शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

सातबाराला सेवा हमीचे संरक्षण नाही

By admin | Updated: May 6, 2015 02:10 IST

जनतेची कामे निर्धारित वेळेत व्हावी यासाठी सेवा हमी कायदा आणला असला तरी यात शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सातबारा उताऱ्याचा समावेश नाही.

नागपूर : जनतेची कामे निर्धारित वेळेत व्हावी यासाठी सेवा हमी कायदा आणला असला तरी यात शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सातबारा उताऱ्याचा समावेश नाही. विशेष म्हणजे यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात आणि चिरीमिरी दिल्याशिवाय काम होत नाही.सेवा हमी कायद्यात समाविष्ट करण्यात आलेल्या सेवांच्या यादीवर नजर टाकल्यास सामान्य नागरिकांच्यादृष्टीने महत्त्वाच्या ठरतील अशा काही सेवांचा त्यात समावेश नसल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे हा कायदा तयार करताना सनदी अधिकाऱ्यांनी स्वत:ला यापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात यश मिळविले आहे. यात प्रामुख्याने कनिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीच भरडल्या जाण्याची शक्यता असल्याने याला पुढच्या काळात विरोध होण्याची दाट शक्यता आहे.सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने त्यांना सरकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यातून कमालीचा असंतोष निर्माण होतो आहे. तो दूर करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सेवा हमी कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आश्वासन पूर्ती केली. कामांसाठी वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आली आणि त्याचा भंग झाल्यास दंडाची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.मात्र हे करताना यातून काही महत्त्वांच्या सेवा सुटल्या आणि कायद्यात काही त्रुटीही राहून गेल्या असे काही जाणकारांचे म्हणणे आहे. यात शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्याचा समावेश नाही, जमीन अकृषक करण्याच्या कामाचाही उल्लेख नाही. कामांंसाठी वेळेची मर्यादा असली तरी ती नेमकी केव्हापासून, अर्ज केल्यापासून की अर्ज संबंधित अधिकाऱ्यांकडे गेल्यापासून याबाबत स्पष्टता नाही. जात प्रमाणपत्रासाठी अर्ज सेतूत करावा लागतो. तेथून तो अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जातो हे येथे उल्लेखनीय. ग्रामपंचायत पातळीवरील काम वेळेत न झाल्यास त्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्याकडे अपील करण्याची तरतूद आहे. त्यासाठी त्याला तालुक्याला जावे लागणार आहे.(प्रतिनिधी)