शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने टाकला ‘प्रेशर बॉम्ब’

By admin | Updated: December 6, 2015 02:51 IST

भाजपच्या कोट्यात असलेली विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेनेने दिला आहे.

विधान परिषद स्वबळावर लढणार : किशोर कन्हेरे यांची उमेदवारी निश्चितनागपूर : भाजपच्या कोट्यात असलेली विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची जागा स्वबळावर लढण्याचा नारा शिवसेनेने दिला आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी तडकाफडकी बैठक घेत किशोर कन्हेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर शिवसेनेचे टाकलेल्या या ‘प्रेशर बॉम्ब’मुळे भाजपचे टेन्शन काहीसे वाढले आहे. तर, शिवसेना नेते रामदास कदम हे देखील मुंबईतून रिंगणात असल्यामुळे शिवसेना असे काही करणार नाही, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.शिवसेनेची शनिवारी स्मृती सभागृह, शारदा चौक, जुना सुभेदार ले-आऊट येथे बैठक झाली. तीत खा. कृपाल तुमाने, माजी खा. प्रकाश जाधव, माजी आ. आशिष जैस्वाल, सहसंपर्क प्रमुख किशोर कन्हेरे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग बुराडे, राजू हरणे, जि.प. उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्यासह भाजपचे महापालिका, नगर परिषदेतील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. या बैठकीत भाजपने वेळोवेळी शिवसेनेला डावलल्याचा आरोप करीत भाजपविरोधात आक्रमक भूमिका मांडण्यात आली. नेते व सदस्य म्हणाले, समित्यांमध्ये ४० टक्के वाटा शिवसेनेला देण्याचे ठरले होते, मात्र तसे झाले नाही. तालुकानिहाय संजय गांधी निराधार समिती, समन्वय समितीमध्ये ठरल्यामुळे भाजपने प्रतिनिधित्व दिले नाही. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नाममात्र जागा देण्यात आल्या. प्रत्येक समितीमध्ये शिवसेनेच्या सदस्याला डावलले जात आहे. शिवसेनेच्या सदस्यांची कामे केली जात नाही. काँग्रेसला द्या युतीचा प्रस्तावनागपूर : शासकीय कार्यक्रमांमध्ये शिवसेनेला निमंत्रित केले जात नाही. उद्घाटन तसेच लोकार्पण कार्यक्रमातही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना डावलले जाते. सत्तेत सहभागी असतानाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची भाजप नेत्यांकडून उपेक्षा केली जात आहे, अशा संतप्त भावना यावेळी सदस्यांनी व्यक्त केल्या. तर शिवसेना नेते म्हणाले, महापालिकेत भाजपने शिवसेनेला उपमहापौरपद देण्याची परंपरा मोडित काढली. जिल्हा परिषदेतही सुरुवातीला राष्ट्रवादीशी युती केली. मेट्रोरिजनच्या निवडणुकीतही शिवसेनेने युतीचा प्रस्ताव दिला असताना केवळ एका जागेसाठी भाजपने प्रस्ताव फेटाळून लावला, अशी नाराजी नेत्यांनी व्यक्त केली. काही नेत्यांसह सदस्यांनी शिवसेनेने स्वबळावर ही निवडणूक लढवावी, अशी रोखठोक भूमिका मांडली. तर, काही मतदारांनी शिवसेनेने उमेदवार दिला नाही तर आम्ही भाजपला मतदान करणार नाही, असे स्पष्ट मत नोंदविले. काही सदस्यांनी तर भाजप-राष्ट्रवादीशी तर युती करू शकते तर शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी केली तर गैर काय आहे, असा प्रश्न उपस्थित करीत या प्रस्तावावर विचार करण्याची मागणी केली. काँग्रेस व शिवसेनेचे संख्याबळ एकत्र केले तर ही जागा भाजप जिंकू शकत नाही. भाजपला मोठा धक्का देता येईल, असा विचारही काहींनी मांडला. या भावना पक्षप्रमुखांना कळविल्या जातील, असे नेत्यांनी आश्वस्त केले. (प्रतिनिधी)रामदास कदम रिगणात आहेत हे शिवसेना विसरली का?जागा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिष्ठेची आहे, याची जाणीव असल्यामुळे शिवसेनेने हे दबावतंत्र आखले आहे. मात्र, मुंबई स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे रामदास कदम रिंगणात आहेत, अकोल्यात आ. गोपीकिसन बाजोरिया लढत आहेत याचा शिवसेनेला विसर पडला का, असा सवाल करीत भाजप नेत्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेची दुखती रग दाबली आहे. शिवसेना सत्तेत सहभागी आहे. राज्यात विधान परिषदेच्या आठ जागांसाठी निवडणूक होत आहे. एकमेकांच्या मदतीशिवाय कोणतीही जागा जिंकता येणार नाही, हे शिवसेनेलाही चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळे शिवसेना नागपुरात स्वबळावर लढण्याचा विचार मागे घेईल व भाजपचीच साथ देईल, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.