शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना जगासाठी आदर्श; डॉ. रमेश पांडव यांचे विधान 

By जितेंद्र ढवळे | Updated: February 19, 2024 16:16 IST

विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान.

जितेंद्र ढवळे, नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना संपूर्ण जगासाठी आदर्श निर्माण करणारी असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील जीएमएनआयआरडीचे माजी संचालक डॉ. रमेश माधवराव पांडव यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त सोमवारी व्याख्यान पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे याप्रसंगी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन इस्लामी राज्यात जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा आदी गरजा पूर्ण होत नव्हत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांचा पोवाडा तसेच काही पत्रांचा आधार घेत सर्वसामान्य जनतेच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करावे लागले, असे डॉ. पांडव यांनी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य लोककल्याणकारी सुराज्य कसे निर्माण झाले याचा त्यांनी विविध पत्र तसेच समकालीन साहित्याचे दाखले देत उलगडा केला. आश्रयाला आले त्याचे कल्याण हाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुराज्याचा मध्यबिंदू होता, असे ते म्हणाले. ३५० वर्षं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला झाली आहेत. जगभरातील कल्याणकारी राज्याला छत्रपती शिवाजी महाराज आदर्श वाटतात, याचा खोलवर जाऊन अभ्यास करण्याची आवश्यकता पांडव यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याची संकल्पना स्पष्ट होती. त्यांच्या मातेने त्यांना महाभारत, रामायण ऐकविले होते. सर्व गोष्टींचा विचार करीत महाराजांनी मोठा पराक्रम केला. तत्कालीन सर्व चिंतकांची आपले राज्य व्हावे अशी इच्छा होती. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक लोककल्याणकारी राजा म्हणून राज्याभिषेक झाला, असे ते म्हणाले. राज्याभिषेकानंतर शेतकरी आणि वंचित घटकांच्या योजनांचा त्यांनी प्रारंभ केला. संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूरuniversityविद्यापीठ