शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कोरोनाबाधितांसोबतच नागपुरातील मृत्यूसंख्येतही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 10:33 IST

Nagpur News कोरोनाच्या वाढत्या संख्येने चिंतेचे वातावरण पसरले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या १९००वर गेली. शुक्रवारी १९५७ नव्या रुग्णांची भर पडली. धक्कादायक म्हणजे, ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच मृत्यूची संख्या १५ झाली.

ठळक मुद्दे१९५७ रुग्ण, १५ मृत्यू चाचण्यांची संख्या घटल्याने वाढविली चिंता

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संख्येने चिंतेचे वातावरण पसरले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या १९००वर गेली. शुक्रवारी १९५७ नव्या रुग्णांची भर पडली. धक्कादायक म्हणजे, ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच मृत्यूची संख्या १५ झाली. परिणामी, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रुग्णांची एकूण संख्या १,६५,९८९, तर मृतांची संख्या ४४४० झाली आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत गेल्यास मेयो, मेडिकल व एम्समधील खाटा अपुऱ्या पडण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गुरुवारी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणार, असे आश्वासनही देण्यात आले; परंतु महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे योग्य पद्धतीने ट्रेसिंग होत नसल्याने गुरुवारी पुन्हा एकदा चाचणीत घट आली. नियमानुसार एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान चार ते पाचजणांची चाचणी होणे आवश्यक आहे; परंतु तसे होताना दिसून येत नाही. दरम्यानच्या काळातही याकडे दुर्लक्ष झाल्याने रुग्ण वाढल्याचे बोलले जात आहे. झालेल्या ८५८२ चाचण्यांमध्ये ७०९५ आरटीपीसीआर, तर १४८७ रॅपिड अँटिजेनचा समावेश होता. अँटिजेनमधून १२०, तर आरटीपीसीआरमधून ९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

-शहरात १६३७, ग्रामीणमध्ये ३१७ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात ग्रामीणच्या तुलनेत शहरात रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. गुरुवारी शहरात १६०३, तर ग्रामीणमध्ये ३७३ रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारी रुग्णसंख्येत किंचित घट आली असली तरी शहरातील रुग्णसंख्या वाढून १६३७, तर ग्रामीणमध्ये कमी होऊन ३१७ झाली. यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आज ९४७ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,४६,४१९ झाली आहे.

-एम्सचा खाटा फुल्ल, मेयो, मेडिकलमध्ये वाढले रुग्ण

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोरोनाबाधितांसाठी राखीव असलेल्या ६० खाटा गुरुवारी फुल्ल झाल्या. यामुळे येथील रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये पाठविले जात आहे. सध्या मेडिकलमध्ये १९७, तर मेयोमध्ये १८०, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ५३, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये १२, तर पाचपावलीमध्ये ५ रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित ३४७९ रुग्ण विविध खासगी रुग्णालयांत उपचाराखाली आहेत.

-आमदार निवास बंदच

गुरुवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी आमदार निवास सुरू करणार असल्याची माहिती दिली होती; परंतु शुक्रवारी बाधित रुग्णांसाठी आमदार निवास बंदच होते. विशेष म्हणजे, जिल्ह्यात ९३६४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. यातील अनेकांकडे सोयी नसतानाही ते गृह विलगीकरणात आहे. परिणामी, कोरोना कुटुंबात पसरून तो इतरांनाही होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

४०

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस