची. नंतर काय करायचे, हे त्यांनी सांगितले नाही. मात्र, अग्रवाल यांना कोणत्या मार्गाने नागपूरच्या बाहेर न्यायचे, हे आरोपींनी आधीच ठरवून ठेवले होते. पोलिसांना त्यांनी तशी माहिती दिल्याचे समजते.आरोपींमध्ये तीन खतरनाक गुन्हेगारया गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींमध्ये गौरव चव्हाण, अतुल पाटील तसेच फरार असलेला नीलेश अंबाडरे हे तिघे खतरनाक गुन्हेगार आहेत. गौरव चव्हाणविरुद्ध हत्या, लुटमार, पाटीलविरुद्ध हत्येचा प्रयत्न, लुटमार आणि हत्यार कायदा तसेच अंबाडरेविरुद्धही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आणखी काही खळबळजनक खुलासे होण्याची शक्यता धंतोलीचे ठाणेदार दिनेश शेंडे यांनी वर्तविली आहे.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हाKidnappingअपहरण