शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
4
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
5
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
6
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
7
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
8
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
9
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
10
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
11
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
12
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
13
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
14
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
15
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
16
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
17
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
18
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
19
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
20
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग; शेतकरी-शेतमजुरांचं का बरं मरण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 23:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ८० टक्के लोक भारतात तर २० टक्के लोक इंडियात राहत आहेत. इंडियाचा सुपर इंडिया ...

ठळक मुद्देभारत विरुद्ध इंडिया चर्चासत्रात मान्यवरांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ८० टक्के लोक भारतात तर २० टक्के लोक इंडियात राहत आहेत. इंडियाचा सुपर इंडिया होत आहे तर भारताचा इथिओपिया, सोमालिया होत आहे. भारताच्या या अवस्थेला व्यवस्थाच जबाबदार आहे. सरकार सातवा वेतन आयोग लागू करताना ८० टक्के भारताचा विचार का करीत नाही. सरकारच्या अशा धोरणामुळे ‘सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अन् शेतकरी-शेतमजुरांचं का बरं मरण’अशी म्हणण्याची वेळ आली आहे. वेतन आयोगाच्या तुलनेत शेतमजुरांची मजुरी वाढली नाही तर सबका साथ सबका विकास कसा होईल, असा सूर १६ व्या जागतिक मराठी संमेलनात आयोजित ‘भारत विरुद्ध इंडिया’ या चर्चासत्रात मान्यवरांनी आळवला.भारत म्हणजे गाव व इंडिया म्हणजे शहर या दोन्हीच्या अवस्था आणि व्यवस्थेवर या चर्चासत्राचे आयोजन केले होते. चर्चासत्रात शेतकरी नेते विजय जावंधिया, प्रा. शरद पाटील, ललित बहाळे, डॉ. गिरीश गांधी, कवी तुकाराम धांडे, भरत दौंडकर सहभागी झाले होते. या चर्चासत्रात संवादक म्हणून कवी रामदास फुटाणे व रमेश बोरकुटे म्हणून सहभागी झाले होते. चर्चासत्राच्या प्रस्तावनेतच फुटाणे म्हणाले की, इंडियाच्या विकासासाठी स्मार्ट सिटी, मेट्रो ट्रेन, बुलेट ट्रेन कोट्यवधीचे बजेट उपलब्ध होत आहे, तर भारतात ५० हजारासाठी शेतकरी आत्महत्या करतो आहे. शहर आणि ग्रामीण भागातील आर्थिक व्यवस्थेत ही दुफळी का? असा सवाल त्यांनी जावंधिया यांना केला. यावर उत्तर देताना जावंधिया म्हणाले की, गोऱ्या इंग्रजापासून स्वीकारलेली ही व्यवस्था आहे. त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवून, शेतकऱ्यांवर नाना तऱ्हेचे कर लावले होते. असेच काहीसे आजही इंडिया भारतात होत आहे. ही चर्चा पुढे स्वामीनाथन आयोगावर आली. यावेळी प्रा. शरद पाटील म्हणाले की, हरित क्रांती ही डॉ. स्वामीनाथन यांच्यामुळे झाली. त्यावेळी ५० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात भूकबळी होतात. त्यावेळी अन्न हे आंतरराष्ट्रीय व्यवहारात प्रभावी शस्त्र होते. हरित क्रांतीमुळे शेतीचे उत्पादन वाढले. त्यावेळी हरित क्रांतीची गरज होती, असे पाटील म्हणाले. कारखानदारी टिकविण्यासाठी शेतकऱ्यांशी तडजोडचर्चासत्रात ललित बिहाळे म्हणाले की, कारखानदारी टिकविण्यासाठी सरकारची धोरणे शेतकऱ्यांप्रती कमकुवत ठरत आलेली आहे. दुसऱ्या महायुद्धात काही देश जिंकल्यानंतरही त्यांची हरल्यासारखीच अवस्था झाली होती. तशी भारताची झाली आहे.यापुढे कुठलाही वेतन आयोग सरकारने आणू नयेभारत आणि इंडियाच्या अवस्थेवर समर्पक उत्तर देताना डॉ. गिरीश गांधी म्हणाले की, देशातील सर्व घटकांना सरकार समानतेचे वेतन देऊ शकत नसेल तर सरकारने पुढचा वेतन आयोग आणूच नये. त्याचबरोबर फुकट अन्नधान्य वाटतानाही बेरोजगाराची फौज वाढवू नये. भारताच्या अवस्थेवरा हृदयद्रावक कविताया चर्चासत्रात ग्रामीण भागातील दोन कवींना सहभागी केले होते. तुकाराम धांडे, भरत दौंडकर या कवींनी भारताच्या अवस्थेवर मार्मिक कविता करून सर्वांना शेतकऱ्यांच्या अवस्थेचे भान करून दिले.

टॅग्स :marathiमराठीIndiaभारत