शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दहा वर्षात नागपुरातील ५० मुलांची विदेशात तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 21:29 IST

बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या  नागपुरातील १० दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकानाका भागातील रहिवासी असून, त्यांनी गेल्या १० वर्षात नागपुरातील ५० मुलांना इंग्लंड (यूके) विदेशात नेऊन सोेडल्याचा आरोप आहे.

ठळक मुद्देमानवी तस्करी करणारे १० दाम्पत्य ताब्यात : ब्रिटिश उच्चायुक्तांकडून माहिती

नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात मानवी तस्करी करणाऱ्या  नागपुरातील १० दाम्पत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्व आरोपी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेकानाका भागातील रहिवासी असून, त्यांनी गेल्या १० वर्षात नागपुरातील ५० मुलांना इंग्लंड (यूके) विदेशात नेऊन सोेडल्याचा आरोप आहे. सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली.२००७ ते २०१७ या दहा वर्षांच्या कालावधीत नागपुरातून विदेशात गेलेली ५० मुले पुन्हा भारतात परतलीच नसल्याची बाब ब्रिटिश उच्चायुक्तांच्या लक्षात आली. त्यांनी चौकशीनंतर सप्टेंबर २०१७ मध्ये हे गंभीर प्रकरण भारतीय उच्चायुक्तांसह दिल्ली दूतावासाला कळविले. दिल्लीतून नागपूर पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू झाली. गुन्हे शाखा आणि विशेष शाखेतून त्या दहा दाम्पत्यांचा पत्ता आणि त्यांना शोधण्यात आले. ज्या कुटुंबातील मुले विदेशात पाठविण्यात आली, त्यांचीही चौकशी करण्यात आली. त्यांची कागदपत्रे तपासली असता आरोपींनी पासपोर्ट आणि व्हिसा तयार करण्यासाठी मिळवलेली कागदपत्रेही बनावट असल्याचे लक्षात आले. ज्या शाळांची त्या कागदपत्रांवर नावे आहेत, त्या शाळा प्रशासनात पोलिसांनी चौकशी केली असता आम्ही ही कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाही, असे शाळा प्रशासनाने पोलिसांच्या लक्षात आणून दिले.एका मुलामागे दोन लाखया सर्व प्रकरणाची सविस्तर आणि सखोल चौकशी केल्यानंतर पोलिसांनी विदेशात गेलेल्या मुलांच्या पालकांकडे कसून चौकशी केली. मुलांना इंग्लंडमध्ये बक्कळ पगाराची नोकरी मिळते, असे आरोपी दाम्पत्य सांगायचे. त्यांना तिकडे पोहचवून देण्यासाठी आरोपी दाम्पत्य प्रत्येक मुलामागे त्यांच्या पालकांकडून दोन लाख रुपये कमिशन उकळत होते, असेही पुढे आले. त्यामुळे पालकही आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना तगडी रक्कम देत होते, असे स्पष्ट झाले. या एकूणच घटनाक्रमातून आरोपींनी फसवणूक करून मुलांना विदेशात नेल्याचे चौकशीत उघड झाले. त्यामुळे पाचपावली ठाण्यात या प्रकरणाचा आज गुन्हा दाखल करून १० ही जोडप्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.ब्रिटिश अधिकारी चक्रावलेप्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून आपल्या परिवारातील मुलांना विदेशात घेऊन जाणारी ही दहा आरोपी जोडपी भारतात परत येताना मुलांना विदेशातच सोडून परततात, हा पहिला संशयास्पद मुद्दा ठरला. विशेष म्हणजे, एका दाम्पत्याने चक्क १९ मुले विदेशात आपली मुले म्हणून नेऊन सोडली. एखाद्या दाम्पत्याला १९ मुले असू शकतात, हा मुद्दाच खटकणारा होता. त्यामुळे सखोल चौकशी सुरू झाली. त्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता कागदपत्रे बनावट असल्याचेही त्यांच्या ध्यानात आले. प्रत्येक मुलांमधील अंतर तीन ते सहा महिनेच (गर्भधारणेला नऊ महिने लागतात) असल्याचे पाहून ब्रिटिश अधिकारीही चक्रावले.आरोपी दाम्पत्यांची नावेकंसात त्यांनी विदेशात नेलेली मुलेगुरुमीत तसेच तिचा पती राजेंद्रसिंग अटवाल (८ मुले), परमजीत आणि तिचा पती रुल्डासिंग गुजर (१९ मुले), सुरिंदर आणि तिचा पती जर्नलसिंग धोत्रा (६ मुले), जगविंदरसिंग आणि पियरासिंग ( ६ मुले), परमजितसिंग आणि सतवीरसिंग धोत्रा (२ मुले), कुलजीत आणि मनजीतसिंग धोत्रा (३ मुले), सतवंतसिंग निशांतसिंग धोत्रा (३ मुले) मनजीत आणि काश्मीरसिंग धोत्रा (२ मुले), निर्मल आणि अजितसिंग (४ मुले) परविंदर आणि तिचा पती अजितसिंग (४ मुले) तसेच जसविंदरसिंग बलबीरसिंग मुलतानी (५ मुले).

 

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर