शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

सात लाख विद्यार्थ्यांना मिळणार आम आदमी विमा योजनेचा लाभ

By admin | Updated: June 19, 2014 00:55 IST

राज्यातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांकरिता यंदा प्रभावीपणे आमआदमी विमा शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशीच निवड : विद्यार्थी वंचित राहिल्यास शाळा व्यवस्थापनावर कारवाईमोहन राऊत - अमरावतीराज्यातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांकरिता यंदा प्रभावीपणे आमआदमी विमा शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून सात लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे़ ज्या शाळांमधील विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहील त्या शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे. आमआदमी विमा योजना ही केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त पुढाकाराने राबविली जाते़ केंद्र शासनाच्या निकषानुसार ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो़ या निकषांमध्ये राज्य शासनाने गतवेळी बदल करून अडीच एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना योजनेसाठी पात्र ठरविले आहे. योजनेंतर्गत प्रती लाभार्थी वार्षिक दोनशे रूपये विमा हप्त्यापैकी शंभर रूपये केंद्र शासन तर शंभर रूपये राज्य शासन भरणार आहे.योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रूपये, नैसर्गिक मृत्यू आल्यास ३० हजार रूपये, एक हात किंवा एका पायाला अपंगत्व आल्यास ३७ हजार ५०० रूपये, दोन्ही हात किंवा पायांना अपंगत्व आल्यास ७५ हजार रूपये विम्याचा लाभ मिळतो. याशिवाय दोन अपत्ये असलेल्या लाभार्थ्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना आम आदमी विमा शिष्यवृत्ती योजनेचा थेट लाभ मिळणार आहे़ या विद्यार्थ्यांना शंभर रूपये दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येईल. इतर शिष्यवृत्ती घेणारा विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल़