शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

धक्कादायक : नागपूर विभागात २१ महिन्यांत रेल्वे हद्दीत सव्वासातशे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 21:18 IST

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे, याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१७ पासून २१ महिन्यांत रेल्वेच्या हद्दीत सव्वासातशे लोकांचा प्राण गेला. रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर शंभरहून अधिक जणांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने दोनशेहून अधिक जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देरेल्वे रुळ ओलांडताना शंभराहून अधिक मृत्यू : रेल्वेतून पडल्यामुळे दोनशेहून अधिक प्रवाशांनी गमावला प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे, याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१७ पासून २१ महिन्यांत रेल्वेच्या हद्दीत सव्वासातशे लोकांचा प्राण गेला. रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर शंभरहून अधिक जणांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने दोनशेहून अधिक जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत लोहमार्ग पोलिसांकडे विचारणा केली होती. जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत रेल्वे रुळ ओलांडताना, रेल्वेतून पडून, शॉक लागून, खांबाला धडकून, नैसर्गिकपणे किती जणांचा मृत्यू झाला, किती जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. लोहमार्ग नागपूरअंतर्गत येणाऱ्या गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला या पोलीस ठाण्यांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत विविध कारणांमुळे त्यांच्या हद्दीत ७२५ जणांचा मृत्यू झाला. यात ९२ महिलांचा समावेश होता. रेल्वे रुळ ओलांडताना ११२ प्रवाशांचे मृत्यू झाले तर रेल्वेतून पडल्यामुळे २०३ जणांचा बळी गेला. एकट्या नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३३ जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला.याशिवाय या कालावधीत खांबाला धडकल्याने ८, विजेचा धक्का लागून ४ तर नैसर्गिक कारणांमुळे ३४२ लोकांचा मृत्यू झाला. ३७ लोकांनी रेल्वेखाली येऊन आपला जीव दिला.नागपुरात सर्वात जास्त मृत्यूएकूण सहा लोहमार्ग पोलीस ठाण्यांपैकी नागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ महिन्यांच्या कालावधीत सर्वात जास्त मृत्यू झाले. येथे २१९ मृत्यूंची नोंद झाली तर वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५४ जणांचे मृत्यू झाले. इतवारीत ५७ मृत्यूंची नोंद झाली.

टॅग्स :railwayरेल्वेDeathमृत्यू