शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

नागपूर परिमंडळात विजेच्या मागणीत सात टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:40 IST

वीज वितरण हानी एक टक्क्याहून कमी करीत महावितरणच्या नागपूर परिमंडळात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ७ टक्के विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या वाढत्या मागणीसोबच ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.

ठळक मुद्देवितरण हानी एक टक्क्याहून कमी : ८० हजारावर थकबाकीदारांचा पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज वितरण हानी एक टक्क्याहून कमी करीत महावितरणच्या नागपूर परिमंडळात मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या आर्थिक वर्षात तब्बल ७ टक्के विजेची मागणी वाढली आहे. विजेच्या वाढत्या मागणीसोबच ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीज पुरवठा देण्यासाठी महावितरणकडून सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.मागील वर्षी नागपूर परिमंडलात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ४,६१३.५५ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला होता. पण नुकत्याच संपलेल्या २०१७-१८ या आर्थिक वर्षातील फेब्रुवारीपर्यंत ४९३८. ८५ दशलक्ष युनिट विजेचा वापर परिमंडळातील वीज ग्राहकांनी केला आहे. घरगुती वीज ग्राहकांचा वीज वापर या काळात वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मागील वर्षी १२३८.१८ दशलक्ष युनिट विजेचा वापर घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांनी केला तर २०१७-१८ या आर्थिक वर्षात१४७७.३६ दशलक्ष युनिट विजेचा वापर घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांनी केला आहे. यात नागपूर ग्रामीणमध्ये सर्वाधिक वीज वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे. नागपूर ग्रामीणमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५५८. ५९ दशलक्ष युनिट,नागपूर शहर मंडलात ५२९. ७२ दशलक्ष युनिट तर वर्धा मंडलात ३८९. ०५ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे. या मंडलात ही वाढ अनुक्रमे २. १७ टक्के , २.७० टक्के आणि ३.५६ टक्के झाली आहे. वर्धा जिल्ह्यात टक्केवारीच्या हिशेबात वाढ झाली आहे. एकूण वीज वापराचा हिशेब बघितला तर नागपूर ग्रामीण मंडळात मागील आर्थिक वर्षात २१५१.५८ दशलक्ष युनिट विजेचा वापर झाला तर शहरात १४९७.९५ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे. वर्धा जिल्ह्यात १२८९.३२ दशलक्ष युनिटचा वापर झाला आहे.वीज ग्राहकांना आर्थिक शिस्त लागावी म्हणून महावितरणकडून नोव्हेंबर-२०१७ पासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून पुनर्जोडणी शुल्क भरून वीज पुरवठा नियमित करणे असे याचे स्वरूप होते. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ८०,५३२ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून पुनर्जोडणी शुल्कापोटी ५६ लाख रुपये गोळा करण्यात आले.वितरण हानी कमीलघुदाब आणि उच्चदाब वितरण हानीचे प्रमाणही ऊजामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनामुळे कमी करण्यात महावितरणच्या स्थानिक अधिकारी वगार्ला यश आले आहे. १६-१७ या आर्थिक वर्षात नागपूर परिमंडळात वितरण हानीचे प्रमाण ७.८२ टक्के होते ते २०१७-१८ मध्ये फेब्रुवारीअखेर ६.९९ टक्क्यापर्यंत खाली आले होते. मार्चअखेरची आकडेवारी एकत्रित केल्यास वितरण हानीचा आकडा आणखी खाली येऊ शकतो. रफिक शेख, मुख्य अभियंता, नागपूर परिमंडळ११ हजारावर मीटर बदलले वीज ग्राहकांकडून नादुरुस्त वीज मीटर संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. याची दाखल घेत मार्च-२०१८ अखेरपर्यंत १०,५६५ नादुरुस्त, खराब वीज मीटर बदलण्यात आले असून एप्रिल-२०१८ मध्ये ५३२ वीज मीटर बदलण्यात आले आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर