शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

सेवा हाच धर्म आहे : मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 01:28 IST

समाज सर्वांगसुंदर, उन्नत बनविण्याकरीता जी जी कर्तव्ये करावी लागतात, त्याला धर्म असे म्हणतात. सेवा हा त्यातलाच एक भाग आहे. रावसाहेब वाडेगावकरांनी ९० वर्षांपूर्वी दृष्टिबाधितांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडे करून प्रगतीचे पंख दिले. त्यांच्या कार्याचे मर्म सर्वांनी समजून घेतले पाहिजे. त्यांनी केलेले सेवेचे कार्य खऱ्या अर्थाने धर्माचे कार्य असल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देदि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनचा नवम दशकपूर्ती सोहळा

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : समाज सर्वांगसुंदर, उन्नत बनविण्याकरीता जी जी कर्तव्ये करावी लागतात, त्याला धर्म असे म्हणतात. सेवा हा त्यातलाच एक भाग आहे. रावसाहेब वाडेगावकरांनी ९० वर्षांपूर्वी दृष्टिबाधितांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडे करून प्रगतीचे पंख दिले. त्यांच्या कार्याचे मर्म सर्वांनी समजून घेतले पाहिजे. त्यांनी केलेले सेवेचे कार्य खऱ्या अर्थाने धर्माचे कार्य असल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली.दि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनच्या नवम दशकपूर्ती सोहळ्याला अध्यक्ष म्हणून उपस्थित असताना डॉ. भागवत बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निखील मुंडले, सचिव नागेश कानगे, विश्वास बक्षी, मकरंद पांढरीपांडे, विनय बखने, संदीप धर्माधिकारी, माया ठोंबरे आदी उपस्थित होते. रावसाहेब वाडेगावकर यांनी १९२८ मध्ये दि ब्लार्इंड रिलिफ असोसिएशनच्या माध्यमातून मध्य भारतात पहिली अंधांची शाळा सुरू केली. या शाळेने ९० वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की, संघ आणि असोसिएशनच्या कामाचा अतिशय जुना संबंध आहे. किंबहुना संघ आणि या कार्याला सारखीच वर्षे झाली आहेत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी शाळेसाठी निधी गोळा केला होता. ते म्हणाले की, जीवनाला पूर्णत्वाकडे नेण्याचे दोन पैलू आहे. आपण परमेश्वराचे रूप आहोत व जगात सर्वत्र परमेश्वर आहे. ही भावना ठेवून जगात जनार्दन शोधावा. दृष्टी हे साधन नसली तरी दृष्टिबाधित व्यक्तीला दयेची गरज नसते. त्याला मदतीची आवश्यकता असते. लहानपणी आपल्यालाही मदतीची गरज भासतेच. दृष्टी हे साधन असणाºयांनी मदतीचे कार्य आत्मियतेने करावे. तो आपला आहे अशी भावना ठेवून, त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. जसा सागर हा असंख्य बिंदंूनी बनतो, तसा समाजातसुद्धा वेगवेगळे घटक असतात. दृष्टिबाधितसुद्धा त्यातीलच एक घटक आहे. त्यालासुद्धा समान न्याय मिळावा, असा प्रयत्न समाजातून व्हायला हवा. प्रकृतीने त्याच्यात बाधा निर्माण केली असली तरी, आपल्यामुळे तो बाधित होणार नाही, याची काळजी घ्यावी. सामाजिक संवेदनेची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपल्या परिघात काम केले पाहिजे. तेव्हाच सेवेचे कर्मयज्ञ नवम दशकपूर्ती करू शकतात. या कार्यक्रमाचे संचालन कांचन नाजपांडे यांनी केले. प्रास्ताविक नागेश कानगे व आभार निखील मुंडले यांनी मानले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतnagpurनागपूर