शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

राष्ट्रीय महालोक अदालतीत २४ हजार प्रकरणांचा निपटारा

By admin | Updated: December 14, 2014 00:44 IST

नागपूर जिल्हा न्यायालयात शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रीय महालोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ३१ हजार १३६ प्रकरणांपैकी २४ हजार ७१ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली निघाली.

नागपूर : नागपूर जिल्हा न्यायालयात शनिवारी पार पडलेल्या राष्ट्रीय महालोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ३१ हजार १३६ प्रकरणांपैकी २४ हजार ७१ प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली निघाली. ही टक्केवारी ७६ एवढी असून प्रलंबित प्रकरणे ६ टक्क्यांनी कमी झाली आहेत. विशेष अभियान अंतर्गतची ८ हजार ६०१ प्रकरणे निकाली काढण्यात आली. ही माहिती जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी दिली. राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरण, राज्य विधीसेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाने संयुक्तपणे या महालोक अदालतीचे आयोजन केले होते. प्रकरणे हाताळण्यासाठी ९४ पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात एक न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ता आणि विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. आठ लाखांच्या दाव्याचे पहिलेच यशमहालोक अदालतीच्या कामकाजाला प्रारंभ होताच निवृत्त जिल्हा न्यायाधीश कुबडे यांच्या प्रयत्नाने मोटार अपघात दाव्याचे एक प्रकरण केवळ तासाभरातच निकाली निघाले. अर्जकर्त्या वत्सला भगवान ठवकर यांनी त्यांचा ८ लाखांचा दावा ५ लाख रुपयात संपविला. युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीने लागलीच तडजोड रकमेचा धनादेश प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या मार्फत ठवकर यांच्या स्वाधीन केला. चाकूमारीचे प्रकरण१९८० अर्थात ३४ वर्षांपासून प्रलंबित असलेले चाकूमारीचे प्रकरण आपसी समझोत्याने निकाली निघाले. आरोपी कृष्णराव पौनीकर आणि उरकुडा भुजभुजे यांनी हुमदेव फटिंग यांच्यावर चाकू हल्ला करून जखमी केले होते. लकडगंज पोलीस ठाण्यात भादंविच्या ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल होता. समझोता होऊन दोन्ही पक्ष स्मित हास्याने न्यायालयातून परत गेले. महिला आरोपीला दिलासावाडी भागातील विजया हिरणवार नावाच्या एका महिलेने सीताबाई डोंगरे हिला उसणे पैसे दिले होते. विजया आपले पैसे मागण्यासाठी सीताबाईकडे गेली असता तिने मारहाण केली होती. १२ मे १९९७ रोजी सीताबाईविरुद्ध वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. १७ वर्षांपासून या दोघीही न्यायालयाच्या चकरा मारून त्रस्त झाल्या होत्या. महालोक अदालतीत त्यांच्यात समझोता झाला. पावणेसात कोटींवर रक्कम जमाभूसंपादन, मोटार अपघात दावे, धनादेश अनादर प्रकरणे, प्रकरण दाखलपूर्व वसुली दावे यातून एकूण ६ कोटी ८६ लाख ४५ हजार ६३ रुपयांची रक्कम तडजोडीच्या स्वरूपात प्राप्त झाली. दंडापोटी ३३ लाख ४५ हजार ८५२ रुपयांची रक्कम जमा झाली. तीन कोटींवर रक्कम मोटार अपघात दाव्यांची तर दोन कोटींवर रक्कम धनादेश अनादर प्रकरणातील तडजोडीची होती. अन् संसार विस्कटला होताया महालोक अदालतीमध्ये विस्कटलेल्या एका नवदाम्पत्याच्या संसाराला नवी दिशा मिळाली. २५ मे २०१३ रोजी थाटात विवाह समारंभ पार पडून दुसऱ्या दिवशीच पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यामुळे दोघेही विलग झाले होते. दोघांचे प्रकरण विधीसेवा प्राधिकरणाच्या कार्यालयात आल्यानंतर ते मध्यस्थाकडे पाठविण्यात आले होते. अनेक बैठकानंंतर आज समझोता होऊन दोघेही नव्याने संसार करण्यास तयार झाले. ३१ वर्षांनंतर फसवणूक प्रकरण निकालीआंबेडकरनगर येथील ललिता गायकवाड नावाच्या एका महिलेने आरोपी दयानंद यादव याला सोनसाखळी पॉलिश करण्यासाठी दिली होती. पॉलिशनंतर वजन कमी झाल्याचे समजताच यादव आणि गायकवाड यांच्यात वाद झाला. नरेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून १९ एप्रिल १९८३ रोजी सीताबर्डी पोलिसांनी यादवविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण महालोक अदालतीत तडजोडीने निकाली निघाले. पक्षकारच उत्कृष्ट न्यायाधीशलोकअदालत हे वाद निवारणाचे प्रभावी तंत्र आहे. पक्षकार हे स्वत:च त्यांचा वाद समजवून घेणारे उत्कृष्ट न्यायाधीश असतात. त्यांना वस्तुस्थितीची चांगली जाण असते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी याप्रसंगी केले. (प्रतिनिधी)