शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

धक्कादायक : नागपूर विभागात २१ महिन्यांत रेल्वे हद्दीत सव्वासातशे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 21:18 IST

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे, याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१७ पासून २१ महिन्यांत रेल्वेच्या हद्दीत सव्वासातशे लोकांचा प्राण गेला. रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर शंभरहून अधिक जणांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने दोनशेहून अधिक जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देरेल्वे रुळ ओलांडताना शंभराहून अधिक मृत्यू : रेल्वेतून पडल्यामुळे दोनशेहून अधिक प्रवाशांनी गमावला प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे, याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करुन दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१७ पासून २१ महिन्यांत रेल्वेच्या हद्दीत सव्वासातशे लोकांचा प्राण गेला. रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर शंभरहून अधिक जणांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने दोनशेहून अधिक जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत लोहमार्ग पोलिसांकडे विचारणा केली होती. जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत रेल्वे रुळ ओलांडताना, रेल्वेतून पडून, शॉक लागून, खांबाला धडकून, नैसर्गिकपणे किती जणांचा मृत्यू झाला, किती जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. लोहमार्ग नागपूरअंतर्गत येणाऱ्या गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला या पोलीस ठाण्यांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत विविध कारणांमुळे त्यांच्या हद्दीत ७२५ जणांचा मृत्यू झाला. यात ९२ महिलांचा समावेश होता. रेल्वे रुळ ओलांडताना ११२ प्रवाशांचे मृत्यू झाले तर रेल्वेतून पडल्यामुळे २०३ जणांचा बळी गेला. एकट्या नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३३ जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला.याशिवाय या कालावधीत खांबाला धडकल्याने ८, विजेचा धक्का लागून ४ तर नैसर्गिक कारणांमुळे ३४२ लोकांचा मृत्यू झाला. ३७ लोकांनी रेल्वेखाली येऊन आपला जीव दिला.नागपुरात सर्वात जास्त मृत्यूएकूण सहा लोहमार्ग पोलीस ठाण्यांपैकी नागपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ महिन्यांच्या कालावधीत सर्वात जास्त मृत्यू झाले. येथे २१९ मृत्यूंची नोंद झाली तर वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५४ जणांचे मृत्यू झाले. इतवारीत ५७ मृत्यूंची नोंद झाली.

टॅग्स :railwayरेल्वेDeathमृत्यू