शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सेवा हाच धर्म आहे : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:28 IST

समाज सर्वांगसुंदर, उन्नत बनविण्याकरीता जी जी कर्तव्ये करावी लागतात, त्याला धर्म असे म्हणतात. सेवा हा त्यातलाच एक भाग आहे. रावसाहेब वाडेगावकरांनी ९० वर्षांपूर्वी दृष्टिबाधितांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडे करून प्रगतीचे पंख दिले. त्यांच्या कार्याचे मर्म सर्वांनी समजून घेतले पाहिजे. त्यांनी केलेले सेवेचे कार्य खऱ्या अर्थाने धर्माचे कार्य असल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनचा नवम दशकपूर्ती सोहळा

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : समाज सर्वांगसुंदर, उन्नत बनविण्याकरीता जी जी कर्तव्ये करावी लागतात, त्याला धर्म असे म्हणतात. सेवा हा त्यातलाच एक भाग आहे. रावसाहेब वाडेगावकरांनी ९० वर्षांपूर्वी दृष्टिबाधितांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडे करून प्रगतीचे पंख दिले. त्यांच्या कार्याचे मर्म सर्वांनी समजून घेतले पाहिजे. त्यांनी केलेले सेवेचे कार्य खऱ्या अर्थाने धर्माचे कार्य असल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.दि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनच्या नवम दशकपूर्ती सोहळ्याला अध्यक्ष म्हणून उपस्थित असताना डॉ. भागवत बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निखील मुंडले, सचिव नागेश कानगे, विश्वास बक्षी, मकरंद पांढरीपांडे, विनय बखने, संदीप धर्माधिकारी, माया ठोंबरे आदी उपस्थित होते. रावसाहेब वाडेगावकर यांनी १९२८ मध्ये दि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनच्या माध्यमातून मध्य भारतात पहिली अंधांची शाळा सुरू केली. या शाळेने ९० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, संघ आणि असोसिएशनच्या कामाचा अतिशय जुना संबंध आहे. किंबहुना संघ आणि या कार्याला सारखीच वर्षे झाली आहेत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी शाळेसाठी निधी गोळा केला होता. ते म्हणाले की, जीवनाला पूर्णत्वाकडे नेण्याचे दोन पैलू आहे. आपण परमेश्वराचे रूप आहोत व जगात सर्वत्र परमेश्वर आहे. ही भावना ठेवून जगात जनार्दन शोधावा. दृष्टी हे साधन नसली तरी दृष्टिबाधित व्यक्तीला दयेची गरज नसते. त्याला मदतीची आवश्यकता असते. लहानपणी आपल्यालाही मदतीची गरज भासतेच. दृष्टी हे साधन असणाºयांनी मदतीचे कार्य आत्मियतेने करावे. तो आपला आहे अशी भावना ठेवून, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. जसा सागर हा असंख्य बिंदंूनी बनतो, तसा समाजातसुद्धा वेगवेगळे घटक असतात. दृष्टिबाधितसुद्धा त्यातीलच एक घटक आहे. त्यालासुद्धा समान न्याय मिळावा, असा प्रयत्न समाजातून व्हायला हवा. प्रकृतीने त्याच्यात बाधा निर्माण केली असली तरी, आपल्यामुळे तो बाधित होणार नाही, याची काळजी घ्यावी. सामाजिक संवेदनेची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपल्या परिघात काम केले पाहिजे. तेव्हाच सेवेचे कर्मयज्ञ नवम दशकपूर्ती करू शकतात. या कार्यक्रमाचे संचालन कांचन नाजपांडे यांनी केले. प्रास्ताविक नागेश कानगे व आभार निखील मुंडले यांनी मानले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर