शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नागपुरातील शशी गायधने हत्या प्रकरण : तिघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 00:30 IST

रविवारी रात्री शांतिनगरातील प्रवीण ऊर्फ शशी नत्थूजी गायधने (३२) च्या हत्याकांडातील आरोपी कुख्यात गुंड भुऱ्या ऊर्फ ओमप्रकाश लीलाधर नागपुरे (वय २१), त्याचे वडील आणि भाऊ अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, साध्या सरळ स्वभावाच्या शशीची कुख्यात भुऱ्याने हत्या केल्यामुळे रविवार रात्रीपासून या भागात प्रचंड तणाव आणि संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकुख्यात भुऱ्याला वडील आणि भावानेही केली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी रात्री शांतिनगरातील प्रवीण ऊर्फ शशी नत्थूजी गायधने (३२) च्या हत्याकांडातील आरोपी कुख्यात गुंड भुऱ्या ऊर्फ ओमप्रकाश लीलाधर नागपुरे (वय २१), त्याचे वडील आणि भाऊ अशा तिघांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, साध्या सरळ स्वभावाच्या शशीची कुख्यात भुऱ्याने हत्या केल्यामुळे रविवार रात्रीपासून या भागात प्रचंड तणाव आणि संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.शशी एका कारखान्यात काम करीत होता. तो रविवारी रात्री ७.३० वाजता कामावरून परतला. काही वेळेसाठी तो घराजवळच्या नालंदा चौकात बसला. त्यावेळी तेथे अन्य काही युवकही बसले होते. कुख्यात भुऱ्या तेथे आला आणि तो चौकात शिवीगाळ करीत गोंधळ घालू लागला. त्याने शशीलाही शिवीगाळ केली. शशी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे त्याने शशीला मारहाण केली. वाद वाढवण्याऐवजी शांत स्वभावाचा शशी घरी गेला. काही वेळ आपल्या दोन वर्षीय चिमुकल्यासोबत खेळल्यानंतर तो सामान खरेदी करण्यासाठी बाहेर निघाला. बाजूलाच राहणारा आरोपी लीलाधर नागपुरेने शशीला आवाज दिला. तू भुऱ्याला का रोखले, असा प्रश्न करून लीलाधरने शशीला शिवीगाळ केली. शशी त्याला काही सांगत असतानाच भुऱ्या काठी घेऊन आला. त्याने शशीवर हल्ला चढवला. शशीला त्याने रक्तबंबाळ होईपर्यंत मारले आणि फरार झाला. दरम्यान, आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. मात्र, कुख्यात भुऱ्या आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दहशतीमुळे तातडीने शशीला कुणी रुग्णालयात नेण्याची हिंमत दाखविली नाही. १५ ते २० मिनिटे शशी घटनास्थळीच विव्हळत पडून होता. यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला रुग्णालयात नेले तेव्हा डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. घटनेची सूचना मिळताच शांतिनगर पोलीस तसेच परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर भुऱ्याच्या घरी पोहोचले. तोपर्यंत शशीच्या हत्येची माहिती परिसरातील नागरिकांना कळाल्याने तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता. भुऱ्या आणि त्याच्या परिवाराची या भागात कशी दहशत आहे, त्याबाबत संतप्त नागरिकांनी उपायुक्त माकणीकर यांना माहिती देऊन गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याची मागणी केली.भुऱ्या तसेच त्याचे गुंड वडील आणि भाऊ कुंदन अवैध धंदे करतात. ते कारण नसताना कुणालाही मारहाण करतात. शांतिनगर पोलिसांशी देण्या-घेण्याचे संबंध असल्यामुळे पोलीस त्यांच्याविरुद्ध ठोस कारवाई करीत नाही. त्यामुळे भुऱ्या आणि त्याच्या कुटुंबीयांची हिंमत वाढली. त्याचमुळे त्यांनी एका सरळ साध्या गरीब तरुणाचा बळी घेतला, असेही सांगितले. ते ऐकून संतप्त झालेल्या उपायुक्त माकणीकर यांनी शांतिनगर पोलिसांना आरोपींना तातडीने अटक करण्याचे आदेश दिले.पोलिसांवरही व्हावी कारवाईशशीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब रस्त्यावर आले आहे. त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबात आई मीराबाई, पत्नी प्रियंका आणि दोन वर्षांचा मुलगा सौम्य आहे. शशीच्या भरवशावरच घर चालत होते. शशी सरळ स्वभावाचा युवक होता. त्याचे कुणाशीही वैर नव्हते. त्याची हत्या केल्याने भुऱ्या व त्याच्या कुटुंबाविरुद्ध नागरिकांमध्ये प्रचंड रोष पसरला. तो लक्षात घेता, पोलिसांनी कुख्यात भुऱ्या, त्याचे वडील लीलाधर आणि भाऊ कुंदनला अटक केली.शशीचा मृतदेह त्याच्या घरी आणला तेव्हा या भागाातील तणावात भर पडली. नागरिकांनी भुऱ्याच्या गुन्हेगारी वृत्तीला आणि त्याच्या कुटुंबीयांच्या अवैध धंद्यांना आश्रय देणाऱ्या शांतिनगर पोलिसांच्या कृतीचा निषेध नोंदवला. शांतिनगर घाटावर दुपारी शशीवर त्याच्या दोन वर्षीय सौम्य नामक चिमुकल्याने चुलत काकाच्या मदतीने अंत्यसंस्कार केले. यावेळी अनेकांना हुंदके आवरणे कठीण झाले होते. यावेळी शोकसंतप्त नागरिकांनी भुऱ्या तसेच त्याच्या कुटुंबीयांना मदत करणाऱ्या शांतिनगरातील पोलिसांवर कडक कारवाईची मागणी केली. भुऱ्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलिसांनी हॉटेलचे जेवण दिल्याचाही संतप्त नागरिकांनी आरोप केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून