शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक : नागपूर विभागात २१ महिन्यांत रेल्वे हद्दीत सव्वासातशे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 21:18 IST

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे, याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१७ पासून २१ महिन्यांत रेल्वेच्या हद्दीत सव्वासातशे लोकांचा प्राण गेला. रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर शंभरहून अधिक जणांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने दोनशेहून अधिक जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देरेल्वे रुळ ओलांडताना शंभराहून अधिक मृत्यू : रेल्वेतून पडल्यामुळे दोनशेहून अधिक प्रवाशांनी गमावला प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे, याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१७ पासून २१ महिन्यांत रेल्वेच्या हद्दीत सव्वासातशे लोकांचा प्राण गेला. रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर शंभरहून अधिक जणांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने दोनशेहून अधिक जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत लोहमार्ग पोलिसांकडे विचारणा केली होती. जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत रेल्वे रुळ ओलांडताना, रेल्वेतून पडून, शॉक लागून, खांबाला धडकून, नैसर्गिकपणे किती जणांचा मृत्यू झाला, किती जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. लोहमार्ग नागपूरअंतर्गत येणाऱ्या गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला या पोलीस ठाण्यांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत विविध कारणांमुळे त्यांच्या हद्दीत ७२५ जणांचा मृत्यू झाला. यात ९२ महिलांचा समावेश होता. रेल्वे रुळ ओलांडताना ११२ प्रवाशांचे मृत्यू झाले तर रेल्वेतून पडल्यामुळे २०३ जणांचा बळी गेला. एकट्या नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३३ जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला.याशिवाय या कालावधीत खांबाला धडकल्याने ८, विजेचा धक्का लागून ४ तर नैसर्गिक कारणांमुळे ३४२ लोकांचा मृत्यू झाला. ३७ लोकांनी रेल्वेखाली येऊन आपला जीव दिला.नागपुरात सर्वात जास्त मृत्यूएकूण सहा लोहमार्ग पोलीस ठाण्यांपैकी नागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ महिन्यांच्या कालावधीत सर्वात जास्त मृत्यू झाले. येथे २१९ मृत्यूंची नोंद झाली तर वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५४ जणांचे मृत्यू झाले. इतवारीत ५७ मृत्यूंची नोंद झाली.

टॅग्स :railwayरेल्वेDeathमृत्यू