शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Monsoon Session: शिवसेना आणणार भाजपाला अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 20:49 IST

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपाला आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधाचाही सामना करावा लागण्याचे संकेत आहेत. तसा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषदेतून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांसोबतच सेनेशीही सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्दे शेतकरी, कायदा व सुव्यस्था, बुलेट ट्रेन, नाणार प्रकल्पावरून आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजपाला आता काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या विरोधाचाही सामना करावा लागण्याचे संकेत आहेत. तसा इशारा शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पत्रकार परिषदेतून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांसोबतच सेनेशीही सामना करावा लागणार आहे.नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्र्यांनी मंगळवारीच पत्रपरिषद घेऊन शिवसेनेला चूप केले होते. मात्र विधिमंडळाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाणार प्रकल्पाबरोबरच भाजपाच्या इतरही विकासात्मक प्रकल्पावर ताशेरे ओढत अधिवेशनात शिवसेनेची वाटचाल कशी असेल ते स्पष्ट केले. बळीराजा अस्वस्थ आहे. ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळाली नाही. पीक कर्ज उपलब्ध झाले नाही. पीक कर्जाच्या नावावर शेतकरी महिलांची लैंगिक प्रताडणा होत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे आमदार दोन्ही सदनातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार आहे. विशेष करून विदर्भातील धान, सोयाबीन, कापूस, तूर, दूध उत्पादन यावर शिवसेना आक्रमक राहणार आहे. त्याचबरोबर नागपूरसह राज्यभरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. अफवांच्या माध्यमातून मोठ्या घटना घडत आहे. गुन्हेगारांना गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात राजाश्रय मिळत आहे, हे मुद्दे शिवसेना प्रकर्षाने मांडणार आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी, संभाजीनगरातील दंगल संदर्भात आवाज उचलण्यात येणार आहे. बँकेतून पळ काढलेल्या कर्जबुडव्यासंदर्भात शिवसेना आक्रमक आहे. पत्रपरिषदेला अनिल परब, सुनील प्रभू, रवींद्र पाठक आदी उपस्थित होते.नाणार नाही होऊ देणार नाणार प्रकल्पासंदर्भात स्थानिक कोकणवासीयांनी आपली भूमिका सरकारपुढे मांडली आहे. तरी सुद्धा सरकार या प्रकल्पासाठी आग्रही आहे. शिवसेनेची व पक्ष प्रमुखांची भूमिका स्पष्ट आहे. मुख्यमंत्री जरी प्रकल्पाचे समर्थन करीत असले तरी, आमचे जनतेमध्ये संख्याबळ अधिक आहे. कोकणात हा प्रकल्प होऊ देणार नाही, ही शिवसेनेची भूमिका कायम राहणार आहे. सोबतच बुलेट ट्रेनला ही आमचा विरोध आहे. जनतेचा विनाश करून विकास होत असेल तर, शिवसेनेला तो मान्य नाही, असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.तीन तासांची प्रतीक्षा,मुख्यमंत्र्यांचे तीन मिनिटात उत्तर शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटपात दुजाभाव होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या कक्षात ठाण मांडले. तब्बल तीन तासांनी मुख्यमंत्री फडणवीस हे त्यांच्या भेटीसाठी आले. आपण शिवसेनेच्या आमदारांनाही भरीव निधी दिला आहे. पाहिजे असल्यास कुणाला किती निधी दिला याची माहिती मी स्वत: देईल. दोन दिवसांनी वित्त मंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटात दिले व बैठक संपली.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Shiv Senaशिवसेना