शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

शरद पवारांनी विदर्भ राज्यासाठी सार्वमत घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:46 IST

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळ्या विदर्भ राज्याचा चेंडू जनतेच्या दिशेने टोलविला आहे. जनतेचे नेमके मत जाणून घेण्यासाठी पवार यांनीच पक्षाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सार्वमत घ्यावे, असे आवाहनच ‘जनमंच’चे अध्यक्ष प्रा.शरद पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देशरद पाटील : विरोधात कौल आला तर विदर्भाची मागणी सोडू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळ्या विदर्भ राज्याचा चेंडू जनतेच्या दिशेने टोलविला आहे. जनतेचे नेमके मत जाणून घेण्यासाठी पवार यांनीच पक्षाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सार्वमत घ्यावे, असे आवाहनच ‘जनमंच’चे अध्यक्ष प्रा.शरद पाटील यांनी केले आहे. जनतेची इच्छा असेल तर विदर्भ वेगळे राज्य करायला माझी काहीच हरकत नाही, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांअगोदर वक्तव्य केले होते हे विशेष.‘जनमंच’ने डिसेंबर २०१३ मध्ये नागपूर शहरात जनमत चाचणी घेतली होती व ६ लाखांपैकी ९७ टक्के लोकांनी वेगळ्या विदर्भाच्या बाजूने कौल दिला होता. विदर्भ राज्य आंदोलन समितीने चंद्रपूरला घेतलेला सार्वमतातदेखील असाच कौल मिळाला होता. तरीदेखील पवार यांना वेगळ्या विदर्भाची मागणी ही मूठभर हिंदीभाषिकांची वाटते. त्यांचा या चाचण्यांवर विश्वास नव्हता. त्यामुळे आता त्यांनी विदर्भात पारदर्शक पद्धतीने सार्वमत चाचणी घ्यावी. विदर्भवादीदेखील त्याला निश्चित सहकार्य करतील, असे प्रा.पाटील यांनी प्रतिपादन केले. या सार्वमतातून जो काही कौल येईल तो सर्व विदर्भवादी संघटना मान्य करतील. जनतेने जर वेगळ्या विदर्भाच्या विरोधात कौल दिला तर आम्ही ही मागणी कायमची सोडून देऊ. परंतु जर जनतेचा कौल विदर्भाच्या बाजून आला तर पवारांना तो मान्य करावा लागेल व तशी भूमिका जाहीर करावी लागेल, असे आव्हानच प्रा.पाटील यांनी दिले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारnagpurनागपूर