शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सात लाख विद्यार्थ्यांना मिळणार आम आदमी विमा योजनेचा लाभ

By admin | Updated: June 19, 2014 00:55 IST

राज्यातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांकरिता यंदा प्रभावीपणे आमआदमी विमा शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशीच निवड : विद्यार्थी वंचित राहिल्यास शाळा व्यवस्थापनावर कारवाईमोहन राऊत - अमरावतीराज्यातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांकरिता यंदा प्रभावीपणे आमआदमी विमा शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून सात लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे़ ज्या शाळांमधील विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहील त्या शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे. आमआदमी विमा योजना ही केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त पुढाकाराने राबविली जाते़ केंद्र शासनाच्या निकषानुसार ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो़ या निकषांमध्ये राज्य शासनाने गतवेळी बदल करून अडीच एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना योजनेसाठी पात्र ठरविले आहे. योजनेंतर्गत प्रती लाभार्थी वार्षिक दोनशे रूपये विमा हप्त्यापैकी शंभर रूपये केंद्र शासन तर शंभर रूपये राज्य शासन भरणार आहे.योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रूपये, नैसर्गिक मृत्यू आल्यास ३० हजार रूपये, एक हात किंवा एका पायाला अपंगत्व आल्यास ३७ हजार ५०० रूपये, दोन्ही हात किंवा पायांना अपंगत्व आल्यास ७५ हजार रूपये विम्याचा लाभ मिळतो. याशिवाय दोन अपत्ये असलेल्या लाभार्थ्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना आम आदमी विमा शिष्यवृत्ती योजनेचा थेट लाभ मिळणार आहे़ या विद्यार्थ्यांना शंभर रूपये दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येईल. इतर शिष्यवृत्ती घेणारा विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल़