शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

सात तरुणांना जलसमाधी

By admin | Updated: March 23, 2015 02:27 IST

पिकनिकसाठी तलावावर गेलेले १० पैकी ७ तरुण तलावात बुडाले. यात दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. तिघे सुदैवाने बचावले.

नागपूर : पिकनिकसाठी तलावावर गेलेले १० पैकी ७ तरुण तलावात बुडाले. यात दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. तिघे सुदैवाने बचावले. रविवारी सायंकाळी वडदजवळच्या मंगरुळ तलावात ही घटना घडली. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली असून, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तलावाकडे धाव घेत शोधकार्य सुरू केले. मात्र, अंधार पसरल्यामुळे वृत्त लिहिस्तोवर एकही तरुण बाहेर काढण्यात यश आलेले नव्हते. त्यामुळे या तरुणांना जलसमाधी मिळाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सक्करदरा परिसरातील १० तरुण रविवारी सकाळी पिकनिकसाठी मंगरुळ शिवारातील तलावावर गेले होते. तलावाच्या काठावर डोंगा होता. नावाडी नसताना आणि डोंगा चालविण्याचे कौशल्य नसतानाही या तरुणांनी डोंग्यात बसून तो तलावाच्या मध्ये नेला. याचवेळी काही जणांनी सेल्फी काढणे सुरू केले. सेल्फीच्या नादात सर्वच्या सर्व तरुण डोंग्याच्या एकाच बाजूला उभे झाले. त्यामुळे तो पाण्यात उलटला. परिणामी सर्व तरुण पाण्यात बुडाले. तिघांना पोहणे येत असल्यामुळे ते काठावर पोहचले. बाकीचे सात तरुण पाण्यात बुडाले. हादरलेल्या तिघांनी बाजूच्या गावात जाऊन ही घटना सांगितली. त्यानंतर गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कुहीच्या पोलीस पथकाला तातडीने तलावावर पोहचण्याचे आदेश दिले. महसूल प्रशासनातील वरिष्ठांशी चर्चा करून त्यांनी अग्निशमन दलासह आवश्यक ती यंत्रणा घटनास्थळी पाठवली. तत्पूर्वी पट्टीच्या पोहणाऱ्यांच्या मदतीने तलावात बुडालेल्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, अंधार पडल्यामुळे वृत्त लिहिस्तोवर कोणत्याही तरुणाला तलावाबाहेर काढण्यात यश आलेले नव्हते. (प्रतिनिधी)अविचारी वृत्तीमुळे झाला घाततलावात बुडालेल्या तरुणांचा घात अतिउत्साहामुळेच झाला. डोंग्याला (बोट) छिद्र असताना, तो चालविता येत नसताना आणि नावाडी नसताना तसेच पोहणेही येत नसतानाही हे तरुण डोंग्यात बसले. सर्वच्या सर्व फोटोग्राफीसाठी वेडीवाकडी पोजिशन घेऊ लागले. कुणीही कुणाला समजावण्याचा अथवा रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचमुळे सात जीवांचा घात झाला. बुडालेले तरुण हर्षल प्रकाश आदमने (वय १८), चेतन प्रकाश आदमने (वय २०), गोवर्धन बापू थोटे (वय १८), राहुल वालोदे (वय २३), राम शिवरकर (वय २४), मकसूद शेख अब्दुल सय्यद (वय २७) आणि बटर (वय २१) अशी तलावात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. यातील हर्षल आयटीआयचा तर, चेतन केडीके कॉलेजचा आणि गोवर्धन (वय १८), गायकवाड पाटील तंत्रनिकेतनचा विद्यार्थी होय. मकसूद आॅटोचालक आहे तर, वालोदे एका कंपनीत नोकरी करतो. बटर टोपणनाव असलेल्या तरुणाबाबत माहिती कळू शकली नाही. आशीर्वादनगरात हळहळवस्तीतील सात मुले तलावात बुडल्याच्या वार्तेने आशीर्वादनगरात तीव्र शोककळा पसरली. काही जण घटनास्थळाकडे रवाना झाले तर, मोठ्या संख्येने नागरिक संबंधित तरुणांच्या घरासमोर गोळा झाले. आदमने परिवारातील हर्षल आणि चेतन ही दोन्ही पाण्यात बुडाल्याचे कळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयात अन् शेजारी तीव्र शोककळा पसरली. हर्षल आणि चेतनचे आईवडिल, नातेवाईक या घटनेमुळे सुन्नच झाले. शेजारी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करीत होते. कोहळे पोहचले घटनास्थळीतलावाच्या पाण्यात बुडालेले सर्व तरुण दक्षिण नागपूर मतदार संघात येणाऱ्या आशीर्वादनगरातील आहे. त्यामुळे वृत्त कळाल्यानंतर आमदार सुधाकर कोहळे रात्री १० वाजता घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथील पोलीस अधिकारी आणि गावकऱ्यांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. लोकमत प्रतिनिधीसोबत भ्रमणध्वनीवर बोलताना त्यांनी घटनास्थळावरची स्थिती सांगितली. तर्कवितर्क अन् धावपळबचावलेल्या एका तरुणाने नागपुरातील आपल्या नातेवाईकाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर एकच धावपळ सुरू झाली. जंगलात आडवाटेला असलेले घटनास्थळ शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तेथे फोनही लागत नव्हता. त्यामुळे जास्तच गोंधळ वाढला. तर्कवितर्क आणि अफवांनाही उधाण आले. सर्वत्र चर्चेला उधाण आल्यामुळे पोलिसांपूर्वीच तेथे आजूबाजूूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येत पोहचले. उशिरा रात्रीपर्यंत शोधकार्य सुरूच होते.