शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

सात लाख विद्यार्थ्यांना मिळणार आम आदमी विमा योजनेचा लाभ

By admin | Updated: June 19, 2014 00:55 IST

राज्यातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांकरिता यंदा प्रभावीपणे आमआदमी विमा शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशीच निवड : विद्यार्थी वंचित राहिल्यास शाळा व्यवस्थापनावर कारवाईमोहन राऊत - अमरावतीराज्यातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांकरिता यंदा प्रभावीपणे आमआदमी विमा शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला असून सात लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे़ ज्या शाळांमधील विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहील त्या शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्यात येणार आहे. आमआदमी विमा योजना ही केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त पुढाकाराने राबविली जाते़ केंद्र शासनाच्या निकषानुसार ग्रामीण भागातील भूमिहीन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो़ या निकषांमध्ये राज्य शासनाने गतवेळी बदल करून अडीच एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना योजनेसाठी पात्र ठरविले आहे. योजनेंतर्गत प्रती लाभार्थी वार्षिक दोनशे रूपये विमा हप्त्यापैकी शंभर रूपये केंद्र शासन तर शंभर रूपये राज्य शासन भरणार आहे.योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रूपये, नैसर्गिक मृत्यू आल्यास ३० हजार रूपये, एक हात किंवा एका पायाला अपंगत्व आल्यास ३७ हजार ५०० रूपये, दोन्ही हात किंवा पायांना अपंगत्व आल्यास ७५ हजार रूपये विम्याचा लाभ मिळतो. याशिवाय दोन अपत्ये असलेल्या लाभार्थ्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना आम आदमी विमा शिष्यवृत्ती योजनेचा थेट लाभ मिळणार आहे़ या विद्यार्थ्यांना शंभर रूपये दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येईल. इतर शिष्यवृत्ती घेणारा विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असेल़