शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिवाजी महाराजांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना जगासाठी आदर्श; डॉ. रमेश पांडव यांचे विधान 

By जितेंद्र ढवळे | Updated: February 19, 2024 16:16 IST

विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान.

जितेंद्र ढवळे, नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची लोककल्याणकारी राज्याची संकल्पना संपूर्ण जगासाठी आदर्श निर्माण करणारी असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील जीएमएनआयआरडीचे माजी संचालक डॉ. रमेश माधवराव पांडव यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त सोमवारी व्याख्यान पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे याप्रसंगी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन इस्लामी राज्यात जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा आदी गरजा पूर्ण होत नव्हत्या. महात्मा ज्योतिबा फुले यांचा पोवाडा तसेच काही पत्रांचा आधार घेत सर्वसामान्य जनतेच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना हिंदवी स्वराज्य स्थापन करावे लागले, असे डॉ. पांडव यांनी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य लोककल्याणकारी सुराज्य कसे निर्माण झाले याचा त्यांनी विविध पत्र तसेच समकालीन साहित्याचे दाखले देत उलगडा केला. आश्रयाला आले त्याचे कल्याण हाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुराज्याचा मध्यबिंदू होता, असे ते म्हणाले. ३५० वर्षं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला झाली आहेत. जगभरातील कल्याणकारी राज्याला छत्रपती शिवाजी महाराज आदर्श वाटतात, याचा खोलवर जाऊन अभ्यास करण्याची आवश्यकता पांडव यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याची संकल्पना स्पष्ट होती. त्यांच्या मातेने त्यांना महाभारत, रामायण ऐकविले होते. सर्व गोष्टींचा विचार करीत महाराजांनी मोठा पराक्रम केला. तत्कालीन सर्व चिंतकांची आपले राज्य व्हावे अशी इच्छा होती. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक लोककल्याणकारी राजा म्हणून राज्याभिषेक झाला, असे ते म्हणाले. राज्याभिषेकानंतर शेतकरी आणि वंचित घटकांच्या योजनांचा त्यांनी प्रारंभ केला. संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी मानले.

टॅग्स :nagpurनागपूरuniversityविद्यापीठ