शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

सातबाराला सेवा हमीचे संरक्षण नाही

By admin | Updated: May 6, 2015 02:10 IST

जनतेची कामे निर्धारित वेळेत व्हावी यासाठी सेवा हमी कायदा आणला असला तरी यात शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सातबारा उताऱ्याचा समावेश नाही.

नागपूर : जनतेची कामे निर्धारित वेळेत व्हावी यासाठी सेवा हमी कायदा आणला असला तरी यात शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सातबारा उताऱ्याचा समावेश नाही. विशेष म्हणजे यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात आणि चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही.सेवा हमी कायद्यात समाविष्ट करण्यात आलेल्या सेवांच्या यादीवर नजर टाकल्यास सामान्य नागरिकांच्यादृष्टीने महत्त्वाच्या ठरतील अशा काही सेवांचा त्यात समावेश नसल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे हा कायदा तयार करताना सनदी अधिकाऱ्यांनी स्वत:ला यापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात यश मिळविले आहे. यात प्रामुख्याने कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीच भरडल्या जाण्याची शक्यता असल्याने याला पुढच्या काळात विरोध होण्याची दाट शक्यता आहे.सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने त्यांना सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यातून कमालीचा असंतोष निर्माण होतो आहे. तो दूर करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सेवा हमी कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आश्वासन पूर्ती केली. कामांसाठी वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आणि त्याचा भंग झाल्यास दंडाची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.मात्र हे करताना यातून काही महत्त्वांच्या सेवा सुटल्या आणि कायद्यात काही त्रुटीही राहून गेल्या असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. यात शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्याचा समावेश नाही, जमीन अकृषक करण्याच्या कामाचाही उल्लेख नाही. कामांंसाठी वेळेची मर्यादा असली तरी ती नेमकी केव्हापासून, अर्ज केल्यापासून की अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे गेल्यापासून याबाबत स्पष्टता नाही. जात प्रमाणपत्रासाठी अर्ज सेतूत करावा लागतो. तेथून तो अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जातो हे येथे उल्लेखनीय. ग्रामपंचायत पातळीवरील काम वेळेत न झाल्यास त्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्याकडे अपील करण्याची तरतूद आहे. त्यासाठी त्याला तालुक्याला जावे लागणार आहे.(प्रतिनिधी)