शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Samruddhi Mahamarg: मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’पेक्षा सातपट लांब; समृद्धी महामार्ग ठरणार ‘गेमचेंजर’

By कमलेश वानखेडे | Updated: December 11, 2022 09:55 IST

या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त ८ तासांत करता येणार आहे.  नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते. आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे.

- कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २००२ साली १६०० कोटी रुपये खर्च करून ९४.५ किमीचा मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’ बांधण्यात आला होता. या मार्गामुळे मुंबई-पुण्याच्या एकूणच विकासात भर घातली. आता तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च करून ७०१ किलोमीटर लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग साकार होत आहे.  हा मार्ग तब्बल १० जिल्हे व २६ तालुक्यांना जोडणार असून, हा मार्ग महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. 

या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त ८ तासांत करता येणार आहे.  नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते. आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे.  विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी, नव उद्योजक, लहान उद्योजक, व्यापारी यांना त्यांच्या उद्योग, व्यवसायाच्या वाढीसाठी हा मार्ग एकप्रकारे वरदान ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांत जास्त खनिज संपदा  चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व आसपासच्या परिसरात आहे. मात्र, खनिजावर आधारित कारखानदारी एक हजार किलोमीटरवर आहे. दूरवरच्या उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल पोहोचविणे आता सोयीचे होणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतमाल लवकर मुंबईसारख्या मार्केट यार्डमध्ये पोहोचविणे शक्य होईल. 

पर्यटन फुलणार : हा  महामार्ग शिर्डी, वेरुळ, लोणार सरोवर, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर, नाशिक, इगतपुरी आदी विविध पर्यटन स्थळांना जोडतो. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल.

राज्याची उपराजधानी नागपूर ते देशाची आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा हा मार्ग पूर्ण झाला असून, लोकार्पणाची नागपूरजवळील हिंगणा तालुक्यातील वायफळ येथे अशी जय्यत तयारी झाली आहे. (छाया : विशाल महाकाळकर)

एका एकरमध्ये उभारला मंडपधामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी एका एकरात मंडप उभारला गेला आहे.  तेथे तीन हजार  लोकांची उपस्थिती राहणार आहे. धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील  ७३ किलोमीटर हद्दीतून हा समृद्धी महामार्ग गेला आहे. आसेगाव व शिवणी येथे २० किमी अंतरावर दोन टोल आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघातील  ग्रामस्थांना या कार्यक्रमाचे थेट  प्रक्षेपण पाहता यावे, यासाठी आसेगाव सावळा फाटा परिसरात  एक एकरात मंडप उभारण्यात आला, तर  १६ बाय १२ ची डिजिटल स्क्रीन लावण्यात आली आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस