शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

शरद पवारांनी विदर्भ राज्यासाठी सार्वमत घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:46 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळ्या विदर्भ राज्याचा चेंडू जनतेच्या दिशेने टोलविला आहे. जनतेचे नेमके मत जाणून घेण्यासाठी पवार यांनीच पक्षाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सार्वमत घ्यावे, असे आवाहनच ‘जनमंच’चे अध्यक्ष प्रा.शरद पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देशरद पाटील : विरोधात कौल आला तर विदर्भाची मागणी सोडू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळ्या विदर्भ राज्याचा चेंडू जनतेच्या दिशेने टोलविला आहे. जनतेचे नेमके मत जाणून घेण्यासाठी पवार यांनीच पक्षाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सार्वमत घ्यावे, असे आवाहनच ‘जनमंच’चे अध्यक्ष प्रा.शरद पाटील यांनी केले आहे. जनतेची इच्छा असेल तर विदर्भ वेगळे राज्य करायला माझी काहीच हरकत नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांअगोदर वक्तव्य केले होते हे विशेष.‘जनमंच’ने डिसेंबर २०१३ मध्ये नागपूर शहरात जनमत चाचणी घेतली होती व ६ लाखांपैकी ९७ टक्के लोकांनी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने कौल दिला होता. विदर्भ राज्य आंदोलन समितीने चंद्रपूरला घेतलेला सार्वमतातदेखील असाच कौल मिळाला होता. तरीदेखील पवार यांना वेगळ्या विदर्भाची मागणी ही मूठभर हिंदीभाषिकांची वाटते. त्यांचा या चाचण्यांवर विश्वास नव्हता. त्यामुळे आता त्यांनी विदर्भात पारदर्शक पद्धतीने सार्वमत चाचणी घ्यावी. विदर्भवादीदेखील त्याला निश्चित सहकार्य करतील, असे प्रा.पाटील यांनी प्रतिपादन केले. या सार्वमतातून जो काही कौल येईल तो सर्व विदर्भवादी संघटना मान्य करतील. जनतेने जर वेगळ्या विदर्भाच्या विरोधात कौल दिला तर आम्ही ही मागणी कायमची सोडून देऊ. परंतु जर जनतेचा कौल विदर्भाच्या बाजून आला तर पवारांना तो मान्य करावा लागेल व तशी भूमिका जाहीर करावी लागेल, असे आव्हानच प्रा.पाटील यांनी दिले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnagpurनागपूर