शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! अंशदायी निवृत्ती वेतन योजनेचा १२०० कोटीचा हिशेब नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:23 IST

शासनाने २ नोव्हेंबर २००५ पासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू झाली. शिक्षकांच्या वेतनातून त्याची कपातही करण्यात येत आहे. परंतु या कपातीचा हिशेबच नसल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. माहितीच्या अधिकारात याची माहिती मागितली असता, ही रक्कम जवळपास १२०० कोटीची आहे.

ठळक मुद्देशिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंता : माहितीच्या अधिकारात उघड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने २ नोव्हेंबर २००५ पासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू झाली. शिक्षकांच्या वेतनातून त्याची कपातही करण्यात येत आहे. परंतु या कपातीचा हिशेबच नसल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. माहितीच्या अधिकारात याची माहिती मागितली असता, ही रक्कम जवळपास १२०० कोटीची आहे.२००५ नंतर शिक्षण विभागात रुजू झालेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही, असे आदेश शासनाने काढले. त्या बदल्यात अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली. यात शिक्षकांच्या वेतनातून कपात होत असलेली वेतनाइतकीच रक्कम शासन जमा करणार होते. २०१० पासून अंशदायी निवृत्ती वेतनाच्या कपाती करण्यात येऊ लागल्या. शिक्षकांच्या झालेल्या कपातीचा हिशेबच शिक्षकांना मिळत नाही. शासनाकडून किती रक्कम जमा करण्यात आली, व्याजाची किती रक्कम जमा झाली, शिक्षकांच्या खात्यात ही रक्कम कधी जमा होणार आहे, याची कुठलीच माहिती शिक्षकांना मिळत नाही. त्यामुळे शिक्षकही चिंतातुर आहेत. या रकमेचा हिशेबच नसल्याने ज्या शिक्षकांचा मृत्यू झाला, जे शिक्षक निवृत्त झाले त्यांना अंशदायी निवृत्ती वेतन योजनेचा अजूनही लाभ मिळालेला नाही.शिक्षकांमध्ये असलेले भीतीचे वातावरण लक्षात घेता, अविनाश बडे या शिक्षकाने शिक्षण आयुक्त कार्यालयात खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची या योजनेंतर्गत झालेली कपात, शासनाचे जमा झालेले अनुदान व व्याज याची माहिती मागिविली. मिळालेल्या माहितीनुसार २०१७ -१८ या वर्षात नागपूर आणि अमरावती विभागातून ३९७ कोटी ६ लक्ष ९२ हजार ही रक्कम मंजूर झाली असून, शालेय शिक्षण व क्रीडा खात्यात त्याची तरतूद करण्यात आली आहे. तर राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून ६१६ कोटी ५७ लाख ०९ हजार एवढी रक्कम शासनाच्या हिश्श्याची असून, ७४ कोटी रुपये व्याज शासनाकडून अप्राप्त असल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर नंदूरबार, अहमदनगर, नांदेड, गोंदिया, चंद्रपूर, वाशिम यांच्याकडून शिक्षण संचालनालयाला माहिती प्राप्त झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.ही रक्कम ३१ मार्च २०१८ पर्यंत जमा करायची होती. परंतु यासंदर्भात शासनाकडून मंजूर तरतुदीचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना प्राप्त झाले नाही. त्यामुळे शिक्षकांना आपल्या कपातीच्या रकमेचे झाले काय? अशी चिंता भेडसावत आहे. तर जुनीच पेन्शन योजना सुरू ठेवावीयोजनेत होत असलेल्या कपातीची शिक्षकांना माहिती नाही, मृत्यू झालेल्या शिक्षकांना त्याचा लाभ मिळत नाही. योजनेबाबत शिक्षण विभाग आणि शिक्षकांमध्ये संभ्रम आहे. कपात झालेल्या पैशाचा हिशेबच नसल्यामुळे जुनी पेन्शन योजनाच सुरू ठेवावी.अविनाश बडे, कोषाध्यक्ष, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ

 

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर