शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

 शिवसेनेचा धनगर आरक्षणाला कायमच पाठिंबा, अहिल्याबाईंच्या कामाची मिळते पदोपदी साक्ष - नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 17:46 IST

राज्यातील धनगर  समाजाने एकेकाळी मोठ्या प्रमाणात राज्य केले आहे. अहिल्या देवी होळकरांनी केलेल्या कामाच्या पाउलखुणा आजही सर्वत्र दिसत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजाचा विकास होण्यास ख-या अर्थाने मदत झाली आहे. धनगर व धनगड या दोन्ही शब्दांत केवळ एकाच अक्षराचा फरक असून तो काढून टाकल्यास अनेक समाजघटकांना न्याय मिळू शकेल.

नागपूर : राज्यातील धनगर  समाजाने एकेकाळी मोठ्या प्रमाणात राज्य केले आहे. अहिल्या देवी होळकरांनी केलेल्या कामाच्या पाउलखुणा आजही सर्वत्र दिसत आहेत. त्यांच्या कामामुळे समाजाचा विकास होण्यास ख-या अर्थाने मदत झाली आहे. धनगर व धनगड या दोन्ही शब्दांत केवळ एकाच अक्षराचा फरक असून तो काढून टाकल्यास अनेक समाजघटकांना न्याय मिळू शकेल. शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांनी तर आर्थिक आरक्षण असावे असे सांगितले होते. आताही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठींबा देऊ केला आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विधान परिषदेत केले. परिषदेच्या सभागृहात नियम ९७ अन्वये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आ. रामहरी रुपनवर यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेवर त्या बोलत होत्या. 

त्या म्हणाल्या, “अहिल्या देवी होळकर, मल्हारराव होळकर यांनी मराठी साम्राज्याचा केलेला विस्तार व समाज हिताच्या दृष्टीने केलेल्या अनेक योजना आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात. त्यामुळेच ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही थोर व्यक्तिमत्वे आज सर्व समाजाला आपली वाटतात. मंडल आयोगाने सादर केलेल्या अहवालानंतर देशात आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. या समाजाने त्यांच्या आरक्षणासाठी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलने केली आहेत.  आरक्षण मिळावे या मुद्द्यावरून समाजाच्या अपेक्षा वाढल्या आहेत. १९५० ते २०१७ या ६७ वर्षातील ५५ वर्षे कॉंग्रेसचे राज्य या देशावर होते. परंतु या भोळ्या समाजाला कोणत्याही सुविधा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला नाही. मधल्या काळात जनता दलाच्या व्ही पी सिंगांच्या सरकारलाही या विषयी निर्णय घ्यावासा वाटला नाही. राजकीय इच्छाशक्ती नसल्यानेच हा समाज दुर्लक्षित राहिला आहे. धनगर समाजाच्या विकासाची मागणी केलेल्या महाराष्ट्राचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या कार्याची आज आठवण होते आहे. त्यांची कमतरता आजही सर्वांनाच भासत आहे. या आंदोलनाला यश मिळावे या करिता शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल.

धनगर ही या देशातील आती प्राचीन स्वतंत्र अस्तित्व असणारी विचार व आचार धारा आहे .धनगर ही संपूर्ण देशभर आढळणारी बहुभाषिक जमात आहे. आदिवासी वा इतर जातींच्या हिताला धक्का न लावता या समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे.”

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हे