शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

वेदनांची निराशा झटकून, कोरोना रुग्णांना देताहेत जगण्याची ‘आशा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:08 IST

नागपूर : ‘मोडून पडला संसार तरी, तुटला नाही कणा.... पाठीवरती हात ठेवूनी नुसते लढ म्हणा...’ या पद्यओळी कोरोनाकाळात ग्रामीण ...

नागपूर : ‘मोडून पडला संसार तरी, तुटला नाही कणा.... पाठीवरती हात ठेवूनी नुसते लढ म्हणा...’ या पद्यओळी कोरोनाकाळात ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या आशा वर्करच्या बाबतीत ठळकपणे लागू पडतात. अल्प मोबदला, जिवाचा धोका, कुटुंबाची काळजी आणि तिरस्कार व अपमान सहन करीत गृहविलगीकरणातील रुग्णांच्या काळजीचा वसा या आशांनी यशस्वीरीत्या सांभाळला आहे. बरं या आशा समाजातील अतिशय सामान्य घरातल्या. स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या पोटासाठी अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या महिला. त्यांच्याही आयुष्यात वेदनांची लकेर आहे. मात्र, त्या कोरोना महामारीत फ्रंटलाइन वर्कर म्हणून रुग्णांना जगण्याची ‘आशा’ देत आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये कार्यरत असलेल्या काही आशा आई म्हणून कुटुंबाची व समाजाची काळजी अतिशय चोखपणे बजावत आहेत.

- व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या लक्ष्मी घरडे यांच्याकडे एक ते दीड हजार लोकांची जबाबदारी आहे. त्या म्हणाल्या, कोरोना सुरुवातीला गावात पोहोचला नव्हता; पण कुणाला लक्षणे दिसल्यास मला त्या रुग्णापर्यंत पोहोचून त्याची माहिती घ्यायची होती. सुरुवातीला भरपूर तिरस्कार व अपमान झाला. लोक घरात घेत नव्हते. आता तर कोरोना घराघरांत पोहोचला आहे. अशात स्वत:ची, कुटुंबाची काळजी वाढली आहे. माझ्या पतीला कोरोनाची बाधा झाली होती. रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली होती. मृत्यूच्या दाढेतून त्यांना बाहेर काढले. मुलगा कसाबसा संसर्गापासून बचावला. तरीही निराश झाले नाही. गृहविलगीकरणात असलेल्या प्रत्येक रुग्णाची काळजी घेण्याची माझी जबाबदारी आहे. भीती आहे; पण हेच माझे कर्तव्य आहे.

- गेल्या बारा वर्षांपासून प्रतिमा दरवाडे या आशा वर्कर म्हणून कार्यरत आहेत. पतीच्या निधनानंतर दोन मुले व आईची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आशा म्हणून सेवेचे व्रत स्वीकारल्यानंतर त्यासाठी समर्पणातून काम करीत आहे. कोरोनाने गावागावांत भीतीचे वातावरण आहे. आम्ही आशा या गावकऱ्यांसाठी आशेचे किरण ठरत आहोत. आई म्हणून मुलांचे संगोपन करणे हे कर्तव्यच आहे; पण माझी जबाबदारी समाजाप्रती आहे. ही पण परिस्थिती निघून जाईल, याच भावनेतून सेवा सुरू आहे.

- पाचगाव पीएचसीमध्ये कार्यरत असलेल्या आशा वर्कर सारिका जारोंडे यांना कोरोना काळात अनेक वेदनादायी अनुभव आले. आपले ते अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, एकदा रुग्णाच्या घरी मेडिसिन पोहोचवायल्या गेली. दरम्यान, मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे रुग्णाच्या आजूबाजूच्या घरात थांबण्यासाठी गेल्या; परंतु त्यांना लोकांनी थांबू दिले नाही. लोक घरात येऊ देत नव्हते, शेजारी बोलत नव्हते, सुरुवातीला आम्हाला तिरस्कार सहन करावा लागला. काम करता करता त्या पॉझिटिव्ह झाल्या. पती आणि मुलालाही संसर्ग झाला; पण कोरोनातून तिघांनाही बाहेर काढले. पुन्हा कामाला लागले. महामारीत लढवय्या म्हणून आमचे काम सुरू आहे. प्लेगची साथ आली तेव्हा सावित्रीबाई फुलेंनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. त्यानुसार आशांचा आदर्श असलेल्या सावित्रीबाई फुले यांचे ध्येय सामोर ठेवून कामगिरी बजावत आहे.

- पतीच्या मृत्यूनंतर आशा वर्कर नलिनी महल्ले यांच्यावर दोन मुली व मुलाची जबाबदारी आली. परिस्थितीवर मात करण्यासाठी अल्प मानधनावर आशा स्वयंसेविका म्हणून त्या रुजू झाल्या. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फावल्या वेळात मिळेल ते काम करू लागल्या. मुले मोठी झालीत. नोकरीलाही लागली; पण त्यांनी आशाचा वसा सोडला नाही. कोरोना महामारीत गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची काळजी त्या सातत्याने घेत आहेत.

- उषा शेंडे या आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहेत. पती नसल्याने मुला-मुलीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. कोरोना महामारीच्या काळात गृहविलगीकरणातील रुग्णांचे आरोग्य जपताना त्यासुद्धा पॉझिटिव्ह झाल्या. त्यात त्यांच्या मुलीलीही संसर्ग झाला. स्वत:ची, मुलीची काळजी घेत, त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली. गृहविलगीकरणातील रुग्णांना फोनवरून संपर्क करून त्यांच्या आरोग्याची विचारणा केली. प्रशासनाला आवश्यक असलेली माहिती नियमित पाठविली. काम करीत असताना अनेक अडचणीही आल्यात; पण त्यावर मात करून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला.