शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

धक्कादायक! कोरोनाबाधितांसोबतच नागपुरातील मृत्यूसंख्येतही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 10:33 IST

Nagpur News कोरोनाच्या वाढत्या संख्येने चिंतेचे वातावरण पसरले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या १९००वर गेली. शुक्रवारी १९५७ नव्या रुग्णांची भर पडली. धक्कादायक म्हणजे, ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच मृत्यूची संख्या १५ झाली.

ठळक मुद्दे१९५७ रुग्ण, १५ मृत्यू चाचण्यांची संख्या घटल्याने वाढविली चिंता

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संख्येने चिंतेचे वातावरण पसरले आहे. सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या १९००वर गेली. शुक्रवारी १९५७ नव्या रुग्णांची भर पडली. धक्कादायक म्हणजे, ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच मृत्यूची संख्या १५ झाली. परिणामी, आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. रुग्णांची एकूण संख्या १,६५,९८९, तर मृतांची संख्या ४४४० झाली आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत गेल्यास मेयो, मेडिकल व एम्समधील खाटा अपुऱ्या पडण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गुरुवारी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणार, असे आश्वासनही देण्यात आले; परंतु महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे योग्य पद्धतीने ट्रेसिंग होत नसल्याने गुरुवारी पुन्हा एकदा चाचणीत घट आली. नियमानुसार एका रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान चार ते पाचजणांची चाचणी होणे आवश्यक आहे; परंतु तसे होताना दिसून येत नाही. दरम्यानच्या काळातही याकडे दुर्लक्ष झाल्याने रुग्ण वाढल्याचे बोलले जात आहे. झालेल्या ८५८२ चाचण्यांमध्ये ७०९५ आरटीपीसीआर, तर १४८७ रॅपिड अँटिजेनचा समावेश होता. अँटिजेनमधून १२०, तर आरटीपीसीआरमधून ९५७ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

-शहरात १६३७, ग्रामीणमध्ये ३१७ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात ग्रामीणच्या तुलनेत शहरात रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. गुरुवारी शहरात १६०३, तर ग्रामीणमध्ये ३७३ रुग्णांची नोंद झाली होती. शुक्रवारी रुग्णसंख्येत किंचित घट आली असली तरी शहरातील रुग्णसंख्या वाढून १६३७, तर ग्रामीणमध्ये कमी होऊन ३१७ झाली. यामुळे महानगरपालिकेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आज ९४७ रुग्ण बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १,४६,४१९ झाली आहे.

-एम्सचा खाटा फुल्ल, मेयो, मेडिकलमध्ये वाढले रुग्ण

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) कोरोनाबाधितांसाठी राखीव असलेल्या ६० खाटा गुरुवारी फुल्ल झाल्या. यामुळे येथील रुग्णांना मेयो, मेडिकलमध्ये पाठविले जात आहे. सध्या मेडिकलमध्ये १९७, तर मेयोमध्ये १८०, मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ५३, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये १२, तर पाचपावलीमध्ये ५ रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित ३४७९ रुग्ण विविध खासगी रुग्णालयांत उपचाराखाली आहेत.

-आमदार निवास बंदच

गुरुवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी आमदार निवास सुरू करणार असल्याची माहिती दिली होती; परंतु शुक्रवारी बाधित रुग्णांसाठी आमदार निवास बंदच होते. विशेष म्हणजे, जिल्ह्यात ९३६४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. यातील अनेकांकडे सोयी नसतानाही ते गृह विलगीकरणात आहे. परिणामी, कोरोना कुटुंबात पसरून तो इतरांनाही होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

४०

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस