शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
3
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
4
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
5
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
6
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
7
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
8
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
9
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
10
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
11
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
12
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
13
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
14
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
15
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
16
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
17
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
18
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
19
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
20
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

Samruddhi Mahamarg: मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’पेक्षा सातपट लांब; समृद्धी महामार्ग ठरणार ‘गेमचेंजर’

By कमलेश वानखेडे | Updated: December 11, 2022 09:55 IST

या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त ८ तासांत करता येणार आहे.  नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते. आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे.

- कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २००२ साली १६०० कोटी रुपये खर्च करून ९४.५ किमीचा मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’ बांधण्यात आला होता. या मार्गामुळे मुंबई-पुण्याच्या एकूणच विकासात भर घातली. आता तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च करून ७०१ किलोमीटर लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग साकार होत आहे.  हा मार्ग तब्बल १० जिल्हे व २६ तालुक्यांना जोडणार असून, हा मार्ग महाराष्ट्रासाठी ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. 

या महामार्गामुळे १८ तासांचा नागपूर ते मुंबई हा प्रवास आता फक्त ८ तासांत करता येणार आहे.  नागपूर ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी १३ तास लागत होते. आता हे अंतर पाच तासांत पार करणे शक्य होणार आहे.  विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी, नव उद्योजक, लहान उद्योजक, व्यापारी यांना त्यांच्या उद्योग, व्यवसायाच्या वाढीसाठी हा मार्ग एकप्रकारे वरदान ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांत जास्त खनिज संपदा  चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व आसपासच्या परिसरात आहे. मात्र, खनिजावर आधारित कारखानदारी एक हजार किलोमीटरवर आहे. दूरवरच्या उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल पोहोचविणे आता सोयीचे होणार आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतमाल लवकर मुंबईसारख्या मार्केट यार्डमध्ये पोहोचविणे शक्य होईल. 

पर्यटन फुलणार : हा  महामार्ग शिर्डी, वेरुळ, लोणार सरोवर, अजिंठा, औरंगाबाद, त्र्यंबकेश्वरचे ज्योतिर्लिंग आणि घृष्णेश्वर, नाशिक, इगतपुरी आदी विविध पर्यटन स्थळांना जोडतो. त्यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल.

राज्याची उपराजधानी नागपूर ते देशाची आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते लोकार्पण होणार आहे. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा हा मार्ग पूर्ण झाला असून, लोकार्पणाची नागपूरजवळील हिंगणा तालुक्यातील वायफळ येथे अशी जय्यत तयारी झाली आहे. (छाया : विशाल महाकाळकर)

एका एकरमध्ये उभारला मंडपधामणगाव रेल्वे (जि. अमरावती) : समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी एका एकरात मंडप उभारला गेला आहे.  तेथे तीन हजार  लोकांची उपस्थिती राहणार आहे. धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील  ७३ किलोमीटर हद्दीतून हा समृद्धी महामार्ग गेला आहे. आसेगाव व शिवणी येथे २० किमी अंतरावर दोन टोल आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघातील  ग्रामस्थांना या कार्यक्रमाचे थेट  प्रक्षेपण पाहता यावे, यासाठी आसेगाव सावळा फाटा परिसरात  एक एकरात मंडप उभारण्यात आला, तर  १६ बाय १२ ची डिजिटल स्क्रीन लावण्यात आली आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस