शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग; शेतकरी-शेतमजुरांचं का बरं मरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 11:37 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ८० टक्के लोक भारतात तर २० टक्के लोक इंडियात राहत आहेत. इंडियाचा सुपर इंडिया ...

ठळक मुद्देभारत विरुद्ध इंडिया चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ८० टक्के लोक भारतात तर २० टक्के लोक इंडियात राहत आहेत. इंडियाचा सुपर इंडिया होत आहे तर भारताचा इथिओपिया, सोमालिया होत आहे. भारताच्या या अवस्थेला व्यवस्थाच जबाबदार आहे. सरकार सातवा वेतन आयोग लागू करताना ८० टक्के भारताचा विचार का करीत नाही. सरकारच्या अशा धोरणामुळे ‘सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अन् शेतकरी-शेतमजुरांचं का बरं मरण’अशी म्हणण्याची वेळ आली आहे. वेतन आयोगाच्या तुलनेत शेतमजुरांची मजुरी वाढली नाही तर सबका साथ सबका विकास कसा होईल, असा सूर १६ व्या जागतिक मराठी संमेलनात आयोजित ‘भारत विरुद्ध इंडिया’ या चर्चासत्रात मान्यवरांनी आळवला.भारत म्हणजे गाव व इंडिया म्हणजे शहर या दोन्हीच्या अवस्था आणि व्यवस्थेवर या चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्रात शेतकरी नेते विजय जावंधिया, प्रा. शरद पाटील, ललित बहाळे, डॉ. गिरीश गांधी, कवी तुकाराम धांडे, भरत दौंडकर सहभागी झाले होते. या चर्चासत्रात संवादक म्हणून कवी रामदास फुटाणे व रमेश बोरकुटे म्हणून सहभागी झाले होते. चर्चासत्राच्या प्रस्तावनेतच फुटाणे म्हणाले की, इंडियाच्या विकासासाठी स्मार्ट सिटी, मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन कोट्यवधीचे बजेट उपलब्ध होत आहे, तर भारतात ५० हजारासाठी शेतकरी आत्महत्या करतो आहे. शहर आणि ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्थेत ही दुफळी का? असा सवाल त्यांनी जावंधिया यांना केला. यावर उत्तर देताना जावंधिया म्हणाले की, गोऱ्या इंग्रजापासून स्वीकारलेली ही व्यवस्था आहे. त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवून, शेतकऱ्यांवर नाना तऱ्हेचे कर लावले होते. असेच काहीसे आजही इंडिया भारतात होत आहे. ही चर्चा पुढे स्वामीनाथन आयोगावर आली. यावेळी प्रा. शरद पाटील म्हणाले की, हरित क्रांती ही डॉ. स्वामीनाथन यांच्यामुळे झाली. त्यावेळी ५० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात भूकबळी होतात. त्यावेळी अन्न हे आंतरराष्ट्रीय व्यवहारात प्रभावी शस्त्र होते. हरित क्रांतीमुळे शेतीचे उत्पादन वाढले. त्यावेळी हरित क्रांतीची गरज होती, असे पाटील म्हणाले. कारखानदारी टिकविण्यासाठी शेतकऱ्यांशी तडजोडचर्चासत्रात ललित बिहाळे म्हणाले की, कारखानदारी टिकविण्यासाठी सरकारची धोरणे शेतकऱ्यांप्रती कमकुवत ठरत आलेली आहे. दुसऱ्या महायुद्धात काही देश जिंकल्यानंतरही त्यांची हरल्यासारखीच अवस्था झाली होती. तशी भारताची झाली आहे.यापुढे कुठलाही वेतन आयोग सरकारने आणू नयेभारत आणि इंडियाच्या अवस्थेवर समर्पक उत्तर देताना डॉ. गिरीश गांधी म्हणाले की, देशातील सर्व घटकांना सरकार समानतेचे वेतन देऊ शकत नसेल तर सरकारने पुढचा वेतन आयोग आणूच नये. त्याचबरोबर फुकट अन्नधान्य वाटतानाही बेरोजगाराची फौज वाढवू नये. भारताच्या अवस्थेवरा हृदयद्रावक कविताया चर्चासत्रात ग्रामीण भागातील दोन कवींना सहभागी केले होते. तुकाराम धांडे, भरत दौंडकर या कवींनी भारताच्या अवस्थेवर मार्मिक कविता करून सर्वांना शेतकऱ्यांच्या अवस्थेचे भान करून दिले.

टॅग्स :marathiमराठीIndiaभारत